Eknath Khadse : एकनाथ खडसे यांना जीवे मारण्याची धमकी!

वेगवेगळ्या नंबरवरुन आणि विदेशातून येत आहेत कॉल


जळगाव : राष्ट्रवादीच्या शरद पवार गटातून काही दिवसांतच स्वगृही म्हणजेच भाजपमध्ये परतणार असलेले नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांना जीवे मारण्याची धमकी देणारा कॉल (Death threat call) आला आहे. त्यांच्या घरी हा धमकीचा फोन आला होता. मात्र, धमकीचं कारण अद्याप समोर आलेलं नाही. याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली असून अज्ञात व्यक्तीवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.


गेल्या दोन दिवसांपासून एका अज्ञात फोनवरून छोटा शकीलचे नाव सांगत आपल्याला जीवे मारण्यात येणार असल्याच्या धमक्या दिल्या जात असल्याचं खडसे यांनी म्हटलं आहे. एकनाथ खडसे यांना आतापर्यंत धमकीचे चार ते पाच फोन आले आहेत. हे फोन वेगवेगळ्या नंबरवरुन आणि विविध देशातून येत असल्याची माहिती एकनाथ खडसे यांनी दिली आहे. नुकताच अमेरिकेतून धमकीचा फोन आल्यानंतर त्यांनी जळगावच्या मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.



धमकी देणाऱ्यांनी कोणतीही मागणी केली नाही: एकनाथ खडसे


याविषयी बोलताना एकनाथ खडसे म्हणाले, धमकी मागे राजकीय संबंध असेल असं वाटत नाही. पोलीस चौकशी करत आहेत, काय तथ्य आहे ते बाहेर येईल. अशा धमक्या बऱ्याच वेळा आल्या आहेत. त्यामुळे भीतीचे वातावरण नाही. काळजी घ्यावी म्हणून पोलिसांना सूचित केले आहे. छोटा शकील, दाऊद यांनी धमकी दिली असेल असं वाटत नाही. धमकी कुठूनही येऊ शकते. अलीकडे सॉफ्टवेअर इतकी डेव्हलप आहेत की मुक्ताई नगरला बसूनही फेक कॉल केला जाऊ शकतो. धमकी दिल्यानंतर कोणतीही मागणी करण्यात आलेली नाही, असंही खडसे यांनी सांगितलं.

Comments
Add Comment

नागपूर AIMS मधील विद्यार्थ्यांच्या जेवणात आढळल्या चक्क अळ्या..... सोशल मीडियावर चर्चेला उधाण

नागपूर : अनेक विद्यार्थी शिक्षणासाठी आपल्या घरापासून दूर असतात. अशावेळी जेवणाची सोय होते ती खाणावळीतून किंवा

Pune ZP News : पुणे : राजकीय हालचालींना वेग; अध्यक्षपदाची खुर्ची कोणाची? निवडीची तारीख ठरली

पुणे : राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांचा धुराळा शांत झाल्यानंतर आता खऱ्या

DA Hike: राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ

मुंबई: राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वीच मोठी आनंदवार्ता जाहीर करण्यात आली आहे.

राज्यात रस्ता अपघाती मृत्यूंमध्ये ८ टक्क्यांची घट; परिवहन विभागाकडून आकडेवारी जाहीर

- २०३० पर्यंत अपघात निम्म्यावर आणण्याचे परिवहन विभागाचे उद्दिष्ट मुंबई : राज्यात रस्ता सुरक्षेसाठी परिवहन

भिगवण प्रकरणात मोठा ट्विस्ट; पाच दिवसात तरुणीने बदलला निर्णय

पुणे : महाष्ट्राभर चर्चा असलेल्या भिगवण प्रकरणात अनेक दावे , प्रतिदावे समोर येत होते, पण आता स्वतः मुलीनेच

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाकडून ४२ मौलिक ग्रंथांचे प्रकाशन

मुंबई : मराठी भाषा गौरव दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळातर्फे यंदा ४२ मौलिक ग्रंथांचे