Bullet Train: जपानची बुलेट ट्रेन होती बंद पडण्याच्या मार्गावर

किंगफिशरच्या आकाराने मिळाले नवे तंत्रज्ञान


टोकियो : देशातील सर्वसामान्यांसाठी रेल्वे सुविधा सातत्याने प्रगत होत आहेत. वंदे भारत गाड्यांपासून ते अमृत भारत स्थानकापर्यंत प्रत्येक गोष्टीत पर्यटकांना जागतिक दर्जाची सेवा मिळते. पण भारतातील रेल्वेबाबत एक गेम चेंजर प्रकल्प पूर्णत्वाच्या मार्गावर आहे. हा देशातील पहिला हाय-स्पीड रेल्वे प्रकल्प आहे, म्हणजेच मुंबई आणि अहमदाबाद दरम्यान देशातील पहिली बुलेट ट्रेन. या ट्रेनची वाट पाहात असतानाच जपानच्या बुलेट ट्रेन विषयी भारतीयांना खूप आकर्षण आहे. पण एक वेळ अशी होती जेव्हा ही ट्रेन जपानमध्ये बंद होण्याच्या मार्गावर होती. त्यावेळी एका पक्ष्याने जपानच्या बुलेट ट्रेनला नवसंजीवनी दिली होती.


जपानमधली पहिली शिंकनसेन बुलेट ट्रेन १ ऑक्टोबर १९६४ रोजी जपानमध्ये सुरू झाली होती. मात्र, सुरुवातीला या बुलेटच्या डिझाईनबाबत काही समस्या होत्या. ही गाडी बोगद्यातून बाहेर पडली की मोठा आवाज करत बाहेर यायची. बुलेट ट्रेनचा आवाज इतका मोठा होता की आजूबाजूच्या लोकांना रुळाजवळ थांबणे कठीण झाले. हा मोठा आवाज ट्रेनच्या डिझाईनमधील त्रुटीमुळे झाल्याचे तज्ज्ञांनी सांगितले.


जेव्हा जेव्हा बुलेट ट्रेन बोगद्यातून बाहेर पडताना बोगद्याच्या आत हवेची दाब लहर निर्माण झाली. त्याचवेळी ही बुलेट ट्रेन बोगद्यातून बाहेर पडली तेव्हा ७० डेसिबलपेक्षा जास्त आवाजाच्या ध्वनी लहरी निर्माण झाल्या. हा प्रश्न पुन्हा किंगफिशर पक्ष्याने सोडवला. वास्तविक, जपान रेल्वेच्या अभियंता आणि तांत्रिक विकास विभागातील महाव्यवस्थापक इजी नाकत्सू यांना किंगफिशर पक्षी पाहिल्यानंतर बुलेट ट्रेनचे डिझाइन बदलण्याची कल्पना सुचली. मासे पकडण्यासाठी किंगफिशर पक्षी इतक्या वेगाने पाण्यात जातो की पाण्याचे काही शिडकावे बाहेर पडतात.


किंगफिशरची लांब चोच पाणी लवकर सोडण्यास मदत करते आणि पाण्यात फारशी हालचाल होत नाही. याच धर्तीवर बुलेट ट्रेनचा पुढचा भाग जपानमध्ये पुन्हा डिझाइन करण्यात आला. अभियंत्यांच्या या मेहनतीने बुलेट ट्रेनच्या मोठ्या आवाजापासून सुटका तर झाली.

Comments
Add Comment

लाल किल्ला स्फोट प्रकरणी एनआयएच्या तपासातून हाती आली धक्कादायक माहिती, २०२३ पासूनचा दहशतवाद्यांचा कट उघड

नवी दिल्ली : दिल्लीच्या ऐतिहासिक लाल किल्ल्याबाहेर झालेल्या कार स्फोटाच्या तपासात महत्वाची माहिती समोर आली

प्रत्येक जोडप्याला किमान तीन मुले हवीतच; चंद्राबाबू नायडूंचं विधान चर्चेत

तिरुपती : तिरुपती येथे झालेल्या एका कार्यक्रमात आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनी

वाढदिवसाची पार्टी, धुम्रपानास जबरदस्ती अन् कारमध्ये बलात्कार!

उदयपूरमधील आयटी कंपनीच्या मॅनेजरची 'ती' काळरात्र उदयपूर: राजस्थानमधील उदयपूर येथे एका खाजगी आयटी कंपनीच्या

भारतीय जॉब मार्केटची विक्रमी झेप; 'एआय'मुळे भरती प्रक्रियेला वेग

९ कोटींहून अधिक जॉब अॅप्लिकेशनची नोंद नवी दिल्ली : भारतीय अर्थव्यवस्थेसाठी आणि रोजगार बाजारपेठेसाठी २०२५ हे

शाळांमध्ये सकाळचा नाश्ता देण्याची केंद्राची सूचना

शिक्षणासोबत पोषणावर भर नवी दिल्ली : शालेय विद्यार्थ्यांना संतुलित व पुरेसे पोषण मिळावे, या उद्देशाने केंद्र

‘जेन-झी’वर माझा विश्वास : पंतप्रधान मोदी

भारताचा ‘विकसित राष्ट्राचा’ निर्धार याच मुलांच्या हाती नवी दिल्ली : जेन-झी पिढीच्या मुलांवर माझा विश्वास असून,