CM Eknath Shinde : राज्यसभेच्या निवडणुकीत ठाकरेंनी कहरच केला, मग माझा संयम सुटला!

आदित्य ठाकरेंकडून प्रचंड अपमानास्पद वागणूक, माझ्या खात्यात ढवळाढवळ


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले गौप्यस्फोट


मुंबई : ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी एका इंग्रजी वर्तमानपत्राला दिलेल्या मुलाखतीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याबाबत एक दावा केला आणि भाजप नेते संतापले. फडणवीस आदित्य ठाकरेंना (Aditya Thackeray) मुख्यमंत्रीपदाचं मार्गदर्शन करुन मग राष्ट्रीय राजकारणात सहभागी होणार होते, असं उद्धव ठाकरे म्हणाले. यावर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी एक मोठा गौप्यस्फोट केला आहे. 'त्यावेळी मी मंत्री असूनही मला आदित्य ठाकरेंकडून प्रचंड अपमानास्पद वागणूक मिळायची, माझ्या खात्यात ढवळाढवळ केली जायची. राज्यसभेच्या निवडणुकीवेळी तर उद्धव ठाकरेंनी कहरच केला, मग माझा संयम सुटला', असं मुख्यमंत्री शिंदे म्हणाले आहेत.


मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, महाविकास आघाडी सरकार काळात मला अतिशय अपमानास्पद वागणूक मिळाली. नगरविकास खात्याचा मंत्री असताना आदित्य ठाकरेंचा माझ्या खात्यात खूप हस्तक्षेप होता. मला कधीही स्वतंत्रपणे काम करू दिले गेले नाही. आदित्य ठाकरे कायमच ढवळाढवळ करत होते. नगरविकास, एमएमआरडीए, सिडको आणि महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या बैठकांना ते उपस्थित राहायचे. नगरविकास खाते काढून घेण्याचा ठाकरेंचा डाव होता, असा आरोप मुख्यमंत्र्यांनी केला.



राज्यसभेच्या निवडणुकीत ठाकरेंनी कहरच केला


पुढे ते म्हणाले, मला नक्षलवाद्यांकडून धोका होता. अनेक वेळा धमक्या देखील मिळाल्या होत्या. नक्षलवाद्यांचा धोका असूनही मला Z+ सिक्युरिटी देण्यात आली नव्हती. आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री होण्याच्या मार्गात मी अडथळा ठरेन, असे त्यांना वाटत होते. आदित्य ठाकरे यांच्याकडून सतत अपमान केला जात होता. मंत्री असून देखील वर्षावर बोलावून ताटकळत ठेवलं जात होतं. राज्यसभेच्या निवडणुकीत तर कहरच केला. राज्यसभेचा उमेदवार ठरवताना मला सहभागी करून घेतलं नाही या प्रक्रियेपासून दूर ठेवले तेव्हा माझा संयम सुटला, असा गौप्यस्फोट मुख्यमंत्र्यांनी केला.

Comments
Add Comment

Water Cut : पुण्यात सोमवारपासून २५ टक्के पाणीकपात

पुणे : यंदा पावसाळा लांबल्यामुळे आणि धरणसाठ्यात घट झाल्याने पुणे महापालिकेने पाणीपुरवठ्यात २५ टक्के कपात

Konkan Railway : कोकण रेल्वे दुपदरीकरणासाठी तांत्रिक तपासणी सुरू

रत्नागिरी : वाढती प्रवासी आणि मालवाहतूक, वारंवार विस्कळीत होणारे वेळापत्रक आणि गणेशोत्सव काळातील अतिरिक्त

Nasrapur : नसरापूर खटल्याची सुनावणी अंतिम टप्प्यात

पुणे  : संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडवून दिलेल्या नसरापूर येथील चिमुकलीवरील अत्याचार आणि खून खटल्याची सुनावणी

Pandharpur : पंढरपूरच्या विठ्ठलाचे दर्शन दोन दिवस बंद राहणार

पंढरपूर : पंढरपुरचे विठ्ठल मंदिर २३ आणि २४ जून रोजी विठ्ठल मंदिर सर्व प्रकारच्या दर्शनासाठी पूर्णपणे बंद राहणार

Raigad News: आईने चार मुलांना विषारी थंडपेय पाजून स्वतःही केले विषप्राशन; तिघांचा मृत्यू, दोन मुलांची प्रकृती गंभीर

रायगड : रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यात घडलेल्या एका हृदयद्रावक घटनेने संपूर्ण

Palghar Crime : पालघरमध्ये भररस्त्यात तरुणीवर कोयत्याने जीवघेणा हल्ला; CCTV व्हायरल, प्रकृती चिंताजनक

Palghar Crime : पालघर : पालघर (Palghar) शहरात भरदिवसा एका तरुणीवर कोयत्याने जीवघेणा हल्ला (Attack) झाल्याची धक्कादायक घटना समोर आली