Thane RTO: मुजोर रिक्षा चालकांवर ठाणे आरटीओची धडक कारवाई!

  153

अवघ्या १७ दिवसात तब्बल १० लाखांचा दंड वसूल


ठाणे : ठाणे स्थानक परिसरातून रिक्षाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या लक्षणीय आहे. त्यातच रिक्षाचालक प्रवाशांकडून अव्वाच्या सव्वा भाडे आकारणी, प्रवाशांशी हुज्जत घालणे, वाहतूक नियमांची पायमल्ली केली जाते. अशा मुजोर रिक्षा चालकांना शिस्त लागण्यासाठी ठाणे प्रादेशिक परिवहन विभागाने धडक मोहीम राबवली आहे.


बेशिस्त रिक्षा चालकांना शिस्त लागण्यासाठी या विभागाने १ ते १७ एप्रिल या काळात अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या रिक्षा चालकांवर कायदेशीर कारवाई केली होती. गेल्या सतरा दिवसात तब्बल ६५० रिक्षा चालकांवर कारवाई केली असून त्यांच्याकडून तब्बल १० लाखांचा दंड वसूल केला असल्याची माहिती सहाय्यक परिवहन अधिकारी प्रसाद नलवडे यांनी दिली.


पोलिसांनी ठरवून दिलेल्या रांगेत उभे न राहता हे मुजोर रिक्षा चालक रेल्वे फ्लॅटफॉर्म क्रमांक १ आणि २ च्या प्रवेशद्वारावर उभे राहून प्रवाशांची दिशाभूल करून गाडीत बसवतात आणि जास्त भाड्याची आकारणी करतात. अशा रिक्षा चालकांवर विभागाने ठाणे प्रादेशिक परिवहन कारवाई केली आहे. बेशिस्त रिक्षा चालकांना शिस्त लागेपर्यंत ही कारवाई सुरूच राहणार आहे. त्यामुळे या रिक्षा चालकांचे धाबे दणाणले आहेत.



दंडासह परवाना आणि लायसन्स निलंबनाची कारवाई


नियम डावलून जर कोणी रिक्षा चालक वर्तन करताना आढळून आला तर त्याच्यावर कडक कारवाई होणार आहे. तसेच नियमभंग करणाऱ्या रिक्षाचालकांविरुद्ध दंडात्मक कारवाईसह परवाना निलंबन आणि लायसन्स निलंबनाची देखील कारवाई करण्यात येणार आहे, असे ठाणे येथील उपप्रादेशिक परिवहन अधिकारी जयंत पाटील यांनी सांगितले.

Comments
Add Comment

‘शाळा प्रवेशोत्सवा’च्या माध्यमातून होणार विद्यार्थ्यांचे स्वागत

मुंबई : पुढील शैक्षणिक वर्षाची सुरुवात विदर्भ वगळता इतर सर्व विभागांत सोमवार दि. १६ जून रोजी तर विदर्भात सोमवार

जामखेडमध्ये प्रहार आक्रमक; कर्जमाफी व दिव्यांगांना मदत करा

प्रहार जनशक्ती पक्षाचे तहसीलदारांना निवेदन जामखेड : प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख बच्चुभाऊ कडु यांचे गेल्या

निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीतील वारकऱ्यांची गैरसोय होऊ देऊ नका

आ. खताळ यांच्या अधिकाऱ्यांना सक्त सूचना संगमनेर : संत निवृतीनाथ महाराजांच्या पालखी मार्गाच्या कामाची तसेच

संगमनेरात दहशत व लुटमार करणाऱ्या टोळ्या जेरबंद

१ लाख ५५ हजारांचा मुद्देमाल जप्त संगमनेर : संगमनेर शहरातील अकोले नाका व परिसरात नागरिकांना मारहाण करुन

साई मंदिरात आता हार-फुले नेता येणार

तदर्थ समितीचा निर्णय शिर्डी : काश्मीर येथील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भाविकांच्या

राज ठाकरे महायुतीमध्ये आल्यास आनंदच होईल - उदय सामंत

नाशिक : महायुतीमध्ये नवीन कोणी आलं तर त्याचा आम्ही स्वागतच करू, असे स्पष्ट करून राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत