Crime News: धक्कादायक! चेंबूरमधून अपहरण झालेली मुलगी तब्बल ८ महिन्यानंतर सापडली बिहारमध्ये

आरोपीलाही करण्यात आली अटक


मुंबई : एका ३० वर्षांच्या तरुणाने लग्नाचे अमिष दाखवून १५ वर्षांच्या मुलीचे अपहरण केल्याची घटना काही दिवसांपूर्वी चेंबूर परिसरात घडली होती. चेंबूरच्या वाशीनाका परिसरात पीडित मुलगी वास्तव्यास असून ती ऑगस्ट २०२३ मध्ये परिसरातून अचानक गायब झाली होती. बराच वेळानंतरही ती घरी न परतल्यामुळे तिच्या आई-वडिलांनी याप्रकरणी आरसीएफ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी अनेक दिवस या मुलीचा शोध घेतला, मात्र ती सापडली नाही. यादरम्यान तिचे वडील काम करीत असलेल्या कारखान्यातील तरुण नरेश राय (३०) हादेखील त्याच दिवसांपासून कामावर आला नव्हता.


पोलिसांनी मिळालेल्या माहितीनुसार आरोपी बिहारमध्ये असल्याचे समजले. आरसीएफ पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण मांढरे आणि त्यांच्या पथकाने तत्काळ बिहारमध्ये जाऊन आरोपीचा शोध घेतला. मात्र तो वास्तव्याचे ठिकाण सतत बदलत असल्यामुळे सापडण्यात यश मिळत नव्हते. अखेर पोलिसांनी वेषांतर करून दोन दिवस बिहारमधील माधवपुरा परिसरात सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. मुलीला याच परिसरातील एका घरात ठेवल्याचे आरोपीने सांगितले. याप्रकरणी आरसीएफ पोलिसांनी बिहार येथून या मुलीची सुटका करून आरोपीला अटक केली.


Comments
Add Comment

सिद्धू मुसेवालाच्या हत्येचा घेतला बदला, कबड्डीपटू राणा बलाचौरियाची हत्या; बंबिहा गँगने घेतली जबाबदारी

मोहाली : पंजाबमध्ये पुन्हा एकदा गोळीबाराच्या घटनेने खळबळ उडाली आहे. मोहाली जिल्ह्यातील सोहाना कस्ब्यात सुरू

हाय-प्रोफाइल लग्नातही करण जोहर जेवत नाही; कारण ऐकून बसाल थक्क

मुंबई : बॉलिवूडमधील प्रसिद्ध दिग्दर्शक आणि निर्माते करण जोहर आपल्या चित्रपटांसोबतच स्पष्टवक्तेपणासाठीही

मेस्सीला न भेटता अनुष्का आणि विराट कोहली महाराजांच्या भेटीला

वृंदावन : भारतीय क्रिकेटपटू विराट कोहली आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा यांनी नुकतीच वृंदावनमधील प्रसिद्ध

दिग्पाल लांजेकर यांच्या श्री शिवराज अष्टकातील सहावे पुष्प भेटीला

‘रणपति शिवराय स्वारी आग्रा’ चित्रपटाचा दमदार टिझर छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य उभारणीत त्यांच्या

धक्कादायक! मुंबई उच्च न्यायालयाच्या परिसरात आत्मदहनाचा प्रयत्न; पैशाच्या वादातून उचलले टोकाचे पाऊल

मुंबई: मुंबई उच्च न्यायालयाच्या समोर एका व्यक्तीने स्वत:च्या अंगावर पेट्रोल ओतून जाळून घेत आत्मदहनाचा प्रयत्न

वकिलाकडून थुंकीने पान उलटण्यावर न्यायाधीशांचा आक्षेप

कोलकाता : कोलकाता उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती अमृता सिन्हा यांनी एका वकिलाने थुंकी लावून पान उलटण्यावर