CM Eknath Shinde : राज्यसभेच्या निवडणुकीत ठाकरेंनी कहरच केला, मग माझा संयम सुटला!

आदित्य ठाकरेंकडून प्रचंड अपमानास्पद वागणूक, माझ्या खात्यात ढवळाढवळ


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले गौप्यस्फोट


मुंबई : ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी एका इंग्रजी वर्तमानपत्राला दिलेल्या मुलाखतीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याबाबत एक दावा केला आणि भाजप नेते संतापले. फडणवीस आदित्य ठाकरेंना (Aditya Thackeray) मुख्यमंत्रीपदाचं मार्गदर्शन करुन मग राष्ट्रीय राजकारणात सहभागी होणार होते, असं उद्धव ठाकरे म्हणाले. यावर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी एक मोठा गौप्यस्फोट केला आहे. 'त्यावेळी मी मंत्री असूनही मला आदित्य ठाकरेंकडून प्रचंड अपमानास्पद वागणूक मिळायची, माझ्या खात्यात ढवळाढवळ केली जायची. राज्यसभेच्या निवडणुकीवेळी तर उद्धव ठाकरेंनी कहरच केला, मग माझा संयम सुटला', असं मुख्यमंत्री शिंदे म्हणाले आहेत.


मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, महाविकास आघाडी सरकार काळात मला अतिशय अपमानास्पद वागणूक मिळाली. नगरविकास खात्याचा मंत्री असताना आदित्य ठाकरेंचा माझ्या खात्यात खूप हस्तक्षेप होता. मला कधीही स्वतंत्रपणे काम करू दिले गेले नाही. आदित्य ठाकरे कायमच ढवळाढवळ करत होते. नगरविकास, एमएमआरडीए, सिडको आणि महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या बैठकांना ते उपस्थित राहायचे. नगरविकास खाते काढून घेण्याचा ठाकरेंचा डाव होता, असा आरोप मुख्यमंत्र्यांनी केला.



राज्यसभेच्या निवडणुकीत ठाकरेंनी कहरच केला


पुढे ते म्हणाले, मला नक्षलवाद्यांकडून धोका होता. अनेक वेळा धमक्या देखील मिळाल्या होत्या. नक्षलवाद्यांचा धोका असूनही मला Z+ सिक्युरिटी देण्यात आली नव्हती. आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री होण्याच्या मार्गात मी अडथळा ठरेन, असे त्यांना वाटत होते. आदित्य ठाकरे यांच्याकडून सतत अपमान केला जात होता. मंत्री असून देखील वर्षावर बोलावून ताटकळत ठेवलं जात होतं. राज्यसभेच्या निवडणुकीत तर कहरच केला. राज्यसभेचा उमेदवार ठरवताना मला सहभागी करून घेतलं नाही या प्रक्रियेपासून दूर ठेवले तेव्हा माझा संयम सुटला, असा गौप्यस्फोट मुख्यमंत्र्यांनी केला.

Comments
Add Comment

Intelligence Bureau : पालघरमध्ये 'इंटेलिजन्स ब्युरो'साठी हक्काची जागा

- महसूल विभागाचा मोठा निर्णय; वसईत कार्यालय आणि निवासस्थानांचा मार्ग मोकळा मुंबई : पालघर जिल्ह्याच्या

Cyclone Shelter Center in Dapoli : दापोली तालुक्यातील चक्रीवादळ निवारा केंद्रासाठी महसूलकडून विनामूल्य जागा

मुंबई : कोकण किनारपट्टीवरील आपत्ती व्यवस्थापन अधिक सक्षम करण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला

Onion processing industry: कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या हितासाठी कांदा प्रक्रिया उद्योगास चालना देणार - मंत्री जयकुमार रावल

मुंबई : राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना कांदा दरातील चढ-उतारांपासून संरक्षण मिळून स्पर्धात्मक दर मिळावा,

Industries Minister Dr. Uday Samant : पांढरकवडा येथे 86 हेक्टरवर नवीन औद्योगिक क्षेत्र स्थापनेला गती - उद्योग मंत्री डॉ.उदय सामंत

मुंबई : यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा तालुक्यात औद्योगिक विकासाला चालना देण्यासाठी केळापूर तालुक्यातील मौजे

Industries Minister Dr. Uday Samant - 'एमआयडीसी’कडे लवकरच हस्तांतरित करणार : उद्योग मंत्री डॉ.उदय सामंत

मुंबई : धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील विखरन येथील 250 मेगावॅट सौर ऊर्जा प्रकल्पासाठी संपादित जमिनीपैकी

Ashok Kharat : 'लक्ष्मण' ते भोंदूबाबा 'अशोक खरात'; ४० वर्षांपूर्वीच गावकऱ्यांनी दिला होता बेदम चोप!

अहिल्यानगर : महिलांच्या लैंगिक शोषणाप्रकरणी सध्या तुरुंगात असलेल्या अशोक खरात याच्या कृत्यांची मुळं चाळीस