हिंदू नववर्ष निमित्त रांगोळी'च्या माध्यमातून मतदानाबाबत जनजागृती

नवी मुंबई(प्रतिनिधी) -हिंदू नववर्ष स्वागत निमित्ताने सार्वत्रिक निवडणुकीत नागरिकांनी आपला मतदानाचा हक्क आवर्जून बजावावा यासाठी 'रांगोळी'च्या माध्यमातून जनजागृती करण्याचे काम भूमिपुत्र माथाडी कामगार आणि जनरल कामगार युनियन व मैत्री परिवार (फँटासिया पार्क) यांच्या वतीने करण्यात आले.

गुढीपाडव्याच्या निमित्ताने नवी मुंबईतील वाशी सेक्टर ३० येथील वाशी रेल्वे स्टेशन जवळील फँटासिया बिझिनेस पार्क मध्ये भूमिपुत्र माथाडी कामगार आणि जनरल कामगार यूनियन व मैत्री परिवार (फँटासिया पार्क) यांच्या विद्यमाने येत्या २० मे रोजी होऊ घातलेल्या देशाच्या लोकशाहीच्या महोत्सवात म्हणजेच सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीत सुजाण नवी मुंबईकर नागरिकांनी मतदानाचा हक्क आवर्जून बाजावावा यासाठी मोठ्या आकाराची संदेशात्मक रांगोळी रेखाटण्यात आली होती.

सुप्रसिद्ध रांगोळीकार श्रीहरी पवळे यांच्या कल्पकतेतून हि रांगोळी साकारण्यात आली. नागरिकांनी आपल्याला घटनेने दिलेला मतदानाचा हक्क आवर्जून बजावावा असे आवाहन माजी विरोधी पक्षनेते दशरथ भगत यांनी केले आहे.

Comments
Add Comment

कृषीसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता परिषद घेणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य

मुंबई : शेतकऱ्याने डिजिटल सेवांचा आत्मविश्वासाने वापर केला पाहिजे. शेतकऱ्यांसाठी सुरू केलेल्या विविध डिजिटल

वाजपेयी कौशल्य विकास केंद्रात चामड्याच्या पादत्राणांचे प्रशिक्षण सुरू

मुंबई : समाजातील ऐतिहासिकदृष्ट्या दुर्लक्षित घटकांना सक्षम करण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलत, उत्तर

मेट्रो लाईन ४ सुरक्षित असल्याची MMRDA ने दिली माहिती

मुंबई : मेट्रो लाईन ४ वरील प्रस्तावित श्रेयस सिनेमा मेट्रो स्थानकाजवळ (दोन गर्डर्सच्या दरम्यान) असलेल्या भागाची

विधिमंडळाची दोन्ही सभागृहे देणार अजितदादांच्या आठवणींना उजाळा

मुंबई : महाराष्ट्र विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सोमवार, २३ फेब्रुवारीपासून सुरू होत असून, पहिल्या दिवशी

Mumbai-Nashik Local Train: मुंबई-नाशिक लोकलसेवा सुरु होणार; रेल्वे मार्गाच्या विस्ताराला मंजुरी

मुंबई: मुंबई आणि नाशिक या दोन महत्त्वाच्या शहरांमधील प्रवास आता अधिक वेगवान आणि सुखकर होणार आहे. मुंबईच्या

Shatrughan Sinha: खामोश शब्द वापराल तर..., मुंबई उच्च न्यायालयाने घातली बंदी

मुंबई: मुंबई उच्च न्यायालयाकडून दिग्गज अभिनेते आणि राजकारणी शत्रुघ्न सिन्हा यांना मोठा दिलासा मिळाला आहे.