धावत्या रेल्वेत कसे ऑर्डर करणार बाहेरचे जेवण? ही आहे पद्धत

मुंबई: भारतीय रेल्वे(indian railway) आता जगातील सर्वात चांगली सुविधा देणारी रेल्वे सेवा बनत आहे. रेल्वेच्या प्रवासादरम्यान आता लोकांना बऱ्याच सुविधा मिळतात. याआधी लोकांना रेल्वेच्या आत जे काही खायला मिळत असे तेच ऑर्डर करता येत होते. मात्र आता लोक रेल्वेमध्ये बसल्या-बसल्या बाहेरचे खाणे ऑर्डर करू शकतात. जाणून घ्या कसे ते...



अॅप अथवा व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून मागवू शकता


भारीय रेल्वे प्रवाशांसाठी सतत चांगल्या सोयीसुविधा आणत आहे. आता प्रवाशांना आपल्या आवडीचे खाणे रेल्वेत बसल्या बसल्या मिळणार आहे. आयआरसीटीसीकडून यासाठी वेगळी वेबसाईट बनवण्यात आली आहे. जेवण ऑर्डर करम्यासाठी तुम्ही www.ecatering.irctc.co.in वेबसाईटवर जाऊन ऑर्डर करू शकता.


सोबतच भारतीय रेल्वेकडून +91-8750001323 हा व्हॉट्सअॅप नंबरही जारी करण्यात आला आहे. यावर मेसेज पाठवून तुम्ही जेवण ऑर्डर करू शकता. तुम्ही केवळ जेवणच ऑर्डर करू शकत नाहीत तर तुमची ऑर्डर कुठपर्यंत आली हे ही पाहू शकता.



असे करू शकता ऑनलाईन ऑर्डर


रेल्वेमध्ये ऑनलाईन खाणे मागवण्यासाठी तुम्हाला सगळ्यात आधी www.ecatering.irctc.co.in या वेबसाईटवर जावे लागेल. यानंतर तुम्हाला तुमच्या रेल्वेचा नंबर आणि बोर्डिंगची तारीख निवडावी लागेल. यानंतर तुम्हाला स्टेशन निवडावे लागेल. यानंतर फाईंड फूड ऑप्शनवर क्लिक करावे लागेल.


यानंतर तुम्हाला रेस्टॉरंट निवडावे लागेल. यानंतर पीएनआर नंबर टाकून तुम्ही तुमचे खाणे ऑर्डर करू शकता. याशिवाय स्विगी, झोमॅटोसह अनेक फूड डिलीव्हरी कंपन्या आयआरसीटीसीसोबत मिळून प्रवाशांपर्यंत खाणे पोहोचवण्याचे काम करत आहेत.

Comments
Add Comment

बिहारमध्य राजदने राहुल गांधींना बनवलं उल्लू

पाटणा : बिहार विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम अद्याप जाहीर झालेला नाही. पण बिहारसाठी राजकीय पक्षांचा प्रचार हळू

पीएच. डी. शिकणाऱ्या परदेशी विद्यार्थिनीचा संशयास्पद मृत्यू

लखनऊ (वृत्तसंस्था) : उत्तर प्रदेशातील प्रख्यात बनारस हिंदू विद्यापीठात शिकणाऱ्या २७ वर्षीय परदेशी

फटाकेबंदीबाबत देशव्यापी धोरण आखा

सर्वोच्च न्यायालयाची केंद्र सरकारला सूचना नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दिल्ली-राष्ट्रीय राजधानी क्षेत्रातच

वर्गमित्रांनीच ८ विद्यार्थ्यांच्या डोळ्यांत टाकले फेविक्विक

भुवनेश्वर (वृत्तसंस्था) : ओडिशाच्या कंधमाल जिल्ह्यातील फिरिंगिया ब्लॉकमधील सलागुडा येथील सेवाश्रम शाळेत सर्व

भारत सर्वाधिक लठ्ठ मुलांचा देश : युनिसेफ

खाद्यपदार्थांच्या लेबलमुळे ओळखता येणार पदार्थ नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दहा वर्षांत भारत हा जगातील सर्वाधिक

आजारी असल्याने बॉसकडे रजा मागितली आणि १० मिनिटांतच झाला मृत्यू, नेमकं घडलं तरी काय...

नवी दिल्ली: एका कर्मचाऱ्याने त्याच्या बॉसला पाठवलेला मेसेज आणि त्यानंतर १० मिनिटांतच त्याचा झालेला मृत्यू या