Nitesh Rane: बाळासाहेबांच्या हिंदुत्वाला पुढे नेणारे मोदीच

उबाठा सेनेवर आमदार नितेश राणे यांचा पलटवार


मुंबई : हिंदू धर्माला खऱ्या अर्थाने मान मिळवून देणारे हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाला खऱ्या अर्थाने ताकद मिळवून देणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra modi) करत आहेत. ते धर्म आणि अधर्माची लढाई लढणार आहेत. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) व संजय राऊत (sanjay raut) मोदींवर टीका करत असल्याबद्दल आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्यावर जोरदार पलटवार केला आहे.


आमदार राणे पत्रकार परिषदेत म्हणाले की, उबाठामधील शहाणे व्यक्ती भांडुपमध्ये बसून शहाणपण शिकवत होते. ते म्हणजे संजय राऊत, उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे, असल्याची टीका राणे यांनी केली. संजय राऊत म्हणतात की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना उद्धव ठाकरेंची भीती वाटते. ज्या उद्धव ठाकरेंनी उभ्या आयुष्यात स्वतःवर साधी एनसी नोंदवून घेता आली नाही, त्यांना देशाचे पंतप्रधान घाबरणार का? ज्यांना पाकिस्तान चीन, मोठ्यातील मोठा अंडरवर्ल्ड, अतिरेकी घाबरतात ते पंतप्रधान मोदी असल्याचे राणे म्हणाले.


हिंदू नवनर्ष निमित्ताने ही लढाई धर्म आणि अधर्मामध्ये असल्याचे राऊत म्हणत आहेत. ज्या उद्धव ठाकरे यांना हिंदू बोलताना भीती वाटते, विचार करावा लागतो, ज्याची काँग्रेसच्या व्यासपीठावर हिंदू म्हणजे काय हे बोलताना भीती वाटत असल्याचा टोला राणे यांनी लगावला.


लोकांच्या जीवावर आपले आयुष्य जगतात ते आमच्या नेत्यांना खंडणीखोर म्हणतात हा मोठा जोक आहे. जय भवानी जय शिवाजी टाक खंडणी म्हणजे उद्धव ठाकरे, असल्याची टीका राणे म्हणाले.


आम्ही संजय राऊत यांच्यावर खिचडी चोरीचे आरोप केले होते. त्यावर उरलेला बुरखा संजय निरुपम यांनी फडलेला असल्याचे राणे म्हणाले.

Comments
Add Comment

साठाव्या वाढदिवसानिमित्त चाहत्यांसाठी किंग खानची खास 'भेट'; गाजलेले चित्रपट पुन्हा होणार प्रदर्शित

मुंबई: बॉलिवूडचा 'किंग खान' शाहरुख खान १९९१ मध्ये दिल्लीहून मुंबईत आला आणि त्यानंतर तो थेट करोडो प्रेक्षकांच्या

राम मंदिराच्या दर्शनाची वेळ बदलली , जाणून घ्या अयोध्यातील दर्शनाची वेळ...

अयोध्या : अयोध्येतील श्रीराम मंदिर म्हणजे श्रद्धा आणि भक्तीचा अनोखा संगम. दिवसेंदिवस प्रभू रामाचे दर्शन

लिंबू पाणी प्यायल्यामुळे वजन कमी होते का ? वाचा सविस्तर...

बऱ्याच लोकांना आपला दिवस एक ग्लास लिंबू सरबताने सुरू करणे आवडते. लिंबाचे पाणी शरीराला डिटॉक्स करते आणि पचन

महिलांची हातचलाखी सीसीटीव्हीत दिसली, सोन्याची अंगठी चोरतानाचा व्हिडीओ व्हायरल

नवी दिल्ली: पूर्व दिल्लीतील लक्ष्मी नगरमधील विजय चौक परिसरातील एका ज्वेलरी दुकानात महिलांनी सोन्याची अंगठी

“विकसित भारत चॅलेंज ट्रॅक” मुंबईत युवा महोत्सव २७ ऑक्टोबरला

मुंबई : युवकांचा सर्वांगीण विकास, भारतीय संस्कृती आणि परंपरेचे जतन, सुप्त गुणांना प्रोत्साहन तसेच राष्ट्रीय

तिसऱ्या युथ आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताला सुवर्ण

मुंबई : बहरीनमधील मनामा येथे आशियाई युवा क्रीडा स्पर्धा २०२५ मध्ये भारताने कबड्डीमध्ये पूर्ण विजय मिळवत सुवर्ण