Missing case : गळ्यातील लॉकेटमध्ये क्यूआर कोड! हरवलेला दिव्यांग मुलगा सहा तासांतच परतला घरी

तंत्रज्ञानामुळे कुलाबा पोलिसांना मुलाच्या पालकांपर्यंत पोहोचण्यात मिळाले यश


नेमकं काय घडलं?


मुंबई : हल्लीच्या काळात तंत्रज्ञानाचा (Technology) वापर इतका वाढला आहे की त्याशिवाय आपण जगूच शकत नाही अशी वेळ आली आहे. मात्र, या तंत्रज्ञानाचा वापर कसा आणि किती करावा हे आपल्याला कळलं पाहिजे. एका दिव्यांग (Intellectually Challenged) मुलाच्या पालकांनी तंत्रज्ञानाचा योग्य वापर केला आणि त्यांचा हरवलेला मुलगा (Missing child) अवघ्या सहा तासांत त्यांना परत मिळाला. मुंबईच्या वरळी भागात राहणारा हा दिव्यांग मुलगा खेळता खेळता बसमध्ये चढला आणि हरवला. मात्र त्याच्या गळ्यात असलेल्या लॉकेटमध्ये असलेल्या क्यूआर कोडमुळे (QR code) पोलिसांना काही वेळातच त्याच्या पालकांपर्यंत पोहोचता आलं.


ही घटना कुलाबा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. या प्रकरणाची माहिती देताना कुलाबा पोलीस ठाण्याने सांगितले की, विनायक कोळी असे या मुलाचे नाव आहे. वरळी परिसरातून खेळत असताना विनायक बसमध्ये बसला आणि बसमध्येच निघून गेला. तो हरवला असल्याचे समजताच कंडक्टरने पोलिसांशी संपर्क साधला. कंडक्टरने सांगितले की बसमध्ये एक मुलगा बसला आहे, जो मानसिकदृष्ट्या अस्थिर आहे. तो फक्त त्याचे नाव सांगू शकतो. माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले आणि मुलाला पोलिस ठाण्यात घेऊन गेले.


यानंतर पोलिसांनी त्याच्या लॉकेटमध्ये क्यूआर कोड पाहिल्यानंतर त्यांनी तो स्कॅन केला. मुलाच्या गळ्यात असलेल्या लॉकेटचा क्यूआर कोड स्कॅन केला असता घरातील सदस्यांचा पत्ता आणि फोन नंबर सापडला. त्यानंतर त्याच्या कुटुंबीयांशी संपर्क साधण्यात आला. तपशीलांची पुष्टी केल्यानंतर मुलाला त्याच्या वडिलांच्या स्वाधीन करण्यात आले. कुलाबा पोलिसांनी पुढे सांगितले की, हा मुलगा वरळी येथून दुपारी ३ वाजता बेपत्ता झाला होता. रात्री आठच्या सुमारास पोलिसांच्या पथकाने त्याला पुन्हा पालकांच्या स्वाधीन केले.



तंत्रज्ञानाने बजावली महत्त्वाची भूमिका


लॉकेटबद्दल डेटा इंजिनियर अक्षय रिडलान यांनी सांगितले की, आपल्या मुलाला अशा कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीतून वाचवण्यासाठी त्यांनी हे QR कोड लॉकेट मुलाच्या गळ्यात घातले होते. ज्यामध्ये मुलाच्या कुटुंबाशी संपर्क साधण्यासाठी माहिती असलेली लिंक दिली आहे. या मुलाला पुन्हा कुटुंबाशी जोडण्यात तंत्रज्ञानाने महत्त्वाची भूमिका बजावली.

Comments
Add Comment

Rashmi Shukla : रश्मी शुक्लांकडे नवी जबाबदारी, लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांच्या व्यवहारांवर राहणार करडी नजर

मुंबई : महाराष्ट्राच्या माजी पोलीस महासंचालक (DGP) रश्मी शुक्ला यांच्यावर नव्या जबाबदारीची धुरा सोपवण्यात आली आहे.

Dharavi Redevelopment Vijay Singhal : विजय सिंघल यांची धारावी पुनर्वसनाच्या विशेष कार्य अधिकारी पदी नियुक्ती

- राज्य शासनाकडून १२ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या मुंबई : राज्य सरकारने मंगळवारी (१६ जून) बारा सनदी

BMC APP : रस्त्यांवर खड्डे दिवसात का? करा माय बीएमसी मार्ग ऍपवर तक्रार

Mumbai : नागरिकांच्या तक्रारींचे जलद व प्रभावी निवारण करण्याच्या उद्देशाने मुंबई महानगरपालिकेने या वर्षी ‘MyBMC MARG’

BMC : घरकाम करणाऱ्या महिलांच्या सक्षमीकरणासाठी पालिकेचे 'अ‍ॅप' विकसित करा; महिला व बाल कल्याण समिती अध्यक्षांची मागणी

मुंबई: मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून प्रशिक्षण घेतलेल्या महिला बचत गटातील सदस्यांना हक्काचा रोजगार

Industrial and commercial water usage : तरण तलाव, बांधकामांच्या ठिकाणच्या जलजोडण्या करणार खंडित

औद्योगिक व व्यावसायिक पाणी वापरात २० टक्के कपात मुंबई: पावसाळा लांबणीवर पडल्याने मुंबईत १५ मे २०२६ पासून १०

Commissioner Dr. Ashwini Joshi : अतिरिक्त आयुक्त डॉ. अश्विनी जोशी यांची बदली

प्राजक्ता लवंगारे-वर्मा यांची नियुक्ती मुंबई  : मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त डॉ. अश्विनी जोशी यांची