विशाल पाटलांचे बंधू प्रकाश आंबेडकरांना भेटले; ठाकरेंच्या उमेदवाराचा होणार गेम?

सांगली : महाविकास आघाडीत सांगलीच्या जागेवर आग्रही असणारे काँग्रेसचे नेते विशाल पाटील (Vishal Patil) यांचे बंधू प्रतिक पाटील यांनी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांची भेट घेतली. त्यामुळे सांगलीत वंचितकडून विशाल पाटील यांना उमेदवारी देणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.


महाविकास आघाडीत सांगलीच्या जागेवरून बराच वाद झाला होता. शेवटच्या क्षणापर्यंत रस्सीखेच सुरू होती. ठाकरे गटाने चंद्रहार पाटलांना सांगलीतून उमेदवारी घोषित केली. त्यावर काँग्रेसने तीव्र नाराजी व्यक्त केली. असं सर्व सुरू असताना, ही जागा ठाकरेंना देण्यात आली. परंतु आता ठाकरेंच्या उमेदवाराचा गेम होणार की काय? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.


सांगलीच्या जागेवर आग्रही असणारे काँग्रेसचे विशाल पाटील यांचे बंधू प्रतिक पाटील यांनी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली आहे. त्यामुळे सांगलीतून वंचित विशाल पाटील यांना उमेदवारी देणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.


प्रकाश आंबेडकर आता काय निर्णय घेतात? याकडे सुद्धा लक्ष असेल. काँग्रेसने आधीच ठरवलं पाहिजे की महाराष्ट्रात त्यांना आपला अस्तित्व ठेवायचे की नाही? अशी विचारणा आंबेडकर यांनी केली आहे.


दरम्यान सांगलीमध्ये उबाठा गटात ताकद नसल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे. ते म्हणाले की, आज सकाळी पाटील मला भेटून गेले आहेत. त्यामुळे पुढील निर्णय लवकरच घेऊ. सध्या कुठल्याही आग्रह केलेला नाही किंवा कुठलही सजेशन दिलं नसल्याचं आंबेडकर म्हणाले.

Comments
Add Comment

नागपूर AIMS मधील विद्यार्थ्यांच्या जेवणात आढळल्या चक्क अळ्या..... सोशल मीडियावर चर्चेला उधाण

नागपूर : अनेक विद्यार्थी शिक्षणासाठी आपल्या घरापासून दूर असतात. अशावेळी जेवणाची सोय होते ती खाणावळीतून किंवा

Pune ZP News : पुणे : राजकीय हालचालींना वेग; अध्यक्षपदाची खुर्ची कोणाची? निवडीची तारीख ठरली

पुणे : राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांचा धुराळा शांत झाल्यानंतर आता खऱ्या

DA Hike: राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ

मुंबई: राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वीच मोठी आनंदवार्ता जाहीर करण्यात आली आहे.

राज्यात रस्ता अपघाती मृत्यूंमध्ये ८ टक्क्यांची घट; परिवहन विभागाकडून आकडेवारी जाहीर

- २०३० पर्यंत अपघात निम्म्यावर आणण्याचे परिवहन विभागाचे उद्दिष्ट मुंबई : राज्यात रस्ता सुरक्षेसाठी परिवहन

भिगवण प्रकरणात मोठा ट्विस्ट; पाच दिवसात तरुणीने बदलला निर्णय

पुणे : महाष्ट्राभर चर्चा असलेल्या भिगवण प्रकरणात अनेक दावे , प्रतिदावे समोर येत होते, पण आता स्वतः मुलीनेच

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाकडून ४२ मौलिक ग्रंथांचे प्रकाशन

मुंबई : मराठी भाषा गौरव दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळातर्फे यंदा ४२ मौलिक ग्रंथांचे