मुंबई : देशभरातील ८९ मतदारसंघात आज दुसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडलं. या सर्व मतदारसंघांमध्ये मतदानाची वेळ संपेपर्यंत अर्थात संध्याकाळी सहा वाजेपर्यंत सरासरी ६४.७० इतके टक्के मतदान झाले. तर यांपैकी महाराष्ट्रात आठ मतदारसंघात ५३.७१ इतके टक्के मतदान झालं. यामध्ये वर्धा लोकसभा मतदारसंघात सर्वाधिक ५६.६६ टक्के मतदानाची नोंद झाली. निवडणूक आयागानं ही आकडेवारी जाहीर केली आहे.
देशातील १३ राज्यांमध्ये एकूण ८९ मतदारसंघांत दुसऱ्या टप्प्यातील मतदान शुक्रवारी २६ एप्रिल रोजी पार पडले. यासाठी १६ कोटी मतदार पात्र होते, पण त्यांपैकी सुमारे ९ कोटी मतदारांनीच मतदानाचा हक्क बजावला. यामध्ये ९ मतदारसंघ हे अनुसुचित जातीसाठी तर ७ मतदारसंघ अनुसुचित जमातीसाठी राखीव होते.
यामध्ये केरळमधील सर्व २० मतदारसंघातील मतदान पूर्ण झालं आहे. तर महाराष्ट्रातील १३ मतदारसंघातील मतदान संपलं. त्याचबरोबर दुसऱ्या टप्प्यात आसाममधील ५, बिहारमधील ५, छत्तीसगडमधील ३, कर्नाटकातील १४, मध्यप्रदेशातील ७, महाराष्ट्रात ८, मणिपूरमध्ये १, राजस्थानात १३, त्रिपुरात १, उत्तर प्रदेशात ८, पश्चिम बंगालमध्ये ३ आणि जम्मू व काश्मीर या राज्यात १ मतदारसंघात शुक्रवारी मतदान पार पडले.
दुसऱ्या टप्प्यात शुक्रवारी झालेल्या मतदानामुळं प्रकाश आंबेडकर (अकोला), नवनीत राणा (अमरावती), रविकांत तुपकर (बुलडाणा), रामदास तडस (वर्धा) यांच्यासह देशभरात ओम बिर्ला, राहुल गांधी, हेमा मालिनी, अरुण गोविल, एच. डी. कुमारस्वामी, शशी थरूर, भूपेश बघेल, के. सी. वेणुगोपाल, दानिश अली या महत्वाच्या उमेदवारांचं भवितव्य ईव्हीएममध्ये कैद झाले आहे.
वर्धा – ५६.६६ टक्के
वाशिम-यवतमाळ – ५४.०४ टक्के
अमरावती – ५४.५० टक्के
अकोला – ५२.४९ टक्के
बुलडाणा – ५२.८८ टक्के
हिंगोली – ५२.०२ टक्के
परभणी – ५३.७९ टक्के
नांदेड – ५३.५३ टक्के
मुंबई: आचार्य चाणक्य यांनी अशा घरांचे वर्णन निती शास्त्रात केले आहे जिथे लक्ष्मी मातेला जायला…
मुंबई : आयसीसी टी २० विश्वचषक स्पर्धेत टीम इंडियाने दैदीप्यमान कामगिरी करत विश्वचषक जिंकला. भारतीय…
मुंबई: Motorola Razr 50 Ultra गुरूवारी भारतात लाँच करण्यात आला. हा कंपनीचा नवा क्लॅमशेल-स्टाईलचा फोल्डेबल…
मुंबई: टी-२० वर्ल्डकप २०२४ जिंकून आलेल्या टीम इंडियाचे गुरूवारी मुंबईत अतिशय भव्य दिव्य स्वागत झाले.…
थिरुवनंतपुरम : केरळमध्ये दुषित पाण्यात आंघोळ केल्यामुळे १४ वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला आहे. अमिबामुळे मेंदूला…
मुंबई: भारतीय खेळाडू टी-२० वर्ल्डकप जिंकल्यानंतर मायदेशात परतले आहेत. यानंतर रोहित शर्माच्या नेतृत्वातील टीम इंडियाच्या…