AC government: ब्रह्मगिरीवर एसी सरकारचा स्तंभ बांधला

देशाविरुद्ध अपराध केल्याचा गुन्हा त्रंबक पोलिसांकडून दाखल


त्र्यंबकेश्वर : पर्वतराज ब्रह्मगिरीवर एसी सरकारचा स्तंभ बांधल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने खळबळ उडाली होती.या प्रकरणी देशाविरुद्ध अपराध केल्याचा गुन्हा अज्ञात आरोपींविरुद्ध त्रंबकेश्वर पोलीसांनी दाखल केला आहे. सात-आठ वर्षांपूर्वी हा स्तंभ बांधून झाला असून मीडिया मध्ये बातमी झळकली त्या नंतर पोलिसांनी स्वतःहून यात लक्ष घातले आहे. पोलीसांतर्फे गोपनीय शाखेचे सचिन गवळी यांनी पोलीस स्टेशनला फिर्याद दिली आहे. भादवि ५०५ एक ब व कलम १३५ प्रमाणे ही फिर्याद नोंदवून घेण्यात आली आहे.


भारत सरकारचा कायदा एसी सरकार मानत नाही अशी माहिती पुढे आली आहे.अज्ञात आरोपींनी सात आठ वर्षांपूर्वी ब्रह्मगिरीवर एसी सरकारचा स्तंभ उभारला. अपराध करण्याची प्रवृत्ती निर्माण होईल व सार्वजनिक शांततेचा भंग होईल अशाप्रकारे डोंगरावर बिना परवानगी बांधकाम करून आदिवासी भागात दहशत निर्माण होईल,अपराध करण्यास प्रवृत्त होईल अशा प्रकारे भीती निर्माण करण्याचे देशाविरुद्ध अपराध करण्याचे काम केले म्हणून ही फिर्याद दाखल आहे. पो नी बिपिन शेवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली याबाबत अधिक चौकशी सुरू आहे.



अशी आहे घटना :-


ब्रह्मगिरी पर्वतावर गोदावरी उगम स्थानाजवळ ग्रे नाईड फरशीचा स्तंभ उभारून पक्के बांधकाम केलेले आहे. ब्रह्मगिरी वन खात्याच्या अखत्यारीत येतो. सदर बाबत कोणतेही माहिती वनखात्याकडे नाही. कथित केशवाकुवर केसरी सिंह नामक एसी सरकार चालवतो. गुजरात मधील डांग प्रदेशात त्याने चालवलेले हे सरकार उदयास आले आहे.


भारत देश आमच्या मालकीचा असून फलक लावलेले ठिकाण आमच्या राज्याच्या अधिपत्याखाली असल्याचा दावा एसी सरकारचा आहे. तसेच भारत सरकार आमच्या अधिपत्याखाली येते असादेखील एसी सरकारने दावा केला आहे. कायद्याने स्थापन झालेल्या सरकारला एसी सरकार मानत नसून एसी सरकार, हे प्रतिसरकार म्हणून अस्तित्वात आहे. तर यात काही मंडळी निसर्ग पूजक आहेत.


Comments
Add Comment

बीएसएनएलची टॉवर उभारण्याची योजना का मंदावली? २,७५१ ऐवजी केवळ ९३० गावांमध्येच टॉवर उभारणार!

बीएसएनएल '४जी' साठी ९३० गावांमध्ये जमीन देण्यास महाराष्ट्र सरकारची मंजुरी मुंबई: ग्रामीण आणि दुर्गम भागांमध्ये

Satara Gazette: जरांगे पाटलांची ती मागणी सुद्धा होणार मान्य, मराठा समाजाला दिलासा!

सातारा गॅझेट लागू करण्यासंदर्भात सरकारी हालचालींना सुरुवात  मुंबई: मराठा समाजाला आणखीन एक दिलासा देणारी बातमी

'आदिवासींच्या जीवनात ३ वर्षांत आमुलाग्र परिवर्तन घडेल'

यवतमाळ : आदिवासी समाजाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी केंद्र शासनाने महत्वाच्या योजना हाती घेतल्या

साई मंदिरातील प्रसाद, दर्शन, सुरक्षा आता एआयच्या नियंत्रणात

स्मार्ट सुरक्षा प्रणालीमुळे अपप्रवृत्तीला बसणार आळा शिर्डी : श्री साईबाबा संस्थानात भाविकांच्या सुरक्षेसह

परतीचा पाऊस येत आहे रे.. सावधान!

महाराष्ट्रातील १७ जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा मुंबई: गणपती विसर्जनानंतर अनेक दिवस दडी मारून बसलेला

पुण्यातील दर्ग्याखाली बोगदा! हिंदू संघटनांनी केला मंदिर असल्याचा दावा

पुणे: पुण्यातील मंचर येथील दर्ग्याच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळली, त्याखाली मंदिरासारखी रचना आढळल्याने वाद