Nitin Gadkari : नितीन गडकरी यांना भरसभेत आली भोवळ

  108

यवतमाळ : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सभा आणि रॅली यांचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. प्रचारसभांमुळे नेते मंडळीची देखील धावपळ होत आहे. त्यामध्ये उन्हाचा पारा राज्यामध्ये ४० अंश पार झाल्यामुळे सुर्य देखील आग ओकत आहे. याचा परिणाम राजकीय नेत्यांच्या आरोग्यावर देखील होताना दिसत आहे. परभणीमध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांना भरसभेमध्ये भोवळ आली.


कडक उन्हाळ्यामध्ये भाजपाचे अमित शाह यांचा देखील अमरावतीमध्ये प्रचार दौरा आहे. यावेळी भाषणादरम्यान केंद्रीय मंत्री आणि भाजपा नेते नितीन गडकरी यांना भोवळ आली. सदर घटना यवतमाळच्या पुसदमध्ये घडली. गडकरींना बोलता बोलता भोवळ आल्यामुळे प्रचारसभेच्या मंचावरील नेते, कार्यकर्ते तातडीने त्यांच्या मदतीला धावले.


दरम्यान, काही दिवसांपूर्वी ठाकरे गटाचे आमदार कैलास पाटील यांना देखील उष्माघाताने चक्कर आली होती. धाराशिवमध्ये कडाक्याच्या उन्हामध्ये खासदार ओमराजे निंबाळकर यांची प्रचाररॅली सुरु होती. रॅलीमध्येच त्यांना अचानक भोवळ आली. आमदार कैलास पाटील यांना तातडीने रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. यावेळी त्यांना उष्माघातामुळे हा त्रास झाला असल्याचे सांगण्यात आले. आता नितीन गडकरी यांना उन्हाचा त्रास झाला आहे. त्यामुळे उन्हाचा तडाखा वाढलेला असताना राजकीय नेत्यांना प्रचार सभांचा त्रास होत असल्याचे समोर आले आहे.

Comments
Add Comment

महिलांना नेतृत्वाची संधी ! जिल्ह्यातील ७७५ सरपंच पदाचं आरक्षण जाहीर, महिलांची आकडेवारी किती ?

मुंबई : राज्यातील ग्रामीण भागात ७५५ ग्रामपंचायतींचे आरक्षण नुकतेच जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे २०११ च्या

Pune Metro : पुणेकरांची गर्दीतून सुटका! लवकरच मेट्रोच्या ताफ्यात १५ नव्या ट्रेन, ४५ डबे वाढणार अन्...

पुणे : पुणेकरांसाठी दिलासादायक बातमी आहे. मेट्रोच्या ताफ्यात आगामी काळात १५ नव्या ट्रेन म्हणजेच एकूण १५ डबे

ST : राज्यातील सर्वात मोठे स्क्रॅपिंग सेंटर (भंगार केंद्र) एसटीच्या जागेवर उभारले जाणार, 'एसटी'साठी उत्पन्नाचा नवा स्त्रोत...

मुंबई : एसटी विभागीतल जुनी वाहने  स्क्रॅप करून त्याचे सुटे भाग पुन्हा वापरात येणार नाहीत, अशा पद्धतीने त्यांची

मुंबई-गोवा महामार्ग: १८ वर्षांची प्रतीक्षा, खड्डेमय प्रवास अन् अपघातांचा धोका कायम!

मुंबई : मुंबई-गोवा महामार्गाचे काम गेली १८ वर्षांपासून रखडलेले असतानाच, या पावसाळ्यातही प्रवाशांचे हाल कायम

राज्यात ५१ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या

नाशिक : राज्यातील ५१ पोलीस अधीक्षक आणि अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या बदल्या करण्यात आल्या असून त्यामध्ये नाशिक

Chandrashekhar Bawankule: मर्सिडीजमधून फिरणाऱ्या, आणि फार्म हाऊसवाल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी नाही; महसूलमंत्री बावनकुळे स्पष्टच बोलले

अमरावती: राज्यात शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची मागणी जोर धरत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या