Nashik Loksabha : दिंडोरीमध्ये मविआला धक्का; माकप निवडणूक लढवण्यावर ठाम!

  71

आधी घेतली होती मदतीची भूमिका मात्र आता उतरणार निवडणुकीच्या रिंगणात


नाशिक : लोकसभा निवडणुका (Loksabha Election) सुरु असताना मविआला (MVA) धक्क्यांवर धक्के पचवावे लागत आहेत. मविआमध्ये सांगलीच्या जागेवरुन वाद निर्माण झाले, त्यातूनच विशाल पाटील यांनी बंडखोरी केली. त्यानंतर आता दिंडोरीमध्ये देखील काहीशी अशीच परिस्थिती उद्भवली आहे. दिंडोरीची जागा माकपला सोडावी, अशी मागणी माकपचे माजी आमदार जे पी गावित (J. P. Gavit) यांनी केली होती. मात्र ही जागा महाविकास आघाडीत शरद पवार गटाच्या (Sharad Pawar Group) वाट्याला आली. शरद पवार गटाकडून भास्कर भगरे (Bhaskar Bhagare) यांना उमेदवारी देण्यात आली. त्यामुळे नाराज झालेल्या गावितांनी स्वतंत्र निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे.


महाविकास आघाडीत पहिल्या दिवसापासून माकपने मित्रपक्षाच्या उमेदवाराला मदत करण्याची भूमिका घेतली होती. परंतु, गेल्या आठवड्यात शरद पवार गटाने उमेदवार जाहीर केल्यानंतर जे पी गावित यांनी कार्यकर्त्यांचा मेळावा घेत निवडणूक लढविण्याची घोषणा केली. तेथेच महाआघाडीच्या फुटीची पहिली ठिणगी पडली. जे पी गावित यांनी दिंडोरीत जाहीर सभा घेत महाविकास आघाडीने दिंडोरीचा उमेदवार न बदलल्यास माकप स्वतंत्र लढणार, असा इशारा शरद पवारांना (Sharad Pawar) दिला होता.


माकपच्या पॉलिट ब्युरो सदस्यांची काल ऑनलाइन बैठक पार पडली. या बैठकीत दिंडोरीतून माजी आमदार गावित यांना निवडणुकीच्या रिंगण्यात उतरविण्याचा अंतिम निर्णय घेण्यात आला. पक्षाचे माजी आमदार जे. पी. गावित हे आज उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. त्यामुळे दिंडोरीमध्ये मविआमधील फुटीवर शिक्कामोर्तब झाले आहे.



जयंत पाटलांकडून मनधरणीचा प्रयत्न


दिंडोरीत डॅमेज कंट्रोल रोखण्यासाठी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी थेट दिंडोरी गाठत गावितांशी चर्चा देखील केली. त्यावेळी विधानसभेच्या मदतीचा प्रस्ताव पाटील यांनी गावितांसमोर ठेवला. पण, आमचा पक्ष एकदा घेतलेला निर्णय पुन्हा मागे घेत नाही, असे सांगत गावितांनी पवार गटाचा प्रस्ताव धुडकावून लावला. त्यामुळे आता दिंडोरीत महायुती, महाविकास आघाडी, माकप व वंचित अशी चौरंगी लढत रंगणार आहे.

Comments
Add Comment

मुंबई-गोवा महामार्ग: १८ वर्षांची प्रतीक्षा, खड्डेमय प्रवास अन् अपघातांचा धोका कायम!

मुंबई : मुंबई-गोवा महामार्गाचे काम गेली १८ वर्षांपासून रखडलेले असतानाच, या पावसाळ्यातही प्रवाशांचे हाल कायम

राज्यात ५१ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या

नाशिक : राज्यातील ५१ पोलीस अधीक्षक आणि अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या बदल्या करण्यात आल्या असून त्यामध्ये नाशिक

Chandrashekhar Bawankule: मर्सिडीजमधून फिरणाऱ्या, आणि फार्म हाऊसवाल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी नाही; महसूलमंत्री बावनकुळे स्पष्टच बोलले

अमरावती: राज्यात शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची मागणी जोर धरत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या

ST : विना तिकिट प्रवास करणाऱ्यांवर कारवाई, एसटीने वसूल केला ३ लाखांचा दंड...

पुणे : विना तिकिट प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर एसटी महामंडळाने कारवाई करण्यासाठी सुरवात केली आहे. २०२४-२०२५ या

Samruddhi Mahamarg Accident : समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, आलिशान मर्सिडीजने ३ वेळा पलटी घेतली अन्...;

नाशिकच्या प्रसिद्ध उद्योजकाचा मृत्यू नागपूर : समृद्धी महामार्गावर (Samruddhi Mahamarg) भीषण अपघाताची (Accident News) आणखी एक घटना

Pandharpur Vitthal Mandir: आषाढी वारीनिमित्त विठुरायाचं आजपासून २४ तास दर्शन सुरू

पंढरपूर: पंढरपूरची वारी हा महाराष्ट्रातील एक महत्त्वपूर्ण धार्मिक आणि सांस्कृतिक उत्सव असतो. या वारीत