धावत्या रेल्वेत कसे ऑर्डर करणार बाहेरचे जेवण? ही आहे पद्धत

मुंबई: भारतीय रेल्वे(indian railway) आता जगातील सर्वात चांगली सुविधा देणारी रेल्वे सेवा बनत आहे. रेल्वेच्या प्रवासादरम्यान आता लोकांना बऱ्याच सुविधा मिळतात. याआधी लोकांना रेल्वेच्या आत जे काही खायला मिळत असे तेच ऑर्डर करता येत होते. मात्र आता लोक रेल्वेमध्ये बसल्या-बसल्या बाहेरचे खाणे ऑर्डर करू शकतात. जाणून घ्या कसे ते...



अॅप अथवा व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून मागवू शकता


भारीय रेल्वे प्रवाशांसाठी सतत चांगल्या सोयीसुविधा आणत आहे. आता प्रवाशांना आपल्या आवडीचे खाणे रेल्वेत बसल्या बसल्या मिळणार आहे. आयआरसीटीसीकडून यासाठी वेगळी वेबसाईट बनवण्यात आली आहे. जेवण ऑर्डर करम्यासाठी तुम्ही www.ecatering.irctc.co.in वेबसाईटवर जाऊन ऑर्डर करू शकता.


सोबतच भारतीय रेल्वेकडून +91-8750001323 हा व्हॉट्सअॅप नंबरही जारी करण्यात आला आहे. यावर मेसेज पाठवून तुम्ही जेवण ऑर्डर करू शकता. तुम्ही केवळ जेवणच ऑर्डर करू शकत नाहीत तर तुमची ऑर्डर कुठपर्यंत आली हे ही पाहू शकता.



असे करू शकता ऑनलाईन ऑर्डर


रेल्वेमध्ये ऑनलाईन खाणे मागवण्यासाठी तुम्हाला सगळ्यात आधी www.ecatering.irctc.co.in या वेबसाईटवर जावे लागेल. यानंतर तुम्हाला तुमच्या रेल्वेचा नंबर आणि बोर्डिंगची तारीख निवडावी लागेल. यानंतर तुम्हाला स्टेशन निवडावे लागेल. यानंतर फाईंड फूड ऑप्शनवर क्लिक करावे लागेल.


यानंतर तुम्हाला रेस्टॉरंट निवडावे लागेल. यानंतर पीएनआर नंबर टाकून तुम्ही तुमचे खाणे ऑर्डर करू शकता. याशिवाय स्विगी, झोमॅटोसह अनेक फूड डिलीव्हरी कंपन्या आयआरसीटीसीसोबत मिळून प्रवाशांपर्यंत खाणे पोहोचवण्याचे काम करत आहेत.

Comments
Add Comment

पश्चिम बंगालच्या मतदार यादीतून ५८ लाख नावे वगळली

१२ लाखांहून अधिक मतदार ‘बेपत्ता’ असल्याचे विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेत स्पष्ट कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये

भारताच्या शिरपेचात अजून एक मानाचा तुरा! इथियोपियाच्या प्रतिष्ठीत ‘ग्रेट ऑनर निशान’ने पंतप्रधान मोदी सन्मानित

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना इथिओपिया देशाने ‘ग्रेट ऑनर निशान’ने सन्मानित केले आहे. मोदींना

पहलगाम अतिरेकी हल्ला, एनआयएने ५८ मार्ग आणि शेकडो किमी. जंगलात तपास करुन दाखल केले आरोपपत्र

नवी दिल्ली : राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) पहलगाम अतिरेकी हल्ला प्रकरणी सात जणांविरोधात आरोपपत्र दाखल केले.

मणिपूरमध्ये १४ दहशतवाद्यांना अटक, मोठा शस्त्रसाठा जप्त

इंफाळ : भारतीय लष्कर, आसाम रायफल्स आणि मणिपूर पोलीस यांनी डोंगराळ भागात संयुक्त कारवाई केली. या कारवाईत सुरक्षा

मोदी सरकार १२५ दिवसांची रोजगार गॅरेंटी देणारी योजना आणणार

दिल्ली : केंद्र सरकार मनरेगाच्या जागी नवीन रोजगार योजना आणण्याच्या तयारीत आहे. नरेंद्र मोदी सरकार महात्मा गांधी

देवाला एक मिनीटही विश्रांती घेऊ देत नाहीत...

'पैसेवाल्यांसाठी देवतेला जास्त त्रास' वृंदावनच्या बांके बिहारी मंदिर व्यवस्थापनावर सर्वोच्च न्यायालयाचा