Eknath Khadse : एकनाथ खडसे यांना जीवे मारण्याची धमकी!

वेगवेगळ्या नंबरवरुन आणि विदेशातून येत आहेत कॉल


जळगाव : राष्ट्रवादीच्या शरद पवार गटातून काही दिवसांतच स्वगृही म्हणजेच भाजपमध्ये परतणार असलेले नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांना जीवे मारण्याची धमकी देणारा कॉल (Death threat call) आला आहे. त्यांच्या घरी हा धमकीचा फोन आला होता. मात्र, धमकीचं कारण अद्याप समोर आलेलं नाही. याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली असून अज्ञात व्यक्तीवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.


गेल्या दोन दिवसांपासून एका अज्ञात फोनवरून छोटा शकीलचे नाव सांगत आपल्याला जीवे मारण्यात येणार असल्याच्या धमक्या दिल्या जात असल्याचं खडसे यांनी म्हटलं आहे. एकनाथ खडसे यांना आतापर्यंत धमकीचे चार ते पाच फोन आले आहेत. हे फोन वेगवेगळ्या नंबरवरुन आणि विविध देशातून येत असल्याची माहिती एकनाथ खडसे यांनी दिली आहे. नुकताच अमेरिकेतून धमकीचा फोन आल्यानंतर त्यांनी जळगावच्या मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.



धमकी देणाऱ्यांनी कोणतीही मागणी केली नाही: एकनाथ खडसे


याविषयी बोलताना एकनाथ खडसे म्हणाले, धमकी मागे राजकीय संबंध असेल असं वाटत नाही. पोलीस चौकशी करत आहेत, काय तथ्य आहे ते बाहेर येईल. अशा धमक्या बऱ्याच वेळा आल्या आहेत. त्यामुळे भीतीचे वातावरण नाही. काळजी घ्यावी म्हणून पोलिसांना सूचित केले आहे. छोटा शकील, दाऊद यांनी धमकी दिली असेल असं वाटत नाही. धमकी कुठूनही येऊ शकते. अलीकडे सॉफ्टवेअर इतकी डेव्हलप आहेत की मुक्ताई नगरला बसूनही फेक कॉल केला जाऊ शकतो. धमकी दिल्यानंतर कोणतीही मागणी करण्यात आलेली नाही, असंही खडसे यांनी सांगितलं.

Comments
Add Comment

पुणे जिल्ह्यात बिबट्यांचा वावर वाढला; मोबाईलवर बोलत असलेल्या तरुणावर हल्ला, परिसरात भीती

पुणे : जिल्ह्यात बिबट्यांचा वावर झपाट्याने वाढत असून, रात्रीच्या वेळी नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर

सुधीर दळवी यांना शिर्डी संस्थानकडून ११ लाखांची मदत

मुंबई  : १९७७ साली प्रदर्शित झालेल्या ‘शिर्डी के साईबाबा’ या चित्रपटात ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांनी

अनाथ आरक्षणामुळे ८०० हून अधिक मुले झाली ‘स्वनाथ’

 सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अनाथ मुलांशी साधला संवाद मुंबई : लहान वयात

मतमोजणी २१ डिसेंबरलाच! नागपूर खंडपीठाने दिलेल्या निर्णयावर सुप्रीम कोर्टाचा शिक्कामोर्तब

नवी दिल्ली: राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांच्या पहिल्या टप्प्यातील मतदान पूर्ण झाले. ज्यामध्ये

पाच हजार कोटींच्या कांदा घोटाळ्याची चौकशी सुरू

मुंबई  : केंद्र सरकारने किंमत स्थिरीकरण योजनेअंतर्गत नाफेड आणि एनसीसीएफला फार्मर प्रोड्युसर कंपन्यांकडून

राज्यातील निवडणूक वादावर आज 'सर्वोच्च' सुनावणी! नागपूर खंडपीठाच्या निर्णयाला स्थगिती मिळणार?

नवी दिल्ली: राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांच्या पहिल्या टप्प्यातील मतदान पूर्ण झाले. ज्यामध्ये