AC government: ब्रह्मगिरीवर एसी सरकारचा स्तंभ बांधला

देशाविरुद्ध अपराध केल्याचा गुन्हा त्रंबक पोलिसांकडून दाखल


त्र्यंबकेश्वर : पर्वतराज ब्रह्मगिरीवर एसी सरकारचा स्तंभ बांधल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने खळबळ उडाली होती.या प्रकरणी देशाविरुद्ध अपराध केल्याचा गुन्हा अज्ञात आरोपींविरुद्ध त्रंबकेश्वर पोलीसांनी दाखल केला आहे. सात-आठ वर्षांपूर्वी हा स्तंभ बांधून झाला असून मीडिया मध्ये बातमी झळकली त्या नंतर पोलिसांनी स्वतःहून यात लक्ष घातले आहे. पोलीसांतर्फे गोपनीय शाखेचे सचिन गवळी यांनी पोलीस स्टेशनला फिर्याद दिली आहे. भादवि ५०५ एक ब व कलम १३५ प्रमाणे ही फिर्याद नोंदवून घेण्यात आली आहे.


भारत सरकारचा कायदा एसी सरकार मानत नाही अशी माहिती पुढे आली आहे.अज्ञात आरोपींनी सात आठ वर्षांपूर्वी ब्रह्मगिरीवर एसी सरकारचा स्तंभ उभारला. अपराध करण्याची प्रवृत्ती निर्माण होईल व सार्वजनिक शांततेचा भंग होईल अशाप्रकारे डोंगरावर बिना परवानगी बांधकाम करून आदिवासी भागात दहशत निर्माण होईल,अपराध करण्यास प्रवृत्त होईल अशा प्रकारे भीती निर्माण करण्याचे देशाविरुद्ध अपराध करण्याचे काम केले म्हणून ही फिर्याद दाखल आहे. पो नी बिपिन शेवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली याबाबत अधिक चौकशी सुरू आहे.



अशी आहे घटना :-


ब्रह्मगिरी पर्वतावर गोदावरी उगम स्थानाजवळ ग्रे नाईड फरशीचा स्तंभ उभारून पक्के बांधकाम केलेले आहे. ब्रह्मगिरी वन खात्याच्या अखत्यारीत येतो. सदर बाबत कोणतेही माहिती वनखात्याकडे नाही. कथित केशवाकुवर केसरी सिंह नामक एसी सरकार चालवतो. गुजरात मधील डांग प्रदेशात त्याने चालवलेले हे सरकार उदयास आले आहे.


भारत देश आमच्या मालकीचा असून फलक लावलेले ठिकाण आमच्या राज्याच्या अधिपत्याखाली असल्याचा दावा एसी सरकारचा आहे. तसेच भारत सरकार आमच्या अधिपत्याखाली येते असादेखील एसी सरकारने दावा केला आहे. कायद्याने स्थापन झालेल्या सरकारला एसी सरकार मानत नसून एसी सरकार, हे प्रतिसरकार म्हणून अस्तित्वात आहे. तर यात काही मंडळी निसर्ग पूजक आहेत.


Comments
Add Comment

Four years Degree Course : आता पदवी अभ्यासक्रम चार वर्षांचा - नव शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी; पदवीस्तरावरच मिळणार संशोधनाची संधी

मुंबई : राज्यातील उच्च शिक्षण क्षेत्रात आमूलाग्र बदल घडवून आणणाऱ्या राष्ट्रीय शिक्षण धोरणाची (२०२०) अंमलबजावणी

CM Devendra Fadnavis : “माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव” राज्यव्यापी अभियानाचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ

- उपमुख्यमंत्री, आरोग्य मंत्र्यासह मंत्रिमंडळाची उपस्थिती मुंबई : जागतिक आरोग्य दिनाच्या

Transfers Of IAS Officers : राज्यातील ११ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या

मुंबई : राज्य शासनाने मंगळवारी प्रशासकीय स्तरावर मोठे फेरबदल करत ११ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे (Transfers Of IAS Officers)

Export of fruits and vegetables : उपलब्ध निर्यात सुविधा केंद्रांचा प्रभावी वापर करून फळे व भाजीपाल्याची निर्यात वाढवावी - मंत्री जयकुमार रावल

मुंबई : राज्यात निर्यातक्षम फळे व भाजीपाला मोठ्या प्रमाणावर उत्पादित होतो. या पार्श्वभूमीवर उपलब्ध निर्यात

अवकाळीने झालेल्या नुकसानीपोटी शेतकऱ्यांना १२८ कोटी ६५ लाखांची मदत

जानेवारीपासून झालेल्या नुकसानीच्या पंचनाम्याची कार्यवाही सुरू मुंबई : राज्यात ऑक्टोंबर ते डिसेंबर २०२५

Chipi-Mumbai Flights चिपी–मुंबई विमानसेवा जलदगतीने सुरू करा - सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांचे निर्देश

सकाळी व संध्याकाळी अशी दोनदा विमानसेवा देण्याबाबत विचार करण्याच्या ही दिल्या सूचना मुंबई : सिंधुदुर्ग जिल्हा