Deepak kesarkar : उत्कृष्ट खोटे कसे बोलावे याचा जीवंत नमुना आदित्य ठाकरे

दीपक केसरकर यांचा खोचक टोला


४०० खासदारांमध्ये रत्नागिरी-सिंधुदुर्गचे नारायण राणे असतील : उदय सामंत


मुंबई : सध्या देशात लोकसभा निवडणुकीची (Loksabha Election) रणधुमाळी सुरु असून राजकीय नेते एकमेकांवर आरोप करण्याची एकही संधी सोडत नाहीत. त्यातच आता पालकमंत्री व शिवसेना नेते दीपक केसरकर (Deepak kesarkar) यांनी ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्यावर जोरदार टीका केली आहे. उत्कृष्ट खोटे कसे बोलावे याचा जीवंत नमुना आदित्य ठाकरे आहेत', असा खोचक टोला त्यांनी लगावला. याउलट केंद्रीय मंत्री नारायण राणे (


) मोठ्या मताधिक्याने निवडून येतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.


दीपक केसरकर यांनी आदित्य ठाकरेंवर हल्लाबोल केला. ते म्हणाले, खोटे उत्कृष्ट कसे बोलावे याचा जीवंत नमुना आदित्य ठाकरे आहेत. खोटे बोलणाऱ्यांमध्ये भारतात नंबर काढला तर हे राजपुत्र एक नंबरला जातील, याची मला खात्री आहे. आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांची बदनामी करण्याच्या फंदात पडू नये. तसेच देवेंद्र फडणवीस यांच्या अटकेचा डाव निश्चितच करण्यात आलेला होता, असेही दीपक केसरकर म्हणाले.



वैभव नाईकांनाही लगावला टोला


पत्रकारांशी बोलताना दीपक केसरकर यांनी वैभव नाईक यांच्यावरही टीका केली. प्रत्येक गोष्टीत कुत्सित बोलून विकास होत नाही. जर्मनीबाबत लेखी करार झालेला आहे. वैभवजींचा स्थानिक पातळीवर गावागावात काम करण्यावर भर असतो. त्यामुळे नोकऱ्या, मोठ्या इंडस्ट्री यांबाबत ते फारशी माहिती घेत नसतील, असा टोला दीपक केसरकर यांनी लगावला.



नारायण राणे मोठ्या मताधिक्याने निवडून येतील


केसरकर म्हणाले, महाराष्ट्राचे इन्फ्रास्ट्रक्चर उभे करण्यात खूप मोठा वाटा देवेंद्र फडणवीस यांचा राहिलेला आहे, त्यांच्या खांद्याला खांदा लावून एकनाथ शिंदे यांनी काम केलेले आहे. चिन्ह कुठलेही असले तरी महायुती म्हणून मतदान होत असते. त्यामुळे नारायण राणे मोठ्या मताधिक्याने निवडून येतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.



४०० खासदारांमध्ये रत्नागिरी-सिंधुदुर्गचे नारायण राणे : उदय सामंत


दरम्यान, मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनीदेखील कोकणात नारायण राणे निवडून येतील, अशी खात्री व्यक्त केली आहे. ते म्हणाले, नारायण राणे यांनी कोकणाला न्याय दिलेला आहे. ४०० खासदारांमध्ये रत्नागिरी-सिंधुदुर्गचे नारायण राणे असतील हा शब्द देतो. पुढच्या वर्षी रत्नागिरी विमानतळावरून टेक ऑफ होईल. स्वतःची निवडणूक आहे, असे समजून प्रत्येकाने कामाला लागले पाहिजे, असे आवाहन करत, उद्योग परराज्यात गेले हे पाप ठाकरे गट आणि त्यांच्या प्रमुखांचे आहे, अशी टीका त्यांनी केली. नरेंद्र मोदी विरुद्ध कमकुवत राहुल गांधी अशी ही लढाई आहे. सर्वच्या सर्व जागा या महायुतीच्या निवडून येतील ही खात्री आहे, असंही उदय सामंत म्हणाले.

Comments
Add Comment

मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात; तिघांचा जागीच मृत्यू

रायगड : मुंबई-पुणे महामार्गावर बुधवारी सकाळी भीषण अपघात घडून तिघांचा जागीच मृत्यू झाला. या दुर्घटनेत एकूण पाच

लातूर जिल्ह्यात काढणीच्या तोंडावर पाऊस; शेतकरी चिंतेत

लातूर : दोन तीन दिवसांपासून उन्हाचा तडाखा वाढला होता. अवकाळी पावसाचा अंदाज हवामान विभागाने नुकताच जाहीर केला

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी घेतले छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीचे दर्शन

पुणे : छत्रपती संभाजी महाराज यांच्या ३३७ व्या बलिदान स्मरणदिनानिमित्त राज्याच्या उपमुख्यमंत्री आणि पुणे

सातारा येथे २२ मार्चला चतुर्थ ‘महाराष्ट्र मंदिर न्यास परिषद'

मंदिर-संस्कृतीच्या रक्षणार्थ एक हजारांहून अधिक मंदिर प्रतिनिधींची उपस्थिती सातारा : लाखो वर्षांपासून हिंदु

पाणी समजून प्यायलं थिनर; चार वर्षांच्या चिमुकल्याच्या तोंडापासून ते पोटापर्यंत...

ठाणे : ठाण्याच्या इंदिरानगरमध्ये एक अतिशय धक्कादायक घटना घडली आहे. चार वर्षाच्या चिमुकल्याने चुकून पाणी समजून

मराठमोळ्या मुलीशी लग्न करुन आता पत्नीला बुरख्यातच ठेवतो; म्हणाल्या, पुरुष स्त्रियांकडे...

मुंबई: प्रसिद्ध युट्यूबर आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर अदनान शेख सध्या त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत