Missing case : गळ्यातील लॉकेटमध्ये क्यूआर कोड! हरवलेला दिव्यांग मुलगा सहा तासांतच परतला घरी

तंत्रज्ञानामुळे कुलाबा पोलिसांना मुलाच्या पालकांपर्यंत पोहोचण्यात मिळाले यश


नेमकं काय घडलं?


मुंबई : हल्लीच्या काळात तंत्रज्ञानाचा (Technology) वापर इतका वाढला आहे की त्याशिवाय आपण जगूच शकत नाही अशी वेळ आली आहे. मात्र, या तंत्रज्ञानाचा वापर कसा आणि किती करावा हे आपल्याला कळलं पाहिजे. एका दिव्यांग (Intellectually Challenged) मुलाच्या पालकांनी तंत्रज्ञानाचा योग्य वापर केला आणि त्यांचा हरवलेला मुलगा (Missing child) अवघ्या सहा तासांत त्यांना परत मिळाला. मुंबईच्या वरळी भागात राहणारा हा दिव्यांग मुलगा खेळता खेळता बसमध्ये चढला आणि हरवला. मात्र त्याच्या गळ्यात असलेल्या लॉकेटमध्ये असलेल्या क्यूआर कोडमुळे (QR code) पोलिसांना काही वेळातच त्याच्या पालकांपर्यंत पोहोचता आलं.


ही घटना कुलाबा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. या प्रकरणाची माहिती देताना कुलाबा पोलीस ठाण्याने सांगितले की, विनायक कोळी असे या मुलाचे नाव आहे. वरळी परिसरातून खेळत असताना विनायक बसमध्ये बसला आणि बसमध्येच निघून गेला. तो हरवला असल्याचे समजताच कंडक्टरने पोलिसांशी संपर्क साधला. कंडक्टरने सांगितले की बसमध्ये एक मुलगा बसला आहे, जो मानसिकदृष्ट्या अस्थिर आहे. तो फक्त त्याचे नाव सांगू शकतो. माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले आणि मुलाला पोलिस ठाण्यात घेऊन गेले.


यानंतर पोलिसांनी त्याच्या लॉकेटमध्ये क्यूआर कोड पाहिल्यानंतर त्यांनी तो स्कॅन केला. मुलाच्या गळ्यात असलेल्या लॉकेटचा क्यूआर कोड स्कॅन केला असता घरातील सदस्यांचा पत्ता आणि फोन नंबर सापडला. त्यानंतर त्याच्या कुटुंबीयांशी संपर्क साधण्यात आला. तपशीलांची पुष्टी केल्यानंतर मुलाला त्याच्या वडिलांच्या स्वाधीन करण्यात आले. कुलाबा पोलिसांनी पुढे सांगितले की, हा मुलगा वरळी येथून दुपारी ३ वाजता बेपत्ता झाला होता. रात्री आठच्या सुमारास पोलिसांच्या पथकाने त्याला पुन्हा पालकांच्या स्वाधीन केले.



तंत्रज्ञानाने बजावली महत्त्वाची भूमिका


लॉकेटबद्दल डेटा इंजिनियर अक्षय रिडलान यांनी सांगितले की, आपल्या मुलाला अशा कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीतून वाचवण्यासाठी त्यांनी हे QR कोड लॉकेट मुलाच्या गळ्यात घातले होते. ज्यामध्ये मुलाच्या कुटुंबाशी संपर्क साधण्यासाठी माहिती असलेली लिंक दिली आहे. या मुलाला पुन्हा कुटुंबाशी जोडण्यात तंत्रज्ञानाने महत्त्वाची भूमिका बजावली.

Comments
Add Comment

Amit Satam : विधान भवनाच्या पायऱ्यांवरील कॅमेऱ्यांना आवरा; अमित साटम यांची मागणी

- मृत्यूवर हसलो नाही, दिशाभूल करणाऱ्या व्हिडिओची चौकशी करा मुंबई : विधानभवनाच्या परिसरात माध्यमांशी संवाद साधत

Ram Kadam : कबुतरांमुळे माझ्या आईचा जीव गेला!

- भाजप आमदार राम कदमांचा विधानसभेत दावा; तज्ज्ञांची समिती स्थापन करण्याचे विधानसभा अध्यक्षांचे निर्देश मुंबई :

Central Railway : दरडीनंतर मध्य रेल्वेचा मोठा दिलासा! तब्बल ८० हजार प्रवाशांना ६ कोटींचा परतावा; गेल्या वर्षाच्या तुलनेत दुप्पट वाढ

कर्जत–लोणावळा दरम्यान ६ जुलै रोजी दरड कोसळल्यामुळे रेल्वे वाहतुकीवर मोठा परिणाम झाला. अनेक गाड्या रद्द करण्यात

Mumbai-Nanded Weekly Trains : आनंदवार्ता! मुंबई आणि नांदेड दरम्यान नियमितपणे २ साप्ताहिक गाड्या सुरू

मुंबई : मध्य रेल्वेने लोकमान्य टिळक टर्मिनस आणि हुजूर साहेब नांदेड दरम्यान नियमितपणे चालणाऱ्या २ साप्ताहिक

Chandrashekhar Bawankule : बँक हमीपत्रांवर आता स्वतंत्र प्रवर्गानुसार मुद्रांक शुल्क

महाराष्ट्र मुद्रांक अधिनियमातील महत्त्वाचे बदल; नूतनीकरणाच्या दुहेरी शुल्कातून व्यापार-उद्योगांना कायमची

Ganesh Naik : वाघांच्या भ्रमणमार्गाशी संबंध नसलेली गावे सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातून वगळणार

 वन मंत्री गणेश नाईक; विदर्भात नवीन व्याघ्र प्रकल्प, तर उर्वरित महाराष्ट्रात बिबट संवर्धनाचे नियोजन मुंबई :