Salman Khan : सलमान खानच्या घरासमोरील गोळीबार प्रकरणात बिश्नोई समाजाचा हात?

मुंबई गुन्हे शाखेचा दाट संशय; काय आहे प्रकरण?


मुंबई : बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या (Salman Khan) वांद्रेस्थित गॅलॅक्सी अपार्टमेंटच्या (Galaxy apartment) बाहेर गोळीबार (Firing) करण्यात आला. हा हवेतील गोळीबार सकाळी साधारण ४.५० मिनिटांच्या सुमारास दोन अज्ञात व्यक्तींनी केला. दोन्ही हल्लेखोर बाईकवरून आले होते आणि चार राऊंड फायरिंग केल्यानंतर ते तेथून पळून गेले. दरम्यान, या हल्ल्यात कोणीही जखमी झाल्याचे वृत्त नाही. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी सलमानच्या खानच्या घराबाहेर सुरक्षा व्यवस्था वाढवली आहे. दरम्यान, मुंबई गुन्हे शाखेने या प्रकरणात बिश्नोई समाजाचा हा असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे.


सलमान खानच्या घराबाहेरील गोळीबाराच्या तपासासाठी पोलीस आणि फॉरेन्सिक टीम दाखल झाली आहे. यापूर्वी सलमानच्या वडीलांना चिठ्ठीद्वारे धमकी देण्यात आली होती, त्यानंतर धमकीचा ई-मेलही आला होता. आता रविवारी १४ एप्रिल रोजी झालेल्या गोळीबाराचा संबंधही बिश्नोई गँगशी असल्याचं बोललं जात आहे.


सलमान खानच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारामागे लॉरेन्स बिश्नोई टोळीचा हात असल्याचा संशय तपास यंत्रणांना आहे. याचं कारण म्हणजे बिश्नोई गँग (Lawrence Bishnoi) सलमानला धमकी देत आहे. त्यामुळे आता या प्रकरणाचे गांभीर्य पाहून महाराष्ट्र एटीएसनेही याप्रकणी तपास सुरु केला आहे.



नेमकं प्रकरण काय?


१९९८ साली हम साथ साथ हैं चित्रपटाच्या शूटींगदरम्यान सलमान खान राजस्थानमध्ये होता. सलमान खानने दोन वेळा चिंकारा हरणांची शिकार केल्याचा आरोप आहे. लॉरेन्स बिश्नोई ज्या बिश्नोई समाजातून येतो, हा समाज निसर्ग पूजक असून त्या समाजात हरणांना देवासमान मानलं जातं. हरणांची शिकार केल्याचा आरोप असल्यामुळे अवघ्या बिश्नोई समाजाचा सलमान खानवर प्रचंड राग आहे. याच रागातून लॉरेन्स बिश्नोई वारंवार सलमान खानला धमक्या देत असल्याचं सांगितलं जातं.

Comments
Add Comment

सुशोभिकरणाच्या कामांसाठी पुन्हा प्रशासनाने केला हात ढिला

माटुंगा,वडाळ्यातील कामांसाठी प्रलंबित बिलांचा मार्ग मोकळा मुंबई (विशेष प्रतिनिधी) - मुंबई महापालिकेने हाती

मुंबई महापालिकेत ढाकणे आले, सैनी गेले

अतिरिक्त आयुक्त अविनाश ढाकणे यांची नियुक्ती मुंबई (विशेष प्रतिनिधी) - मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ अमित

तक्रार येईपर्यंत थांबू नका, मतदारयादीतील चुका स्वतःहून दुरुस्त करा

मुंबई : महापालिका निवडणुकीच्या मतदारयाद्या अचूक असाव्यात, यासाठी राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी सर्व

तलाठी, तहसीलदारांसह महसूल कर्मचाऱ्यांवर आता दक्षता पथकांचा ‘वॉच’

मुंबई : सर्वसामान्य जनतेला महसूल विभागाप्रती आपलेपणा वाटावा, तसेच कामे गतिमान व्हावी, या उद्देशाने महसूल

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह योजना आता डिजिटल स्वरुपात

मुंबई : गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह योजनेचा लाभ आता महाडीबीटी पोर्टलमार्फत थेट ऑनलाईन मिळणार

डिजिटल ७/१२ ला कायदेशीर मान्यता, आता केवळ १५ रुपयांमध्ये मिळणार अधिकृत उतारा

मुंबई : महसूल विभागाच्या भूलेख महाभूमी पोर्टलवरून आता अवघ्या १५ रुपयांत सातबारा उतारा मिळू शकणार आहे. डिजिटल