Shashikant Shinde : १३८ कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी शशिकांत शिंदेंवर गुन्हा दाखल!

  346

शशिकांत शिंदे मविआचे साताऱ्यातील उमेदवार


साताऱ्यात मविआच्या अडचणीत वाढ


सातारा : लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election) दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या सातारा लोकसभा (Satara Loksabha) मतदारसंघात महाविकास आघाडीला (Mahavikas Aghadi) एक मोठा धक्का बसला आहे. राज्यभरातून मविआला अनेक अडचणींचा सामना करावा लागत असतानाच आता साताऱ्यातही मविआच्या अडचणीत वाढ झाली आहे. याचं कारण म्हणजे १३८ कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी मविआचे साताऱ्यातील उमेदवार शशिकांत शिंदेंवर (Shashikant Shinde) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीतील एफएसआय घोटाळा (Market FSI Scam) प्रकरणी मुंबई पोलिसांनी ही कारवाई केली आहे.


लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर शशिकांत शिंदे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. सुरुवातीला ८ ते १० कोटींच्या शौचालय घोटाळा प्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणी शशिकांत शिंदे यांना अटकपूर्व जामीन मिळाल्याने त्यांची अटक टळली होती. पण इतर काही संचालकांवर अटकेची कारवाई झाली होती. त्यानंतर आता मसाला मार्केटमधील १३८ कोटींचा घोटाळा समोर आला आहे. मुंबईतील APMC पोलीस ठाण्यात त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.


सन २००९ पासून या प्रकरणाची चौकशी सुरु होती पण यात गुन्हा दाखल होत नव्हता. प्रशासक मनोज सैनिक यांनी या प्रकरणाचा अहवाल तयार केला. यामध्ये ६५ कोटींच्या एफएसआयमध्ये फसवणूक झाल्याचा दावा केला आहे. अखेर काल रात्री एपीएमसी पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल झाला. दरम्यान, १२ एप्रिल रोजी शशिकांत शिंदे यांनी कोर्टात अटकपूर्व जामिनासाठी धाव घेतली होती. त्यामुळे या प्रकरणात कोर्ट काय निकाल देतंय हे पाहणं महत्वाचं आहे.

Comments
Add Comment

अशोक नगरमधील पालिकेच्या मैदानाला तलावाचे स्वरूप

नागरिकांनी वारंवार तक्रार करूनही पालिकेचे दुर्लक्ष कांदिवली : कांदिवली पूर्वेला अशोक नगरमधील एकमेव असलेल्या

पुण्यात भिडे पूल दीड महिना बंद

पुणे : सदाशिवपेठेतून डेक्कन मेट्रो स्थानकात जाण्यासाठी महामेट्रोकडून भिडे पुलावरून लोखंडी पादचारी पूल

महिला सक्षमीकरणात शिक्षणाची भूमिका मोलाची

आरबीएलतर्फे विद्यार्थिनींना सायकलसह शालेय साहित्याचे वितरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे

ज्ञानेश्‍वर माउलींचा पालखी प्रस्थान सोहळा यंदाच्या वर्षी रात्री ८ वाजता

पुणे : आषाढी वारीतील संत ज्ञानेश्‍वर माउलींचा पालखी प्रस्थान सोहळा यंदाच्या वर्षी रात्री आठ वाजता होणार आहे.

कोकण रेल्वे मुंबई-मडगाव मार्गावर १४ जून रोजी एकतर्फी विशेष गाडी

रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावर १४ जून रोजी एकतर्फी विशेष गाडी मुंबई मडगाव मार्गावर धावणार आहे. या गाडीचे आरक्षण

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तीन टप्प्यात होणार!

येत्या सप्टेंबर -ऑक्टोबर महिन्यात मतदान निवडणूक खर्चात वाढ करण्याबाबतही विचार राज्य निवडणूक आयुक्तांनी दिली