Mumbai Local News: मध्य रेल्वेतर्फे शून्य अपघाताचे नियोजन; घेतला 'हा' मोठा निर्णय

मुंबई : मुंबई उपनगरीय रेल्वे मार्गावर रूळ ओलांडणे आणि लोकलमधून पडून होणाऱ्या अपघातांचे प्रमाण अधिक आहे. तसेच रेल्वे रुळावर गाई-गुरे आल्याने अनेक अपघात घडले आहेत. विशेषत: गेल्या काही महिन्यांपासून वंदे भारत ट्रेनला कधी गाय तर कधी म्हैस धडकण्याच्या घटना घडल्या आहेत. अशावेळी प्राण्यांसह रेल्वे प्रवाशांचाही जीव धोक्यात येण्याची शक्यता असते. तसेच या कारणांनी रेल्वे वाहतुकीवरही मोठा परिणाम पडला आहे. यामुळेच अपघातावर नियंत्रण आणण्यासाठी मध्य रेल्वेने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.


एका वृत्तवाहिनीला दिलेल्या माहितीनुसार, रेल्वे गाड्या ११० ते १३० किमी ताशी वेगाने धावण्यासाठी आणि रेल्वे रूळ ओलांडताना होणारे अपघात थांबवण्यासाठी मध्य रेल्वेने रेल्वे मार्गिकेवर सुरक्षा कुंपण उभारण्याचे काम हाती घेतले आहे. आतापर्यंत २०५० किलोमीटर सुरक्षा कुंपण उभारण्यात आले. आता १२८२ किलोमीटर रेल्वे मार्गावर सुरक्षा कुंपण उभारण्याचा निर्णय घेतला आहे. १२८२ पैकी ४०४ किलोमीटर मुंबई उपनगरीय रेल्वे मार्गावर सुरक्षा कुंपण उभारण्यात येणार आहे. याकरिता ६२४ कोटी रुपयांचा खर्च होणार असल्याची माहिती मध्य रेल्वेने दिली आहे.


रेल्वेने हे प्रकार रोखण्यासाठी रुळांशेजारी संरक्षक भिंत बांधणे, दोन रुळांच्या मार्गामध्ये संरक्षक जाळी, स्थानकात पादचारी पूल बांधणे, प्रवेशद्वार बांधण्याचे काम केले. मात्र तरीही गेल्या काही वर्षांमध्ये हे अपघात कमी झाले नाहीत. त्यामुळे सुरक्षा कुंपण बांधून शून्य अपघाताचे नियोजन मध्य रेल्वेने केले आहे.



४०४ किमी रेल्वे मार्गावर सुरक्षा भिंत


मुंबई उपनगरत रेल्वे रूळ ओलांडताना होणारे अपघात रोखण्यासाठी मध्य रेल्वेने ४०४ किलोमीटर मुंबई उपनगरीय रेल्वे मार्गावर सुरक्षा भिंत उभारण्यात येणार आहे. याकरिता साधारण २०० कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. एप्रिल २०२५ पर्यत सुरक्षा भिंत बांधण्याचे नियोजन मध्य रेल्वेचे आहे.




  • मरेवर १२८२ किमी रेल्वे मार्गावर सुरक्षा कुंपण

  • मुंबईत ४०४ किमी रेल्वे मार्गावर सुरक्षा कुंपण

  •  सुरक्षा कुंपण उभारण्यासाठी ६२४ कोटींचा खर्च

  •  एप्रिल २०२५ पर्यत सुरक्षा कुंपण उभारण्याचे नियोजन


सुरक्षा कुंपणामुळे होणार हे फायदे :



  • मेल- एक्सप्रेस गाड्यांचा वेग वाढणार

  •  रेल्वे रुळावर येणाऱ्या गुरांना आळा बसणार

  •  रेल्वे रूळ ओलांडण्याचे प्रकार थांबणार

  •  रेल्वे रुळावर कचरा टाकण्याचे प्रकार थांबणार


Comments
Add Comment

Big Boss Marathi : कठीण परिस्थितीची आठवण आजही मनात; करण सोनावणे म्हणतो, ‘त्या अनुभवांनी मला घडवलं’

मुंबई : बिग बॉस मराठीच्या सहाव्या पर्वाने पहिल्याच आठवड्यात प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं असून, घरातील

BMC Election Results : २२७ वॉर्डांचे निकाल एकाच वेळी नाहीत, टप्प्याटप्प्याने मतमोजणी

मुंबई : राज्यभरात महापालिका निवडणुकांचे वातावरण चांगलेच तापले असून, मुंबई महापालिकेच्या (BMC) निकालांकडे संपूर्ण

मराठी भाषेबाबतचा भाजपाचा दृष्टीकोन व्यापक -प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण

विरोधकांची मराठी भाषेबाबतची भूमिका नकारात्मक मुंबई :  भाजपाचे मराठी म्हणजे मराठी व्याकरणातल्या अनेकवचन

आर्मर सिक्युरिटी इंडिया आयपीओला पहिल्या दिवशी थंड प्रतिसाद! दुपारपर्यंत केवळ ०.०३ पटीने मिळाले सबस्क्रिप्शन

मोहित सोमण: आजपासून आर्मर सिक्युरिटी इंडिया लिमिटेड (Armour Security India Limited) कंपनीचा आयपीओ (IPO) बाजारात गुंतवणूकदारांसाठी

वर्षभरात १ लाख व्हिसा रद्द; नियम मोडणाऱ्यांना दणका

८ हजार भारतीय विद्यार्थ्यांवरही टांगती तलवार नवी दिल्ली : अमेरिकेला अधिक सुरक्षित करण्यासाठी आणि बेकायदेशीर

कॅनडात १४० कोटींच्या सोन्याची चोरी

मास्टरमाईंड भारतात लपल्याचा दावा टोरंटो : टोरंटो पिअरसन आंतरराष्ट्रीय विमानतळावर झालेल्या २ कोटी कॅनेडियन