Breach of Code of Conduct : आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी काँग्रेस व भाजपा अध्यक्षांना निवडणूक आयोगाची नोटीस!

२९ एप्रिलपर्यंत उत्तर देण्याचे आदेश


नवी दिल्ली : सध्या देशात सर्वत्र लोकसभा निवडणुकीची (Loksabha Election) रणधुमाळी सुरु आहे. प्रचारासाठी राजकीय नेत्यांनी सभांचा धडाका लावला आहे. यामध्ये सत्ताधारी व विरोधकांकडून एकमेकांवर आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या जात आहेत. मात्र, काहीवेळेस राजकीय नेत्यांकडून विरोधी टीका करताना आचारसंहितेचा भंग (Breach of Code of Conduct) केला जातो. या प्रकरणी भाजप आणि काँग्रेसकडून (BJP VS Congress) एकमेकांविरोधात निवडणूक आयोगात (Election Commission) तक्रार दाखल करण्यात आली होती. यावर निवडणूक आयोगाने आज पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या वक्तव्याची दखल घेत दोन्ही पक्षांना २९ एप्रिलपर्यंत उत्तर देण्याचे आदेश दिले आहेत.


समाजात द्वेष पसरवणे, धार्मिक तेढ निर्माण करणे, जात, धर्म आणि भाषेच्या आधारे भेदभाव करणे अशा प्रकारचे आरोप एकमेकांविरोधात करण्यात आले होते. या प्रकरणी निवडणूक आयोगाने पक्षाध्यक्षांना जबाबदार ठरवत भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा (J. P. Nadda) आणि काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे (Mallikarjun Kharge) यांना नोटीस पाठवली आहे. नोटीसमध्ये २९ एप्रिलच्या सकाळी ११ वाजेपर्यंत उत्तर देण्याचे आदेश देण्यात आले आहेत.


निवडणूक आयोगाने याप्रकरणी लोकप्रतिनिधी कायदा अनुच्छेद ७७ चा वापर करत स्टार प्रचारकांच्या वादग्रस्त वक्तव्यांसाठी पक्षाच्या अध्यक्षांना जबाबदार धरलं आहे. त्यानुसार, आयोगाने दोन्ही अध्यक्षांच्या नावावर नोटीस पाठवली आहे. नोटीसमध्ये आयोगाने सांगितलं आहे की, राजकीय पक्षांची ही जबाबदारी आहे की त्यांनी आपले उमेदवार आणि स्टार प्रचारकांना संयमित भाषेचा वापर करण्यास सांगावे. मोठ्या पदावर बसलेल्या लोकांच्या भाषणाचा मोठा प्रभाव लोकांवर पडत असतो. त्यामुळे अशा लोकांनी बोलताना सावधगिरी बाळगायला हवी.



काय होत्या तक्रारी?


भाजपने राहुल गांधींच्या एका भाषणावर आक्षेप घेत आयोगाकडे तक्रार केली होती. तर, दुसरीकडे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे एका भाषण धार्मिक, जातीवादी आणि धर्माच्या नावावर द्वेष पसरवणारे होते असे म्हणत काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली होती. आतापर्यंत निवडणूक आयोगाकडे अनेक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. निवडणूक आयोगाने सर्वांना संयम ठेवून वक्तव्य करण्याच्या सूचना दिल्या आहेत. प्राप्त झालेल्या नोटिसीवर काँग्रेस आणि भाजप काय उत्तर देतं हे पाहावं लागेल.

Comments
Add Comment

सुप्रीम कोर्टाचे ज्येष्ठ वकील सिद्धार्थ शिंदेंना कोर्टात आली भोवळ, उपचारादरम्यान मृत्यू

नवी दिल्ली: दिल्लीतून एक मोठी बातमी समोर आली आहे. सर्वोच्च न्यायालयातील वरिष्ठ वकील सिद्धार्थ शिंदे यांचं

Uttarakhand Cloudburst: उत्तराखंडच्या राजधानीत ढगफूटी! घरं, गाड्या आणि दुकाने खेळण्यांसारख्या गेल्या वाहून

डेहराडून: उत्तराखंडमध्ये पुन्हा एकदा ढगफुटीने कहर केला आहे. उत्तराखंडची राजधानी असलेल्या डेहराडून येथील

Google Gemini Nano Banana AI trend : मुलींनो सावधान! गुगल जेमिनाय’मध्ये फोटो करताय? IPS अधिकाऱ्याने दिला धक्कादायक इशारा, नक्की वाचा

‘गुगल जेमिनाय’च्या (Google Gemini) नॅनो बनाना एआय फीचरने सोशल मीडियावर अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. असंख्य नेटकरी आपले फोटो

Income Tax Return भरणाऱ्यांसाठी ही सर्वात मोठी बातमी...

नवी दिल्ली: प्राप्तिकर विभागाने करदात्यांना मोठा दिलासा दिला आहे. आर्थिक वर्ष 2024-25 (मूल्यांकन वर्ष 2025-26) साठी आयकर

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठीच्या मुदतवाढीवर सुप्रीम कोर्टात मंगळवारी सुनावणी

नवी दिल्ली : महाराष्ट्रात बहुप्रतिक्षित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यासाठी जानेवारी

'वनतारा'चा मोठा विजय! रिलायन्सच्या ‘वनतारा’ला सर्वोच्च न्यायालयाची ‘क्लीन चिट’

नवी दिल्ली: प्राण्यांच्या खरेदी-विक्रीसंदर्भात कायद्याचे उल्लंघन केल्याचा आरोप असलेल्या रिलायन्स