Neelam Gorhe : संजय राऊत हिरो बनण्याच्या नादात झिरो बनले!

  61

महिलांवर गलिच्छ भाषेत आरोप करणाऱ्या संजय राऊतांवर निवडणूक आयोगाने कारवाई करावी


नीलम गोऱ्हे यांनी घेतला राऊतांचा खरपूस समाचार


अमरावती : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) कायम बेताल वक्तव्ये करुन वादाच्या भोवर्‍यात सापडतात. आतापर्यंत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्यावर खालच्या पातळीवर केलेल्या टीकेमुळे भाजप नेते त्यांच्यावर प्रचंड संतापलेले आहेत. त्यातच आता भाजपच्या महिला उमेदवाराविषयी अत्यंत नीच दर्जाची टीका करुन त्यांनी स्वतःहून संकट ओढावून घेतले आहे. भाजपच्या अमरावतीतील उमेदवार नवनीत राणा (Navneet Rana) यांच्याबाबत त्यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केले. यावर नवनीत राणा व त्यांचे पती रवी राणा (Ravi Rana) यांनी संजय राऊतांना खडे बोल सुनावले. यानंतर आता विधानपरिषदेच्या उपसभापती व शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे (Neelam Gorhe) यांनीही संजय राऊतांचा खरपूस समाचार घेतला आहे.


वाशिम (Washim) जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना नीलम गोऱ्हे यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी त्या म्हणाल्या, काही व्यक्तींना असं वाटतं की शिवराळ भाषा वापरून आपण हिरो ठरतो. मात्र, अशा प्रकारे महिलांबद्दल वाईट बोलणारे झिरो आहेत. राऊतांवर आरोप करणाऱ्या महिलांना त्यांनी किती गलिच्छ भाषेत शिवीगाळ केली ते आम्ही ऐकलं आहे. आपल्या कुटुंबातील महिलांना चालतील तेच शब्द इतर महिलांबद्दल वापरावेत. राऊतांनी नवनीत राणांबद्दल वापरलेला शब्द पुन्हा वापरणे योग्य नाही. त्यामुळे त्यांचा अपमान होईल. म्हणून मी तो शब्द बोलत नाही. मात्र त्यांनी केलेला शब्द प्रयोग हा अतिशय चुकीचा आणि एका महिलेचा अवमान करणारा आहे, अशी टीका त्यांनी केली.


पुढे नीलमताई म्हणाल्या, एका महिलेबद्दल लोकप्रतिनिधीने अशा भाषेचा वापर करून टीका करणे हे अजिबात योग्य नाही. त्यांच्याकडे दुर्लक्ष करणे योग्य राहील आणि याबाबत निवडणूक आयोग दखल घेऊन योग्य ती कारवाई करेल. अशा काही लोकांच्या सकाळच्या डराव- डरावमध्येही काही तथ्य नसतं. त्यामुळे त्यांना फार गांभीर्याने घेण्याची गरज नसल्याची बोचरी टीका नीलम गोऱ्हे यांनी केली.



काय म्हणाले होते संजय राऊत?


संजय राऊत नवनीत राणा यांना उद्देशून म्हणाले होते की, ज्या बाईने मातोश्रीला आव्हान देण्याचा प्रयत्न केला, ज्या बाईने मातोश्रीत घुसण्याचा प्रयत्न केला, मातोश्रीविषयी अपशब्द वापरले, हिंदुत्वाविषयी अपशब्द वापरले, त्या बाईचा पराभव करणं शिवसैनिकांचं पहिलं कर्तव्य आणि नैतिक कर्तव्य आहे. ती नाची…डान्सर.. बबली.. तुम्हाला खुनावेल.. पडद्यावरून इशारे करेल.. पण भुरळून जाऊ नका.. अशा एका नटीने विश्वामित्रांनाही फसवले होते, अशी अत्यंत आक्षेपार्ह टीका संजय राऊतांनी केली होती.

Comments
Add Comment

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! कल्याण-भिंवडी मेट्रो ५ चा विस्तार लवकरच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा...

मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून लोकल ट्रेनची गर्दी कमी करण्यासाठी राज्य सरकारने नवीन पाऊले उचलली आहेत.

शेतीच्या वादावरून पुतण्याने केला काकी आणि चुलत भावाचा खून : वर्ध्यातील धक्कादायक प्रकार

वर्धा : शेती वाटपावरून २ जणांची कुऱ्हाडीने वार करत हत्या करुन , नंतर आरोपीने देखील विष पिऊन आत्महत्या केल्याचा

महिलांना नेतृत्वाची संधी ! जिल्ह्यातील ७७५ सरपंच पदाचं आरक्षण जाहीर, महिलांची आकडेवारी किती ?

मुंबई : राज्यातील ग्रामीण भागात ७५५ ग्रामपंचायतींचे आरक्षण नुकतेच जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे २०११ च्या

Pune Metro : पुणेकरांची गर्दीतून सुटका! लवकरच मेट्रोच्या ताफ्यात १५ नव्या ट्रेन, ४५ डबे वाढणार अन्...

पुणे : पुणेकरांसाठी दिलासादायक बातमी आहे. मेट्रोच्या ताफ्यात आगामी काळात १५ नव्या ट्रेन म्हणजेच एकूण १५ डबे

मुंबई-गोवा महामार्ग: १८ वर्षांची प्रतीक्षा, खड्डेमय प्रवास अन् अपघातांचा धोका कायम!

मुंबई : मुंबई-गोवा महामार्गाचे काम गेली १८ वर्षांपासून रखडलेले असतानाच, या पावसाळ्यातही प्रवाशांचे हाल कायम

राज्यात ५१ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या

नाशिक : राज्यातील ५१ पोलीस अधीक्षक आणि अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या बदल्या करण्यात आल्या असून त्यामध्ये नाशिक