Hardik Pandya : हार्दिक पांड्याची गोलंदाजी सर्वसाधारण, त्याचं नेतृत्वही साधारणच!

  159

सुनील गावस्करांचं मुंबई इंडियन्सच्या कॅप्टनवर टीकास्त्र


पीटरसन म्हणाला, 'चाहत्यांकडून होत असलेल्या हूटिंगचा हार्दिक पांड्यावर परिणाम'


मुंबई : आयपीएल २०२४ (IPL 2024) साठी मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) कॅप्टन म्हणून हार्दिक पांड्याच्या (Hardik Pandya) नावाची घोषणा झाली आणि तेव्हापासूनच चाहत्यांनी नाराजीचा सूर मारला आहे. कॅप्टन बदलला तरी निदान सामने सुरु झाल्यानंतर मुंबई इंडियन्स आपला दबदबा कायम राखेल, अशी चाहत्यांना आशा होती. मात्र, चाहत्यांच्या आशेवर पाणी फिरत असल्याचे चित्र आहे. मुंबई इंडियन्स संघाला सहा सामन्यांपैकी चार सामन्यांमध्ये पराभव पत्करावा लागला आहे. त्यामुळे साहजिकच हार्दिक पांड्यावर चाहते आणखी नाराज झाले आहेत.


मुंबईच्या पराभवानंतर हार्दिक पांड्याच्या नेतृत्वावर अनेक माजी खेळाडूंनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. याबद्दल माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर (Sunil Gavaskar) आणि इंग्लंडचा माजी कर्णधार केवीन पीटरसन (Kevin Pietersen) यांनी देखील आपलं मत व्यक्त केलं. 'हार्दिक पांड्याची गोलंदाजी सर्वसाधारण, त्याचं नेतृत्वही साधारणच आहे', असं सुनील गावस्कर यांनी स्पष्टपणे सांगितलं.


सुनील गावस्कर म्हणाले, हार्दिक पांड्याने आतापर्यंत प्रभावी नेतृत्व केलं नाही. त्याने अनेक चुका केल्या आहेत. हार्दिक पांड्याची गोलंदाजी सर्वसाधारण राहिली, त्याशिवाय त्याचं नेतृत्वही साधारणच राहिलं. शिवम दुबे आणि ऋतुराज गायकवाड चांगली फलंदाजी करत होते. चेन्नईला १८०-१९० पर्यंत रोखायला हवं होतं. हार्दिक पांड्याकडून आतापर्यंतची सर्वात खराब गोलंदाजी करण्यात आली, असं सुनील गावस्कर म्हणाले.



केवीन पीटरसन काय म्हणाला ?


इंग्लंडचा माजी कर्णधार केवीन पीटरसन याने हार्दिक पांड्याच्या नेतृत्वावर टीकास्त्र सोडलं. पीटरसन म्हणाला की, प्लॅन ए फेल ठरल्यास तुम्ही प्लॅन बी चा वापर का केला नाही? हार्दिक पांड्याने आपल्या फिरकी गोलंदाजांचा वापर का केला नाही? हे न समजण्यासारखं आहे. टीम मिटिंगमध्ये प्लॅन ए ठरला असेल. पण हा प्लॅन यशस्वी ठरला नाही, तर प्लॅन बी का वापरला नाही?


केवीन पीटरसनच्या मते हार्दिक पांड्याच्या कामगिरीवर मैदानाबाहेरुन चाहत्यांकडून होत असलेल्या हूटिंगचा परिणाम होत आहे. नाणेफेकीवेळी हार्दिक पांड्या हसून सगळं काही ठीक असल्याचं दाखवण्याचा प्रयत्न करतो. पण प्रत्यक्षात असं काही नाही. या परिस्थितीमधून मी गेलो आहे. स्टेडियममधून केलं जाणारं हूटिंग तुमच्यावर मानसिक परिणाम करतेच, असं मत पीटरसनने व्यक्त केलं.

Comments
Add Comment

पाणी चिंता मिटली ! मुंबईकरांच्या धरणात किती टक्के पाणीसाठा?

मुंबई :  मे आणि जून महिन्यात जास्त पाऊस पडल्यामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात धरणांमधील पाणीसाठ्यात

वरळी येथे अस्थी विसर्जनासाठी गेलेले तीन जण समुद्रात बुडाले, दोघांचा मृत्यू

मुंबई : वरळीतील हाजी अली जवळच्या लोटस जेट्टीवर शनिवारी अस्थी विसर्जनासाठी गेलेले तीन व्यक्ती समुद्रात बुडाले.

Police Officers Transfer: महाराष्ट्रात ५१ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या, कोणत्या पोलिस अधिकाऱ्यांना मिळाली महत्वाची जबाबदारी...

मुंबई : महाराष्ट्र सरकारच्या गृह विभागाने (Home Department) ५१ भारतीय सेवा अधिकारी (IPS) आणि ८१ राज्य पोलिस सेवा

अभिनेत्री निशा रावलने सांगितला पती करण मेहराकडून झालेला संतापजनक छळ

मुंबई : अभिनेत्री निशा रावलने तिचा पूर्वाश्रमीचा पती आणि 'ये रिश्ता क्या कहलाता है' फेम अभिनेता करण मेहरा

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! कल्याण-भिंवडी मेट्रो ५ चा विस्तार लवकरच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा...

मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून लोकल ट्रेनची गर्दी कमी करण्यासाठी राज्य सरकारने नवीन पाऊले उचलली आहेत.

ST : राज्यातील सर्वात मोठे स्क्रॅपिंग सेंटर (भंगार केंद्र) एसटीच्या जागेवर उभारले जाणार, 'एसटी'साठी उत्पन्नाचा नवा स्त्रोत...

मुंबई : एसटी विभागीतल जुनी वाहने  स्क्रॅप करून त्याचे सुटे भाग पुन्हा वापरात येणार नाहीत, अशा पद्धतीने त्यांची