Varsha Gaikwad : 'जागावाटपात मला विचारात घेतलं नाही!' वर्षा गायकवाड यांनी जाहीरपणे व्यक्त केली खदखद

  108

मविआच्या जागावाटपावर अजूनही नाराजीसत्र


मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी (Loksabha Election) महाविकास आघाडीने (Mahavikas Aaghadi) एकत्र पत्रकार परिषद घेत जागावाटपाचा फॉर्म्युला जाहीर केला. यामध्ये ठाकरे गट २१, काँग्रेस १७ तर शरद पवार गट १० जागा लढवणार असल्याचे सांगण्यात आले. मात्र, या जागावाटपावरुन काँग्रेसच्या नेत्यांमध्ये कमालीची नाराजी पसरली आहे. नाना पटोलेंसह (Nana Patole) सर्व नेते यावर नाराज आहेत. मुंबई काँग्रेसने बुधवारी आयोजित केलेल्या बैठकीला मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनीच दांडी मारल्यामुळे ही बैठक रद्द करण्यात आली आणि त्यांची नाराजी आणखी स्पष्टपणे दिसून आली. त्यातच आज त्यांनी 'जागावाटपात मला विचारात घेतलं नाही!' अशी मनातील खदखद माध्यमांसमोर जाहीरपणे बोलून दाखवली. त्यामुळे येत्या काळात मविआमध्ये आणखी बिनसण्याची शक्यता नाकारता येत नाही.


वर्षा गायकवाड यांनी आज सकाळी पत्रकार परिषद घेतली. त्या म्हणाल्या, पक्षाने घेतलेल्या निर्णयानंतर आम्ही कामाला लागलो आहोत. आमचं काही म्हणणं असेल तर ते पक्षासमोर मांडू. असं असलं तरी मुंबईचं एक वेगळं अस्तित्व आहे, पक्षसंघटनेत काम करत असताना कार्यकर्त्यांच्याही काही अपेक्षा असतात, त्याचा विचार करण्याची गरज आहे. मुंबईमध्ये पक्षाला प्रतिनिधीत्व मिळावं ही आमची अपेक्षा आहे, आमच्या पक्षाने कठोर भूमिका घ्यायला पाहिजे होती. मुंबईतलं जागावाटप करताना विश्वासात घेतलं नाही, अशी नाराजी त्यांनी व्यक्त केली.


पुढे त्या म्हणाल्या, मुंबईत सन्मानजनक जागावाटप होणे गरजेचे होते; परंतु उद्धव ठाकरे यांच्या पक्षाने मुंबईतील चार जागांवर परस्पर उमेदवार जाहीर केले, अशी काँग्रेसच्या मुंबईतील नेत्यांची नाराजी आहे. त्यातही, ज्या दक्षिण मध्य मुंबईच्या जागेवर एकेकाळी काँग्रेसचे एकनाथ गायकवाड विजयी झाले होते, त्या जागेवर अनिल देसाई यांना उमेदवारी दिली. त्यामुळे काँग्रेसचे पदाधिकारी नाराज झाले आहेत. ही जागा आपल्याला मिळावी असा आग्रह वर्षा गायकवाडांसह काँग्रेस कार्यकर्त्यांनी धरला आहे. त्यामुळे वर्षा गायकवाड यांनी नाराजी थेट दिल्लीला फोन करून कळवली असल्याचे समजते.



आम्हाला दोन ते तीन जागा मिळाव्यात


मुंबईमध्ये मागील काळात आम्ही पाच जागा लढायचो आणि राष्ट्रवादी एक सीट लढायची. सध्या महाविकास आघाडीमध्ये आम्ही देखली समान सहभागी आहोत. जागावाटपानंतर मी काही प्रमाणात नाराज आहे. यासंदर्भात मी पक्ष श्रेष्ठी आणि राज्यातील नेत्यांना देखील सांगितलं आहे. आम्हाला कमीत कमी दोन ते तीन जागा मिळाव्यात, असं वर्षा गायकवाड म्हणाल्या. मविआमध्ये काहीही आलबेल नसल्याची ही चिन्हे आहेत. त्यामुळे निवडणुकीपर्यंत मविआ एकत्र राहणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.


Comments
Add Comment

डीनो मोरियाच्या ईडी चौकशीत सुशांत–दिशा हत्या प्रकरणाचे धागेदोरे उलगडणार?

मुंबई : बॉलिवूड अभिनेता डिनो मोरिया, एकेकाळचा बॉलीवूड अभिनेता आणि आज एक संशयित घोटाळेबाज! मुंबईच्या मीठी नदी

Azaan controversy: ‘अजान’वरून राजकारण? पोलिसांचे पाऊल कायद्याच्या चौकटीतच!

मुंबई : मुंबई पोलिसांनी अजानसाठी वापरल्या जाणाऱ्या लाऊडस्पीकर्सवर कारवाई सुरू केल्यानंतर काही मुस्लिम

महालक्ष्मी रेसकोर्सवर 'इव्हेंट जॅकपॉट' महापालिकेने कमावले तब्बल ७.५ कोटी!

मुंबई : मुंबईच्या महालक्ष्मी रेसकोर्सवर बीएमसीने कमाईची 'रेस' लावली आहे. जुलै २०२४ पासून मुंबई महापालिकेने

Mukesh Ambani: मुकेश अंबानी यांची आयसीटीला १५१ कोटींची देणगी म्हणाले....

प्रतिनिधी: रिलायन्स इंडस्ट्रीजचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांनी इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी (ICT) ला तब्बल

Apple WWDC News: नवा आयफोन घेताय मग थांबा....  नव्या खरेदीपूर्वी हे वाचा....

मुंबई: ॲपल डब्लूडब्लूडीसी (Apple WWDC) चा कार्यक्रम ९ जूनला कॅलिफोर्निया कलिफमध्ये होणार आहे. वर्षातील सर्वात मोठा

Gold Silver Rate: चार दिवस सनसनाटी वाढीनंतर गुंतवणूकदारांना चालून आली संधी सोने 'इतक्या' रुपयांनी स्वस्त चांदी 'जैसे थे'

प्रतिनिधी: चार दिवसांच्या सनसनाटी वाढीनंतर सोन्याच्या दराने विश्रांती घेतली आहे. आज सराफ बाजारात सोन्याच्या