Harbour Line : मुंबईकरांना दिलासा! हार्बर रेल्वे बोरिवलीपर्यंत धावणार

कधी होणार प्रवास सुरु?


मुंबई : प्रवाशांची होणारी धावपळ आणि गर्दीमुळे पश्चिम रेल्वेने (western railway) हार्बर मार्गाचा (Harbour Line) बोरिवलीपर्यंत दोन टप्प्यांत विस्तार करण्याचा निर्णय घेतला आहे. पश्चिम रेल्वेने हार्बर मार्गावर लोकल ट्रेन आता बोरिवलीपर्यंत धावणार आहे. त्यामुळे हार्बर रेल्वेचा मार्ग ८ किलोमीटरने वाढणार आहे. या प्रकल्पाचं काम २०२७-२८ या वर्षात पूर्ण होणार आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर बोरिवलीपर्यंत पश्चिम रेल्वे व हार्बर रेल्वे असे दोन पर्याय उपलब्ध होणार असल्यामुळे मुंबईकरांना दिलासा मिळणार आहे.


हार्बर मार्ग बोरिवलीपर्यंत विस्तारीकरण केल्याने पश्चिम मार्गावरील अंधेरी आणि बोरिवली स्टेशनदरम्यानची लोकल गर्दी कमी होण्यास मदत मिळणार आहे. या प्रकल्पासाठी निविदा मे महिन्यात जारी होण्याची शक्यता आहे. तर या प्रकल्पाचं काम १५ जूनपासून सुरु होण्याची शक्यता आहे. या प्रकल्पासाठी ८२५ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात गोरेगाव ते मालाडपर्यंत स्टेशनचा विस्तार होणार आहे. तर मालाड ते बोरिवली या दुसऱ्या टप्यात ५ किलोमीटरचं काम पूर्ण होईल, असे पश्चिम रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.


सध्या हार्बर मार्गावर लोकल ट्रेन या सीएसएमटी ते गोरेगाव स्टेशनपर्यंत रेल्वेसेवा सुरु आहे. मागच्या वेळी हार्बर मार्गावर अंधेरी ते गोरेगाव हा टप्पा वाढविण्यात आला होता. या टप्प्याचं काम २०१८ पर्यंत पूर्ण झालं होतं. दरम्यान, बोरिवलीपर्यंत हार्बर विस्तारीकरण करण्यासाठीचं प्राथमिक काम पूर्ण झालं आहे. या कामासाठी भू-तांत्रिक तपासणी, सर्वेक्षण, झाडांचे ड्रोन सर्वेक्षण आदी कामांचा समावेश आहे. यामुळे भविष्यात वातानुकूलित लोकल चालवणेही शक्य होणार असल्याचेही नमूद केले.

Comments
Add Comment

अविवाहित, विधवा आणि घटस्फोटित मुलींना मोठा दिलासा

लातूर : राज्य सरकारने सामाजिक सुरक्षेच्या दृष्टीने एक अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून, आता राज्य सरकारी

सिद्धिविनायक मंदिरात चोरी झाली उघड; कर्मचारीच....

मुंबई : प्रभादेवी येथील प्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिरात चोरीची घटना समोर आल्यानंतर शहरात खळबळ उडाली आहे.

राज्यातील हॉटेल, उपहारगृहांसाठी आता २० टक्के अतिरिक्त गॅस पुरवठा होणार- अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ

राज्यातील हॉटेल, ढाबे,उपहारगृहे, औद्योगिक कॅन्टीन, अन्न प्रक्रिया-दुग्धव्यवसाय, राज्य शासन किंवा स्थानिक

मुंबई ते अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाविषयी महत्वाची अपडेट

मुंबई : मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या कामाला आता गती मिळण्याची चिन्हे दिसत आहेत. या प्रकल्पातील

अचानक मोबाईलचं नेटवर्क गायब झाल्यास 'या' गोष्टी करा

सध्याच्या काळात मोबाईल प्रत्येकाच्या आयुष्यातील महत्वाचा भाग आहे. आजच्या काळात एकमेकांशी संपर्क

MHADA Lottery: मुंबईसह ठाण्यात बंपर लॉटरी, पाच हजार घरांची लॉटरी कोणत्या प्राईम लोकेशनवर?

मुंबई: मुंबई-ठाणे या शहरात हक्काचे घर घेणे सामान्यांच्या आवाक्या बाहेर आहे मात्र याच शहरात तुमचं घर होणारं.