Narayan Rane : नकली, विकला जाणारा उद्धव ठाकरे, आयुष्यभर खंडणी मागितली!

  211

भेकड शब्दाचं उत्तर आता शब्दामध्ये देऊन उपयोग नाही, तसा आवाज काढावा लागेल


केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची सणसणाटी टीका


सिंधुदुर्ग : ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी भाजप पक्षाचा (BJP Party) भाडखाऊ, भेकड असा उल्लेख केला. शिवाय भाजपच्या नेत्यांवर खंडणीखोर म्हणून टीकाही केली. त्यांच्या या टीकेला केंद्रीय सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी चोख प्रत्युत्तर दिलं आहे. 'भेकड शब्दाचं उत्तर आता शब्दामध्ये देऊन उपयोग नाही, तसा आवाज काढावा लागेल' असा घणाघात नारायण राणे यांनी केला. तसेच 'उद्धव ठाकरे हा नकली, विकला जाणारा आहे, त्याने आयुष्यभर खंडणी मागण्याचं काम केलं', अशी टीकाही नारायण राणे यांनी केली.


केंद्रीय मंत्री नारायण राणे म्हणाले, उद्धव ठाकरे याचं डोकं ठिकाणावर नाही, म्हणून देशाच्या नेत्यांवर खंडणीखोर म्हणून टीका करत आहे. कोण खंडणी घेत होता, कुठल्या रूममध्ये घेत होता याचा साक्षीदार मी आणि एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेले आमदार आहेत. उद्धव ठाकरे यांनी आयुष्यभर खंडणी मागण्याचं काम केलं, बाकी यांचा काही उद्योगधंदा नाही. जे ४० आमदार सोडून गेले ते पोच करत होते, असा आरोप नारायण राणे यांनी केला.



एवढा घाणेरडा माणूस मी पाहिला नाही


उद्धव ठाकरे यांनी एक फोन करायचे तीन लाख रुपये घेतले, एवढा घाणेरडा माणूस मी पाहिला नाही. भाजपा म्हणजे भाडखाऊ, भेकड असं उद्धव ठाकरे म्हणाला. हे शब्द त्याने माझ्या पक्षाच्या नेत्यांसाठी वापरले याची मला प्रचंड चीड आहे. भेकड शब्दाचं उत्तर आता शब्दामध्ये देऊन उपयोग नाही, तसा आवाज काढावा लागेल, अशी घणाघाती टीका नारायण राणे यांनी केली.



बाळासाहेबांनी विरोध केला, तिथे गुडघे टेकायला जातात


उद्धव ठाकरे यांना कुठलीही नोटीस आली की, मोदींच्या दारी सरेंडर व्हायचे. सुशांत सिंह आणि दिशा सालियान केसमध्ये किती तरी वेळा ते मोदींना भेटले ते विसरले. यांच्या डोक्यावर परिमाण झाला आहे नाहीतर ते असं बोलणार नाही. काहीही बोलतो, ते भोगावं लागेल, असंही नारायण राणे यांनी म्हटलं आहे. ज्या बाळासाहेबांनी काँग्रेसला आयुष्यभर विरोध केला, तिथे उद्धव ठाकरे गुडघे टेकायला जातात, अशी टीकाही नारायण राणे यांनी केली आहे.


Comments
Add Comment

किनारपट्टीवर 3.8 मीटर उंच लाटा धडकणार, लहान होड्यांना समुद्रास न जाण्याच्या सूचना...

मुंबई : राज्यात पुढील २४ तासात पुणे घाट, सातारा घाट परिसरात ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून भारतीय राष्ट्रीय महासागर

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! कल्याण-भिंवडी मेट्रो ५ चा विस्तार लवकरच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा...

मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून लोकल ट्रेनची गर्दी कमी करण्यासाठी राज्य सरकारने नवीन पाऊले उचलली आहेत.

शेतीच्या वादावरून पुतण्याने केला काकी आणि चुलत भावाचा खून : वर्ध्यातील धक्कादायक प्रकार

वर्धा : शेती वाटपावरून २ जणांची कुऱ्हाडीने वार करत हत्या करुन , नंतर आरोपीने देखील विष पिऊन आत्महत्या केल्याचा

महिलांना नेतृत्वाची संधी ! जिल्ह्यातील ७७५ सरपंच पदाचं आरक्षण जाहीर, महिलांची आकडेवारी किती ?

मुंबई : राज्यातील ग्रामीण भागात ७५५ ग्रामपंचायतींचे आरक्षण नुकतेच जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे २०११ च्या

Pune Metro : पुणेकरांची गर्दीतून सुटका! लवकरच मेट्रोच्या ताफ्यात १५ नव्या ट्रेन, ४५ डबे वाढणार अन्...

पुणे : पुणेकरांसाठी दिलासादायक बातमी आहे. मेट्रोच्या ताफ्यात आगामी काळात १५ नव्या ट्रेन म्हणजेच एकूण १५ डबे

मुंबई-गोवा महामार्ग: १८ वर्षांची प्रतीक्षा, खड्डेमय प्रवास अन् अपघातांचा धोका कायम!

मुंबई : मुंबई-गोवा महामार्गाचे काम गेली १८ वर्षांपासून रखडलेले असतानाच, या पावसाळ्यातही प्रवाशांचे हाल कायम