Devendra Fadnavis : १० जागा लढविणाऱ्यांवर कोणाचा विश्वास बसेल का?

देवेंद्र फडणवीसांचा शरद पवारांना खोचक सवाल


पुणे : देशभरात लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी (Loksabha Election 2024) सुरु असताना बडे बडे नेते विरोधकांवर टीका व हल्लाबोल करत आहेत. तर अनेक पक्ष जाहीरनामा प्रसिद्ध करत आहेत. अशातच आज शरदचंद्र पवार (Sharad Pawar) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जाहीरनामा (Manifesto) प्रसिद्ध झाला आहे. यामध्ये त्यांनी अनेक मुद्दे मांडले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी काम केले नाही, त्यामुळे आम्हाला करावे लागत असल्याची टीका, जाहीरनामा प्रसिद्ध करताना राष्ट्रवादीने केली होती. त्याला देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी चोख प्रत्युत्तर दिले आहे.


देशात ५४३ लोकसभा मतदारसंघांपैकी जे १० लोकसभा मतदारसंघातील जागा लढवत आहे, ते जाहीरनामा प्रसिद्ध करतात आणि त्यावर आम्ही असे करू तसे करू, असे म्हणतात. यावर कोणाचा विश्वास बसेल का? असा खोचक सवाल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला विचारला आहे.


भारतीय जनता पक्षाच्या वतीने पुणे लोकसभा मतदारसंघातून मुरलीधर मोहोळ यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मुरलीधर मोहोळ यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी मोठी शक्ती प्रदर्शन करण्यात आले त्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील उपस्थित होते. या वेळी पत्रकारांशी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार आणि त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर निशाणा साधला आहे. भारतीय जनता पक्ष या निवडणुकीत नक्की विजय संपादित करेल, असा विश्वास देखील या वेळी देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.



आम्ही सर्व घटक पक्ष एकत्र


महाराष्ट्रात एकूण ४८ लोकसभा मतदारसंघ आहेत. या मतदारसंघात आम्ही जास्तीत जास्त जागा निवडून येणार असल्याचा दावा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. मात्र, असे असले तरी नेमक्या किती जागा जिंकणार याचा आकडा त्यांनी स्पष्ट केला नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आम्ही सर्व घटक पक्ष एकत्र आहोत. महायुतीमध्ये सर्व आलबेल आहे. महायुतीच्या जागा वाटपाचा तीढा जवळपास सूटला असल्याचा दावा देखील फडणवीस यांनी केला आहे.



बारामतीची जनता मोदींच्या पाठीशी


बारामती लोकसभा मतदारसंघातून सुप्रिया सुळे यांना निवडून देणे म्हणजे राहुल गांधींना निवडून देणे, तर सुनेत्रा पवार यांना निवडून देणे म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विजयी करणे असा त्याचा अर्थ आहे. त्यामुळे बारामतीची जनता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठीशी आहे,असे सांगतात देवेंद्र फडणवीस यांनी सुनेत्रा पवार या बारामती लोकसभा मतदारसंघातून विजयी होतील,असा दावा देखील केला आहे.

Comments
Add Comment

Nashik : नाशिक जिल्ह्यातील 45 हजार नावं शिधापत्रिकेच्या यादीतून हटवली, तुमचंही नाव यादीत तर नाही ना ?

नाशिक : नाशिकमधून एक मोठी बातमी समोर येत आहे. जिल्ह्यातील, 45 हजार 948 आयकरदात्यांची नावं शिधापत्रिकेच्या यादीतून

नाशिक : विभागीय आयुक्तांच्या बनावट स्वाक्षरीने ३५ कोटींची वर्कआॅर्डर, कुंभमेळा कामांत मोठा घोटाळा समोर

नाशिक - नाशिक व श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वरमध्ये कुंभमेळ्यानिमित्त विविध विकासकामे वेगात सुरू असताना, चक्क

नाशिक : काळ्या दगडाच्या तपासासाठी खरातची पोलीस कोठडीची मागणी फेटाळली, आठव्या गुन्ह्यात खरातला थेट...

नाशिक : काळ्या दगडाच्या तपासासाठी खरातची पोलीस कोठडीची मागणी फेटाळली, आठव्या गुन्ह्यात खरातला न्यायालयीन

US And Iran War : पाकिस्तानने अमेरिकेच्या नाकेबंदी दरम्यान इराणसाठी सहा भूमार्ग केले खुले

वॉशिंग्टन : पाकिस्तान सध्या अमेरिका आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या संघर्षात मुख्य मध्यस्थाची भूमिका बजावत

लक्ष द्या ! 1 मे पासून एलपीजी सिलेंडरच्या नियमांमध्ये होणार 'हे' मोठे बदल , आताच जाणून घ्या

LPG Cylinder Booking Rule : घरांपासून ते मोठ्या हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्सपर्यंत सर्वत्र एलपीजीचा वापर केला जातो. मध्य पूर्वेतील

Mumbai-Pune Expressway Missing Link : महाराष्ट्र दिनाच्या मुहूर्तावर मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरील ‘मिसिंग लिंक’ वाहतुकीसाठी खुली

- पहिल्या टप्प्यात अवजड वाहनांना प्रवेशबंदी; प्रवास होणार अधिक जलद व सुरक्षित मुंबई आणि पुणे दरम्यानचा प्रवास