Sangli Lok Sabha : सांगलीत बंडखोरी करणार्‍या विशाल पाटलांवर मविआचा दबाव

  108

निलंबनाची कारवाई करण्याचा दिला इशारा


सांगली : महाविकास आघाडीतल्या वादामुळे सांगली लोकसभेची (Sangli Lok Sabha) जागा गेल्या काही दिवसांपासून प्रचंड चर्चेत आहे. या ठिकाणी ठाकरे गटाने (Thackeray group) कोणत्याही सल्लामसलतीशिवाय आपला उमेदवार जाहीर केला. त्यामुळे काँग्रेसचे (Congress) नेते अत्यंत नाराज झाले. मात्र, अंतिम जागावाटपातही ही जागा ठाकरे गटाकडेच राहिली. त्यामुळे या ठिकाणी काँग्रेसचे संभाव्य उमेदवार विशाल पाटील (Vishal Patil) यांनी अपक्ष लढण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या समर्थनार्थ अनेक कार्यकर्ते उभे राहिले आहेत. याचा धक्का मविआला पोहोचणार असून निवडणुकीत सांगलीमध्ये मविआचं नुकसान होणार आहे. त्यामुळे मविआने विशाल पाटलांवर दबाव टाकण्यास सुरुवात केली आहे.


सांगली लोकसभा मतदारसंघात पक्ष आणि महाविकास आघाडीच्या विरोधात बंड कराल तर निलंबनाची कारवाई करावी लागेल, असा इशारा प्रदेश काँग्रेस समितीने विशाल पाटील यांना दिला आहे. विशाल यांच्या माघारीसाठी उद्धव ठाकरे यांच्याकडून काँग्रेसवर प्रचंड दबाव टाकला जात आहे. दिल्लीतील काँग्रेसचे राष्ट्रीय नेतृत्वही आमदार विश्वजित कदम (Vishwajeet Kadam) यांच्या माध्यमातून त्यासाठी प्रयत्न करताना दिसत आहे.


विशाल पाटील यांच्या बंडामुळे सांगलीची निवडणूक खासदार संजय पाटील (Sanjay Patil) विरुद्ध विशाल पाटील अशी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या घडामोडीत अद्याप सांगली काँग्रेसने महाविकास आघाडीला पाठिंबा दिलेला नाही. राष्ट्रवादीचे काही प्रमुख नेते चंद्रहार यांच्यासोबत दिसत असले तरी, ग्राउंडवरील काँग्रेस कार्यकर्ते विशाल यांच्या प्रचारात उतरल्याचे दिसत आहे. काँग्रेसचे प्रमुख नेते चंद्रहार यांच्या प्रचारापासून चार हात दूर आहेत. त्यामुळे मविआसाठी बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे.


मतदारसंघातील बहुतांश काँग्रेस नेते आणि कार्यकर्तेही विशाल यांच्या प्रचारात उघड किंवा गुप्तपणे उतरलेले आहेत. या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीतील प्रमुख नेत्यांनी सांगलीत विशाल यांची माघार हा कळीचा मुद्दा बनवला आहे. प्रदेश काँग्रेसच्या नेत्यांनी विशाल पाटील यांच्याशी संपर्क साधत त्यांनी फेरविचार करावा, अन्यथा पक्षशिस्त भंग केल्याच्या प्रकरणी निलंबनाची कारवाई करावी लागेल, असा इशारा दिला आहे. मात्र, विशाल पाटील यांनी कोणत्याही दबावाला बळी न पडता आरपारची लढाई करावी, असे आवाहन आज दिवसभर त्यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांना भेटून केले.

Comments
Add Comment

राज्यात ५१ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या

नाशिक : राज्यातील ५१ पोलीस अधीक्षक आणि अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या बदल्या करण्यात आल्या असून त्यामध्ये नाशिक

Chandrashekhar Bawankule: मर्सिडीजमधून फिरणाऱ्या, आणि फार्म हाऊसवाल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी नाही; महसूलमंत्री बावनकुळे स्पष्टच बोलले

अमरावती: राज्यात शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची मागणी जोर धरत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या

ST : विना तिकिट प्रवास करणाऱ्यांवर कारवाई, एसटीने वसूल केला ३ लाखांचा दंड...

पुणे : विना तिकिट प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर एसटी महामंडळाने कारवाई करण्यासाठी सुरवात केली आहे. २०२४-२०२५ या

Samruddhi Mahamarg Accident : समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, आलिशान मर्सिडीजने ३ वेळा पलटी घेतली अन्...;

नाशिकच्या प्रसिद्ध उद्योजकाचा मृत्यू नागपूर : समृद्धी महामार्गावर (Samruddhi Mahamarg) भीषण अपघाताची (Accident News) आणखी एक घटना

Pandharpur Vitthal Mandir: आषाढी वारीनिमित्त विठुरायाचं आजपासून २४ तास दर्शन सुरू

पंढरपूर: पंढरपूरची वारी हा महाराष्ट्रातील एक महत्त्वपूर्ण धार्मिक आणि सांस्कृतिक उत्सव असतो. या वारीत

Pune Airport: प्रवाशांना घेऊन विमान पुण्यात तर आलं, पण सामान मागेच राहीलं!

स्पाइसजेटच्या दुबई-पुणे विमानाने इंधन भारामुळे प्रवाशांचे सामान न घेताच पुण्यात लँडिंग केले.  पुणे:  दुबईहून