उष्माघाताचा पालघर जिल्ह्यात पहिला बळी, विद्यार्थीनीचा मृत्यू

  217

पालघर : महाराष्ट्र राज्य उकाड्याने हैराण झालेले असतानाच उष्माघाताने पालघर जिल्ह्यात पहिला बळी घेतला. विक्रमगड तालुक्यातील केव (वेडगेपाडा) येथे राहणारी अश्विनी विनोद रावते (१६) या अकरावीत शिकणाऱ्या विद्यार्थीनीचा उष्माघाताने सोमवारी दुपारी बळी घेतला.


विक्रमगड येथे राहणारी अश्विनी रावते मनोर येथील एस. पी. मराठे ज्युनियर कॉलेजमध्ये अकरावीत शिकत होती. सोमवार १५ एप्रिलला दुपारी परीक्षा देऊन घरी आली होती. अश्विनी घरी परतली तेव्हा आई कपडे धुण्यासाठी नदीवर गेली होती. तर वडिल मनोर येथील बाजारात गेले होते. त्यामुळे घरात कुणीच नसल्याने ती आई-वडिलांना शोधण्यासाठी शेतावर गेली होती. शेतावर जात असतानाच उन्हाच्या तडाख्याने भोवळ येऊन ती शेतातच पडली होती. प्रचंड ऊन असल्याने पाड्यावरच कुणीच आजूबाजूच्या शेतावर नसल्याने अश्विनी तब्बल दोन तास बेशुध्दावस्थेतच पडून होती.


इकडे, घरी आलेल्या आईने अश्विनीची बॅग बघितली. पण, अश्विनी घरात दिसत नसल्याने आई तिला शोधत शेतावर पोचली. तेव्हा अश्विनीला बेशुध्दावस्थेत पडलेली पाहून आईला धक्का बसला. गावकऱ्यांच्या मदतीने अश्विनीला उपचारासाठी मनोर येथील खाजगी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. उष्माघाताने अश्विनीचा बळी घेतल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.


दरम्यान, राज्यभर उन्हाचा तडाखा वाढला असून विक्रमगड तालुक्यात तापमान ३९ अंश सेल्सिअपर्यंत पोचले आहे. पालघर जिल्ह्याचे तापमान ४० अंश सेल्सिअसपर्यंत वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी उन्हात बाहेर पडू नये असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलेले आहे.

Comments
Add Comment

घाटात प्रेत फेकणाऱ्यांचा पर्दाफाश; एका महिलेसह तिघांना बेड्या!

पोलादपूर: आंबेनळी आणि कशेडी घाटरस्त्यांवर मृतदेह टाकून पळून जाण्याच्या घटनांना आता चाप

Pravin Darekar: "नद्यांचे प्रदूषण रोखण्यासाठी शासन विशेष उपाययोजना करणार का?: आमदार दरेकर यांचा पर्यावरण मंत्र्यांना सवाल

मुंबई: आज विधानपरिषदेच्या सभागृहात सदस्य रणजित सिंह मोहिते पाटील यांनी राज्यातील नद्याचे प्रदूषण रोखण्यासाठी

२६/११ हल्ल्याचा आरोपी तहव्वुर राणाच्या कोठडीत १३ ऑगस्टपर्यंत वाढ!

नवी दिल्ली: मुंबईवरील २६/११ दहशतवादी हल्ल्याचा आरोपी तहव्वुर राणाच्या न्यायालयीन कोठडीत १३ ऑगस्टपर्यंत वाढ

अंधेरीतील ३०० एकर कांदळवन व वृक्षतोडीच्या विनाशकारी हस्तक्षेप संबंधी पंकजा मुंडेंवर प्रश्नांची चौफेर सरबत्ती, उपसभापती बोलल्या...

मुंबई : राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री पंकजाताई मुंडे यांचे वाक्-कौशल्य नुकतेच विधीमंडळ सभागृहामध्ये

वरळी सी-लिंकवर स्टंट केल्याप्रकरणी गायक यासेर देसाई विरोधात गुन्हा दाखल

मुंबई: बॉलीवूडमधील प्रसिद्ध गायक आणि गीतकार यासेर देसाई याने मुंबईच्या बांद्रा-वरळी सी लिंकवर स्टंट करत शूट

MG Group: एमजी ग्रुपकडून TIGRA सुपर-प्रीमियम लक्झरी कोचचे अनावरण नवीन Corporate आणि Brand Identity लाँच

एमजी ग्रुपच्या बेळगाव येथील मॅन्युफॅक्चरिंग युनिटमध्ये डिझाइन आणि उत्पादित TIGRA उत्कृष्ट आराम आणि सुरक्षितता