IPL 2024: बुमराहने बिघडवले विराटचे गणित पाहा video

Share

मुंबई: आयपीएल २०२४मध्ये(ipl 2024) मुंबई इंडियन्स(mumbai indians) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू(royal challengers bangalore) यांच्यातील सामना रोहित शर्मा आणि विराट कोहली असा पाहिला जात होता. मात्र जसप्रीत बुमराहने मध्येच एंट्री घेत हा सामना अधिक रोमांचक केला. सुपर फॉर्मात असलेला विराट कोहली गुरूवारी बुमराहसमोर अगदीच असहाय्य दिसला.

विराट कोहली मुंबई इंडियन्सविरुद्ध केवळ ३ धावा करून बाद झाला. त्याला या ३ धावा करण्यासाठी ९ बॉलचा सामना करावा लागा. या सामन्यात विराट फॉर्मात दिसत नव्हता. त्याने पहिल्या ओव्हरमध्ये मोहम्मद नबीचे तीन बॉल खेळले आणि केवळ दोन धावा केल्या. दुसऱ्या ओव्हरमध्येही त्याला एक धाव करण्यासाठी तीन बॉल खेळावे लागले.

 

तिसऱ्या ओव्हरमध्ये जसप्रीत आला. या ओव्हरमध्ये कोहली पहिल्या दोन बॉलवर एकही धाव करू शकला नाही. दुसरा बॉल तर एलबीडब्लू झाला. दरम्यान बॉल लेग स्टंप मिस करत होता आणि अंपायरने आऊट दिले नाही. ओव्हरचा तिसरा बॉल गुड लेंथ होता. त्यावर विराटने मोठा शॉट खेळण्याचा प्रयत्न केला मात्र विराट शॉट खेळण्याच्या स्थितीत नव्हता आणि बॉल त्याच्या बॅटच्या इनसाईड एजला घेऊन इशान किशनच्या हातात गेला.

या पद्धतीने विराट कोहली मुंबई इंडियन्सविरुद्ध ९ बॉलवर ३ धावा करून बाद झाला. हा आयपीएल २०२४मधील त्याचा सर्वात कमी स्कोर आहे. विराटने या स्पर्धेत अनुक्रमे २१, ७७, नाबाद ८३, २२, नाबाद ११३ धावांची खेळी केली होती.

Recent Posts

या २ घरांच्या उंबरठ्यावरूनच मागे जाते लक्ष्मी, कुटुंबात राहते आर्थिक तंगी

मुंबई: आचार्य चाणक्य यांनी अशा घरांचे वर्णन निती शास्त्रात केले आहे जिथे लक्ष्मी मातेला जायला…

8 mins ago

विधिमंडळात विश्वविजेत्या क्रिकेटपटूंचा सत्कार; मुख्यमंत्र्यांकडून ११ कोटींचे बक्षीस

मुंबई : आयसीसी टी २० विश्वचषक स्पर्धेत टीम इंडियाने दैदीप्यमान कामगिरी करत विश्वचषक जिंकला. भारतीय…

51 mins ago

Motorolaने भारतात लाँच केला नवा फ्लिप फोन, ५ इंचाचा कव्हर डिस्प्ले

मुंबई: Motorola Razr 50 Ultra गुरूवारी भारतात लाँच करण्यात आला. हा कंपनीचा नवा क्लॅमशेल-स्टाईलचा फोल्डेबल…

1 hour ago

Video: बरं झालं सूर्याच्या हाताला बॉल बसला नाहीतर…विधानभवनात रोहितची मराठीत फटकेबाजी

मुंबई: टी-२० वर्ल्डकप २०२४ जिंकून आलेल्या टीम इंडियाचे गुरूवारी मुंबईत अतिशय भव्य दिव्य स्वागत झाले.…

2 hours ago

‘ब्रेन इटिंग अमिबा’ मुळे केरळमध्ये तीन मुलांचा मृत्यू

थिरुवनंतपुरम : केरळमध्ये दुषित पाण्यात आंघोळ केल्यामुळे १४ वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला आहे. अमिबामुळे मेंदूला…

3 hours ago

T20 World Cup नंतर ऑलिम्पिकमध्ये फडकणार तिरंगा? राहुल द्रविडने पंतप्रधान मोदींना दिले वचन!

मुंबई: भारतीय खेळाडू टी-२० वर्ल्डकप जिंकल्यानंतर मायदेशात परतले आहेत. यानंतर रोहित शर्माच्या नेतृत्वातील टीम इंडियाच्या…

3 hours ago