Raj Thackeray : महायुतीला दिलेल्या पाठिंब्यानंतर राज ठाकरे आणि नरेंद्र मोदी दिसणार एकाच मंचावर

शिवाजी पार्कवर होऊ शकते सभा


पुणे : लोकसभा, राज्यसभा नको तर विधानसभेच्या तयारीला लागा, असं म्हणत मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा जाहीर केला. गुढी पाडवा मेळाव्यादिवशी त्यांनी ही मोठी घोषणा केली. हा पाठिंबा आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्यामुळे देत असल्याचेही त्यांनी सांगितले. यानंतर आता राज ठाकरेंचे पुत्र अमित ठाकरे (Amit Thackeray) यांनी एक मोठी बातमी दिली आहे. नरेंद्र मोदी आणि राज ठाकरे एकाच मंचावर येणार असल्याची माहिती अमित ठाकरे यांनी आज पुण्यात पत्रकारांसोबत अनौपचारिक संवाद साधताना दिली.


मनसे नेते अमित ठाकरे आज पुणे दौऱ्यावर आले आहेत. पुण्यात अमित ठाकरे आज प्रभाग निहाय बैठका घेत आहेत. महायुतीला दिलेल्या पाठिंब्याबाबत ते पदाधिकाऱ्यांसोबत बोलत आहेत. यावर आता मनसेने पक्षाचे काम करणार नाहीत त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.


राज ठाकरे यांनी गुढी पाडवा मेळाव्यावेळी कार्यकर्त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी कार्यकर्त्यांना आवाहन केले होते. त्यावेळी लवकरच प्रचारसभा घेणार असल्याचे सांगितले होते. दरम्यान, आज अमित ठाकरे यांनीही याबाबत माहिती दिली.

Comments
Add Comment

वैमानिकाच्या सतर्कतेमुळे मोठे संकट टळले! नागपूरहून उड्डाण केलेल्या विमानाला धडकला पक्षी...

नागपूर: नागपूरहून दिल्लीला निघालेल्या एअर इंडियाच्या विमानावरील मोठे संकट टळले. विमानाने उड्डाण करताच

राज्यातील बांगलादेशी घुसखोरांना दणका! राज्य सरकारचे मोठे पाऊल, रेशनकार्ड पडताळणीचे आदेश

मुंबई: गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात बांगलादेशी नागरिकांची घुसखोरी वाढत चालली आहे. याकरता राज्यभरात

‘एमयुएचएस’ च्‍या कुलगुरूपदी डॉ. अजय चंदनवाले

नाशिक : राज्‍य शासनाने वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाचे संचालक डॉ. अजय चंदनवाले यांची नियुक्‍ती ‘महाराष्‍ट्र

“मोदी मिशन हे पुस्तक पुढच्या पिढीला प्रेरणा देणारं”, 'मोदीज् मिशन' मधील काही भाग पाठ्यपुस्तकात समाविष्ट करावा; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सूचना

मुंबई :“पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारित ‘मोदीज् मिशन’ हे पुस्तक प्रत्येकाने वाचावे आणि संग्रहित

मुंबईनजिक बांधणार देशातील सर्वाधिक लांबीची भिंत! पण यामागचे कारण काय?

मुंबई : पालघर जिल्ह्यात बांधले जाणारे वाढवण बंदर हा केंद्र सरकारचा एक खूप महत्त्वाचा प्रकल्प आहे. या बंदरात

कार्तिकी वारीनिमित्त पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! मध्य रेल्वेकडून विशेष गाड्यांचे आयोजन

सोलापूर: येत्या काही दिवसांत पंढरपूर येथे कार्तिकी वारीचा सोहळा रंगणार आहे. यासाठी विविध राज्यातून वारकऱ्यांचा