विशाल पाटलांचे बंधू प्रकाश आंबेडकरांना भेटले; ठाकरेंच्या उमेदवाराचा होणार गेम?

सांगली : महाविकास आघाडीत सांगलीच्या जागेवर आग्रही असणारे काँग्रेसचे नेते विशाल पाटील (Vishal Patil) यांचे बंधू प्रतिक पाटील यांनी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांची भेट घेतली. त्यामुळे सांगलीत वंचितकडून विशाल पाटील यांना उमेदवारी देणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.


महाविकास आघाडीत सांगलीच्या जागेवरून बराच वाद झाला होता. शेवटच्या क्षणापर्यंत रस्सीखेच सुरू होती. ठाकरे गटाने चंद्रहार पाटलांना सांगलीतून उमेदवारी घोषित केली. त्यावर काँग्रेसने तीव्र नाराजी व्यक्त केली. असं सर्व सुरू असताना, ही जागा ठाकरेंना देण्यात आली. परंतु आता ठाकरेंच्या उमेदवाराचा गेम होणार की काय? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.


सांगलीच्या जागेवर आग्रही असणारे काँग्रेसचे विशाल पाटील यांचे बंधू प्रतिक पाटील यांनी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली आहे. त्यामुळे सांगलीतून वंचित विशाल पाटील यांना उमेदवारी देणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.


प्रकाश आंबेडकर आता काय निर्णय घेतात? याकडे सुद्धा लक्ष असेल. काँग्रेसने आधीच ठरवलं पाहिजे की महाराष्ट्रात त्यांना आपला अस्तित्व ठेवायचे की नाही? अशी विचारणा आंबेडकर यांनी केली आहे.


दरम्यान सांगलीमध्ये उबाठा गटात ताकद नसल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे. ते म्हणाले की, आज सकाळी पाटील मला भेटून गेले आहेत. त्यामुळे पुढील निर्णय लवकरच घेऊ. सध्या कुठल्याही आग्रह केलेला नाही किंवा कुठलही सजेशन दिलं नसल्याचं आंबेडकर म्हणाले.

Comments
Add Comment

मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर आणखी एक अपघात, वाहतुकीची कोंडीच कोंडी

पुणे : मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर खंडाळा घाटातील आडोशी बोगद्याजवळ पुण्याकडून मुंबईच्या दिशेने प्रोपिलीन वायू

आपत्कालीन परिस्थितीतील वाहतूक आराखडा तत्काळ तयार करा - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश

मुंबई पुणे द्रुतगती महामार्ग वाहतूक कोंडीची उपमुख्यमंत्र्यांकडून गंभीर दखल मिसिंग लिंकचे कामही लवकरात लवकर

अमरावती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयासाठी १२ हेक्टर जागा मंजूर

देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेवरून महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा निर्णय १०० विद्यार्थी प्रवेश ⁠४३०

पुणे एक्सप्रेस वे अपघात प्रकरणी महाराष्ट्र राज्य परिवहन सेवेच्या १३९ फेऱ्या रद्द

मुंबई : पुणे–मुंबई एक्सप्रेस वेवर झालेल्या टँकर अपघातामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली असून या

एक्सप्रेवेवर प्रचंड मोठी वाहतूक कोंडी अन् २५ किलोमीटर पर्यंत रांगा; नेमकं पुण्यात घडलं काय ?

लोणावळा : मुंबई–पुणे द्रुतगती महामार्गावर मंगळवारी सायंकाळी घडलेल्या एका अपघातामुळे संपूर्ण मार्गावर

Congress: काँग्रेसमधला वाद चव्हाट्यावर, नगरसेवक थेट दिल्लीत पोहोचले, बैठकीत नेमकं घडलं काय?

दिल्ली: चंद्रपूर महापालिकेत सर्वाधिक जागा जिंकूनही काँग्रेसमध्ये गटातील राजकारणामुळे सत्ता गमावण्याची वेळ