Narayan Rane : कोकण अधिक समृध्द करण्यासाठी मी कटीबध्द

माणगाव खोऱ्यातील वाडोस येथे कार्यकर्ता मेळाव्यात मार्गदर्शन


माणगाव : लोकसभेची निवडणूक देशातील १४०० कोटी जनतेसाठी अत्यावश्यक असून गेल्या दहा वर्षात आपल्या देशाचे नाव पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यांनी जगाच्या पाठीवर नेले. एक प्रगत देश, विकसित भारत,आत्मनिर्भर भारत या सर्वांचे श्रेय मोदी साहेबांना जाते म्हणूनच त्यांचे हात बळकट करण्यासाठी कोकणच्या सर्वांगीण विकासाला गती देण्यासाठी आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे. आपले कोकण अधिक समृध्द व्हायला हवे. येथे रोजगाराच्या संधी वाढवतानाच,गावागावात विविध माध्यम,योजनांतून संपन्नता पोहोचविण्यासाठी लोकसभेत आपला हक्काचा खासदार असायला हवा. भाजपने लोकसभेसाठी मला उमेदवारी देऊन तुमची सेवा करण्याची संधी दिली आहे.आता आपले योगदान मोठे असायला हवे. कमळ चिन्ह लक्षात ठेवा असे आवाहन केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी केले.


माणगाव खोऱ्यातील वाडोस येथील अन्नपूर्णा मंगल कार्यालय येथे शनिवारी महायुतीचा कार्यकर्ता मेळावा आणि पक्षप्रवेश सोहळ्यानिमित्त ते बोलत होते.


यावेळी नारायण राणे यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना संपूर्ण जगात महागुरु म्हणून ओळखतात त्यांना पुन्हा एकदा पंतप्रधान करण्यासाठी महायुतीला मतदान करा. १९९०पासून मी विविध पदावर कार्यरत असून अनेक मंत्रीपदे मला मिळाली. येथील विकास कामे करण्यासाठी मी कटिबद्ध आहे. जिल्ह्यात लवकरच फळ प्रक्रिया उद्योगही ओरोस येथे होणार आहे. दोडामार्ग जवळ आणि जिल्ह्यातील चिपी या दोन्ही विमानतळासाठी आवश्यक रस्ते व भौतिक सुविधा पूर्ण झाल्या आहेत. दोडामार्गात पाचशे कारखाने आणून येथील युवकांच्या हाताला काम देणार आहे.


येत्या पाच वर्षात सिंधुदुर्ग जिल्हा देशातील प्रगतशील जिल्हा म्हणून ओळखला जाईल जिल्ह्यातून कोल्हापूर रस्ता, रेल्वे मार्ग, चार पदरी रस्ते ,विमान आदि कामे पूर्ण झाली आहेत. एवढे करूनही उद्धव ठाकरे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्यावर टीका करत आहेत. आपण मुख्यमंत्री असताना अडीच वर्षात कोणतीही विकासकामे केली नाहीत हे जनतेला आता समजले असून येत्या निवडणुकीत भाजप म्हणजेच महायुतीला मतदान करून नरेंद्र मोदी यांना पुन्हा एकदा पंतप्रधान करण्याची संधी द्या. जिल्ह्यातील मुले आयपीएस ,कलेक्टर व्हावेत यासाठी विविध कॉलेज शैक्षणिक सुविधा पूर्ण करणार असून उद्योगाबाबत जिल्ह्यात विविध अधिकाऱ्यांकडून माहिती घेऊन येथील रोजगाराचा प्रश्न सोडविण्यासाठी मी कटिबद्ध आहे असे राणे म्हणाले.

Comments
Add Comment

पहिल्या नऊ महिन्यातच मुंबईत रियल इस्टेट बाजारात चार पटीने गुंतवणूकीत वाढ! 'ही' आहे आकडेवारी

मुंबई: वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार आर्थिक वर्ष २०२५ च्या पहिल्याच नऊ महिन्यांत मुंबईच्या रिअल इस्टेट

आता कॅनडा व भारत व्यापारी भागीदार होणार? नवी दिल्ली येथे महत्वाची द्विपक्षीय चर्चा संपन्न

प्रतिनिधी: वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल आणि कॅनडाचे निर्यात प्रोत्साहन आंतरराष्ट्रीय व्यापार आणि

भारताच्या डिजिटल अ‍ॅक्सेसिबिलिटी अहवालात प्रमुख वेबसाइट क्षेत्रांमध्ये 'मूलभूत' अडथळे कायम!

मुंबई: नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमात 'भारत डिजिटल फर्स्ट' कार्यक्रमाच्या चौथ्या आवृत्तीत हा अहवाल लाँच

धर्मेंद्र यांच्या प्रकृतीविषयी अफवा: IFTDA अध्यक्ष अशोक पंडित यांची पापाराझींविरोधात तक्रार

मुंबई : बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांच्या आरोग्याविषयी गेल्या काही दिवसांत पसरलेल्या अफवांनी

लिबर्टी जनरल इन्शुरन्सने भारतात 'शूरिटी' विमा व्यवसाय सुरू केला

मुंबई  प्रथमच लिबर्टी जनरल इन्शुरन्स लिमिटेडने आज भारतात 'शूरिटी' इन्शुरन्स लाँचिंगची अधिकृत घोषणा केली आहे.

WPI Index: ऑक्टोबर महिन्यात घाऊक किंमत महागाई निर्देशांकात १.२१% इतकी प्रचंड घसरण 'या' कारणांमुळे

प्रतिनिधी: ऑक्टोबर महिन्यात घाऊक किंमत निर्देशांकात (Wholesale Price Index WPI) १.२१% घसरण झाली आहे. विशेषतः डाळी, भाजीपाल्याची