हिंदू नववर्ष निमित्त रांगोळी'च्या माध्यमातून मतदानाबाबत जनजागृती

नवी मुंबई(प्रतिनिधी) -हिंदू नववर्ष स्वागत निमित्ताने सार्वत्रिक निवडणुकीत नागरिकांनी आपला मतदानाचा हक्क आवर्जून बजावावा यासाठी 'रांगोळी'च्या माध्यमातून जनजागृती करण्याचे काम भूमिपुत्र माथाडी कामगार आणि जनरल कामगार युनियन व मैत्री परिवार (फँटासिया पार्क) यांच्या वतीने करण्यात आले.

गुढीपाडव्याच्या निमित्ताने नवी मुंबईतील वाशी सेक्टर ३० येथील वाशी रेल्वे स्टेशन जवळील फँटासिया बिझिनेस पार्क मध्ये भूमिपुत्र माथाडी कामगार आणि जनरल कामगार यूनियन व मैत्री परिवार (फँटासिया पार्क) यांच्या विद्यमाने येत्या २० मे रोजी होऊ घातलेल्या देशाच्या लोकशाहीच्या महोत्सवात म्हणजेच सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीत सुजाण नवी मुंबईकर नागरिकांनी मतदानाचा हक्क आवर्जून बाजावावा यासाठी मोठ्या आकाराची संदेशात्मक रांगोळी रेखाटण्यात आली होती.

सुप्रसिद्ध रांगोळीकार श्रीहरी पवळे यांच्या कल्पकतेतून हि रांगोळी साकारण्यात आली. नागरिकांनी आपल्याला घटनेने दिलेला मतदानाचा हक्क आवर्जून बजावावा असे आवाहन माजी विरोधी पक्षनेते दशरथ भगत यांनी केले आहे.

Comments
Add Comment

खोकल्याच्या सिरपमुळे बालकांचा मृत्यू; खबरदारीसाठी राज्याने 'हा' टोल-फ्री क्रमांक केला जारी!

मुंबई: मध्य प्रदेश आणि राजस्थानसह देशातील काही राज्यांमध्ये 'कोल्ड्रिफ' (Coldrif) नावाच्या खोकल्याच्या सिरपमुळे काही

लाडक्या बहिणींची 'ई केवायसी'तील तांत्रिक अडचण लवकर दूर करणार, मंत्री आदिती तटकरेंचे आश्वासन

मुंबई(प्रतिनिधी): मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्व लाभार्थी महिलांना आता 'ई-केवायसी' बंधनकारक केली आहे.

ठाकरे बंधूंची मात्रोश्रीवर भेट, राज्याच्या राजकारणात नव्या समीकरणांच्या शक्यता

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा ठाकरे बंधूंच्या जवळीकीच्या बातम्या चर्चेत आल्या आहेत. शिवसेना

रेल्वे , बेस्ट, एसटी , मेट्रो... आता एकाच कार्डवर फिरू मुंबई ...

मुंबई : सार्वजनिक वाहतूक व्यवस्था ही एकाच प्लॅटफॉर्म आणण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे स्वप्न होते. त्याच

अंधेरी ते मालाड प्रवास सहा मिनिटांत करता येणार

मुंबई : पश्चिम उपनगरातील अंधेरी ते मालाड या पट्ट्यात प्रचंड लोकवस्ती आहे. मध्यमवर्गीय, उच्च मध्यमवर्गीय,

गोरेगाव-मुलुंड जोड मार्गाच्या जुळ्या बोगद्याचे काम नवीन वर्षापासून

मुंबई (खास प्रतिनिधी) :गोरेगाव-मुलुंड जोड मार्ग प्रकल्पातंर्गत दादासाहेब फाळके चित्रनगरी परिसरात उभारण्यात