CM Eknath Shinde : महाविकास आघाडीच्या अहंकारामुळेच राज्याचे वाटोळे झाले : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Share

राहाता : राज्यातील महायुती सरकारकडे आत्मविश्वास असल्याने या जोरावरच राज्यात विकास कामे वेगाने सुरू आहेत. तर महाविकास आघाडीकडे अहंकार आहे. या अहंकारामुळेच राज्याचे वाटोळे झाले असल्याची टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी महाविकास आघाडी विरोधात केली.

शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार खा. सदाशिव लोखंडे यांचा उमेदवारी अर्ज सोमवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या उपस्थितीत दाखल करण्यात आला. यानंतर राहाता शहरातील विरभद्र महाराज मंदिरासमोरील प्रांगणात आयोजित केलेल्या सभेत मुख्यमंत्री शिंदे बोलत होते. यावेळी माजीमंत्री अण्णासाहेब म्हस्के,मंत्री दादा भुसे, शिक्षणमंत्री दिपक केसरकर, विधानपरिषदेच्या सभापती नीलम गोऱ्हे, राष्ट्रवादी काँग्रेसचे आ. किरण लहामटे,आ.आशुतोष काळे,माजी आ. भाऊसाहेब कांबळे, माजी मंत्री बबनराव घोलप, रामदास कदम, भाजपचे जिल्हाध्यक्ष विठ्ठल लंघे, जेष्ठ नेते मधुकर पिचड, राष्ट्रवादीचे अविनाश आदिक, माजी आ. बाळासाहेब मुरकुटे, आ.प्रवीण दरेकर, कैलास बापू कोते, राजेंद्र पिपाडा, सचिन तांबे, राजेंद्र गोंदकर, संजय भोर, कमलाकर कोते, संदीप सोनवणे, मनसेचे राजेश लुटे, विजय मोगले यांच्यासह मोठ्या संख्येने महायुतीचे कार्यकर्ते उपस्थित होते.

घरात बसून राज्य करता येत नाही. त्यासाठी रस्त्यावर उतरावे लागते. आपण फेस टू फेस काम करतो. फेसबुक लाईव्ह नाही. माझ्या कामामुळे मी राज्यात महायुती सरकारच्या माध्यमातून परिवर्तन करू शकलो याचा आनंद वाटत असल्याचे स्पष्ट करून मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, मी सर्वसामान्यांचे सरकार स्थापन केले आहे. संविधान दिन साठ वर्षात कधीही काँग्रेसने साजरा केला नाही, मोदींनी देशात संविधान दिन साजरा करण्यास सुरुवात केली आहे. काँग्रेसने दलित व मुस्लिमांंचा वापर व्होट बँक म्हणून केला आहे.जातीपातीचे राजकारण करणाऱ्या पासून सावध राहा असे आवाहन करून मुख्यमंत्री शिंदे यांनी केले.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, उत्तर महाराष्ट्रातील सर्व सिंचन प्रकल्प भविष्यात पूर्ण करण्यात येणार आहे.तसेच पाणी प्रश्नावरून मराठवाडा व उत्तर महाराष्ट्र हा वाद कायमस्वरूपी संपण्यासाठी पश्चिमेला वाहून जाणारे पाणी गोदावरी खोऱ्यात वळविण्यात येण्याच्या कामाच्या हालचाली सुरू झाल्या असून त्यामुळे गोदावरी खोऱ्यात अधिकचे पाणी उपलब्ध होणार असल्याने या भागातील शेतकरी सुजलाम सुफलाम होणार आहे.प्रारंभी महसूल तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी प्रास्ताविकात खा.लोखंडे मोठ्या मताधिक्याने निवडून येतील अशी ग्वाही त्यांनी उपस्थितांना दिली.

Recent Posts

Hair Fall: केसगळती रोखायची असेल तर जरूर खा हे पदार्थ, हेअरफॉल होईल कमी

मुंबई: केसगळती(hair fall) ही सध्याची मोठी समस्या बनली आहे. थोडेफार केस गळणे ही सामान्य बाब…

1 min ago

मॉस्कोमध्ये पंतप्रधान मोदींचे ग्रँड वेलकम, एअरपोर्ट ते हॉटेलपर्यंत असे झाले स्वागत

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी हे रशियाची राजधानी मॉस्को येथे पोहोचले आहेत. राष्ट्रपती व्लादीमीर पुतिन…

56 mins ago

Palghar news : रस्त्यातील खड्ड्यात आदळली बाईक! हातातून निसटल्याने दीड वर्षीय बाळाचा मृत्यू

मुसळधार पावसाचा पालघरमध्ये पहिला बळी पालघर : मुंबई, ठाण्यासह उपनगरीय भागात काल रात्रभर जोरदार पाऊस…

5 hours ago

सक्शन पंपात बिघाड, कांदिवली तुंबली!

मुंबई : कांदिवली पश्चिमेकडील पोयसर नदीवर बसवण्यात आलेल्या सक्शन पंपाचे पाईप फुटल्याने आज कांदिवलीत मोठ्या…

6 hours ago

CM Eknath Shinde : गरज असेल तरच घराबाहेर पडण्याचे मुख्यमंत्र्यांचे आवाहन

मुंबई मनपा, पोलीस प्रशासन आणि आपत्कालीन यंत्रणेला सहकार्य करा : एकनाथ शिंदे अजित पवार यांनीही…

7 hours ago

ST Bus : मुसळधार पावसामुळे रेल्वेसेवा ठप्प! जाणून घ्या एसटी बस कुठून व कधी सुटणार?

हार्बर रेल्वे तसेच मेल एक्स्प्रेस रद्द झाल्याने अडकलेल्या प्रवाशांच्या सोयीसाठी बससेवा मुंबई : मुंबईत काल…

7 hours ago