मुंबई : सध्या देशात लोकसभा निवडणुकीची (Loksabha Election) रणधुमाळी सुरु असून राजकीय नेते एकमेकांवर आरोप करण्याची एकही संधी सोडत नाहीत. त्यातच आता पालकमंत्री व शिवसेना नेते दीपक केसरकर (Deepak kesarkar) यांनी ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्यावर जोरदार टीका केली आहे. उत्कृष्ट खोटे कसे बोलावे याचा जीवंत नमुना आदित्य ठाकरे आहेत’, असा खोचक टोला त्यांनी लगावला. याउलट केंद्रीय मंत्री नारायण राणे (
) मोठ्या मताधिक्याने निवडून येतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
दीपक केसरकर यांनी आदित्य ठाकरेंवर हल्लाबोल केला. ते म्हणाले, खोटे उत्कृष्ट कसे बोलावे याचा जीवंत नमुना आदित्य ठाकरे आहेत. खोटे बोलणाऱ्यांमध्ये भारतात नंबर काढला तर हे राजपुत्र एक नंबरला जातील, याची मला खात्री आहे. आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांची बदनामी करण्याच्या फंदात पडू नये. तसेच देवेंद्र फडणवीस यांच्या अटकेचा डाव निश्चितच करण्यात आलेला होता, असेही दीपक केसरकर म्हणाले.
पत्रकारांशी बोलताना दीपक केसरकर यांनी वैभव नाईक यांच्यावरही टीका केली. प्रत्येक गोष्टीत कुत्सित बोलून विकास होत नाही. जर्मनीबाबत लेखी करार झालेला आहे. वैभवजींचा स्थानिक पातळीवर गावागावात काम करण्यावर भर असतो. त्यामुळे नोकऱ्या, मोठ्या इंडस्ट्री यांबाबत ते फारशी माहिती घेत नसतील, असा टोला दीपक केसरकर यांनी लगावला.
केसरकर म्हणाले, महाराष्ट्राचे इन्फ्रास्ट्रक्चर उभे करण्यात खूप मोठा वाटा देवेंद्र फडणवीस यांचा राहिलेला आहे, त्यांच्या खांद्याला खांदा लावून एकनाथ शिंदे यांनी काम केलेले आहे. चिन्ह कुठलेही असले तरी महायुती म्हणून मतदान होत असते. त्यामुळे नारायण राणे मोठ्या मताधिक्याने निवडून येतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
दरम्यान, मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनीदेखील कोकणात नारायण राणे निवडून येतील, अशी खात्री व्यक्त केली आहे. ते म्हणाले, नारायण राणे यांनी कोकणाला न्याय दिलेला आहे. ४०० खासदारांमध्ये रत्नागिरी-सिंधुदुर्गचे नारायण राणे असतील हा शब्द देतो. पुढच्या वर्षी रत्नागिरी विमानतळावरून टेक ऑफ होईल. स्वतःची निवडणूक आहे, असे समजून प्रत्येकाने कामाला लागले पाहिजे, असे आवाहन करत, उद्योग परराज्यात गेले हे पाप ठाकरे गट आणि त्यांच्या प्रमुखांचे आहे, अशी टीका त्यांनी केली. नरेंद्र मोदी विरुद्ध कमकुवत राहुल गांधी अशी ही लढाई आहे. सर्वच्या सर्व जागा या महायुतीच्या निवडून येतील ही खात्री आहे, असंही उदय सामंत म्हणाले.
कोलकाता: इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा गुजरात टायटन्सविरुद्ध लाजिरवाणा पराभव झाला आहे. गुजरातने…
२४ एप्रिलला एकनाथ शिंदे यांची शक्तिप्रदर्शन सभा! सिंधुदुर्ग : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ…
माजी नगरसेवक राकेश कांदे यांचा वैभव नाईकांना थेट इशारा सिंधुदुर्ग : चेंदवण येथील सिद्धिविनायक उर्फ…
लहान नाल्यातील गाळ काढण्यापूर्वीचे आणि नंतरचे सीसीटीव्हीद्वारे चित्रीकरण मुंबई (खास प्रतिनिधी): पावसाळापूर्व कामांचा भाग म्हणून…
PM Modi : आजची धोरणे, निर्णय पुढील हजार वर्षांच्या भविष्याला आकार देणार आहेत : पंतप्रधान…
World Earth Day 2025: आपली शक्ती, आपला ग्रह - विश्व पृथ्वी दिन २०२५ मुंबई :…