Narayan Rane : कोकण अधिक समृध्द करण्यासाठी मी कटीबध्द

माणगाव खोऱ्यातील वाडोस येथे कार्यकर्ता मेळाव्यात मार्गदर्शन


माणगाव : लोकसभेची निवडणूक देशातील १४०० कोटी जनतेसाठी अत्यावश्यक असून गेल्या दहा वर्षात आपल्या देशाचे नाव पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यांनी जगाच्या पाठीवर नेले. एक प्रगत देश, विकसित भारत,आत्मनिर्भर भारत या सर्वांचे श्रेय मोदी साहेबांना जाते म्हणूनच त्यांचे हात बळकट करण्यासाठी कोकणच्या सर्वांगीण विकासाला गती देण्यासाठी आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे. आपले कोकण अधिक समृध्द व्हायला हवे. येथे रोजगाराच्या संधी वाढवतानाच,गावागावात विविध माध्यम,योजनांतून संपन्नता पोहोचविण्यासाठी लोकसभेत आपला हक्काचा खासदार असायला हवा. भाजपने लोकसभेसाठी मला उमेदवारी देऊन तुमची सेवा करण्याची संधी दिली आहे.आता आपले योगदान मोठे असायला हवे. कमळ चिन्ह लक्षात ठेवा असे आवाहन केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी केले.


माणगाव खोऱ्यातील वाडोस येथील अन्नपूर्णा मंगल कार्यालय येथे शनिवारी महायुतीचा कार्यकर्ता मेळावा आणि पक्षप्रवेश सोहळ्यानिमित्त ते बोलत होते.


यावेळी नारायण राणे यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना संपूर्ण जगात महागुरु म्हणून ओळखतात त्यांना पुन्हा एकदा पंतप्रधान करण्यासाठी महायुतीला मतदान करा. १९९०पासून मी विविध पदावर कार्यरत असून अनेक मंत्रीपदे मला मिळाली. येथील विकास कामे करण्यासाठी मी कटिबद्ध आहे. जिल्ह्यात लवकरच फळ प्रक्रिया उद्योगही ओरोस येथे होणार आहे. दोडामार्ग जवळ आणि जिल्ह्यातील चिपी या दोन्ही विमानतळासाठी आवश्यक रस्ते व भौतिक सुविधा पूर्ण झाल्या आहेत. दोडामार्गात पाचशे कारखाने आणून येथील युवकांच्या हाताला काम देणार आहे.


येत्या पाच वर्षात सिंधुदुर्ग जिल्हा देशातील प्रगतशील जिल्हा म्हणून ओळखला जाईल जिल्ह्यातून कोल्हापूर रस्ता, रेल्वे मार्ग, चार पदरी रस्ते ,विमान आदि कामे पूर्ण झाली आहेत. एवढे करूनही उद्धव ठाकरे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्यावर टीका करत आहेत. आपण मुख्यमंत्री असताना अडीच वर्षात कोणतीही विकासकामे केली नाहीत हे जनतेला आता समजले असून येत्या निवडणुकीत भाजप म्हणजेच महायुतीला मतदान करून नरेंद्र मोदी यांना पुन्हा एकदा पंतप्रधान करण्याची संधी द्या. जिल्ह्यातील मुले आयपीएस ,कलेक्टर व्हावेत यासाठी विविध कॉलेज शैक्षणिक सुविधा पूर्ण करणार असून उद्योगाबाबत जिल्ह्यात विविध अधिकाऱ्यांकडून माहिती घेऊन येथील रोजगाराचा प्रश्न सोडविण्यासाठी मी कटिबद्ध आहे असे राणे म्हणाले.

Comments
Add Comment

मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात; तिघांचा जागीच मृत्यू

रायगड : मुंबई-पुणे महामार्गावर बुधवारी सकाळी भीषण अपघात घडून तिघांचा जागीच मृत्यू झाला. या दुर्घटनेत एकूण पाच

आयपीएल 2026 : विराट कोहली बंगळूरुमध्ये दाखल

बंगळुरु : रॉयल चॅलेंजर्स बंगळूरचा माजी कर्णधार आणि महान क्रिकेटपटू विराट कोहली आयपीएल २०२६ साठी संघात सामील

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी घेतले छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीचे दर्शन

पुणे : छत्रपती संभाजी महाराज यांच्या ३३७ व्या बलिदान स्मरणदिनानिमित्त राज्याच्या उपमुख्यमंत्री आणि पुणे

सातारा येथे २२ मार्चला चतुर्थ ‘महाराष्ट्र मंदिर न्यास परिषद'

मंदिर-संस्कृतीच्या रक्षणार्थ एक हजारांहून अधिक मंदिर प्रतिनिधींची उपस्थिती सातारा : लाखो वर्षांपासून हिंदु

मराठी कलाविश्वाचा सन्मान सोहळा; दिमाखात रंगला ‘चिरायू २०२६’

मुंबई : साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानल्या जाणाऱ्या हिंदू नववर्षाच्या स्वागतासाठी आपण सगळेच सज्ज झाले आहोत.

Gyan Bharatam project : ज्ञानभारतम् प्रकल्पाची सुरुवात; देशव्यापी हस्तलिखित सर्वेक्षण मोहिमेला प्रारंभ

मुंबई : भारताच्या समृद्ध ज्ञानपरंपरेचा अमूल्य ठेवा असलेल्या हस्तलिखितांचे जतन, संवर्धन आणि प्रसार करण्यासाठी