नवी मुंबई(प्रतिनिधी) -हिंदू नववर्ष स्वागत निमित्ताने सार्वत्रिक निवडणुकीत नागरिकांनी आपला मतदानाचा हक्क आवर्जून बजावावा यासाठी ‘रांगोळी’च्या माध्यमातून जनजागृती करण्याचे काम भूमिपुत्र माथाडी कामगार आणि जनरल कामगार युनियन व मैत्री परिवार (फँटासिया पार्क) यांच्या वतीने करण्यात आले.
गुढीपाडव्याच्या निमित्ताने नवी मुंबईतील वाशी सेक्टर ३० येथील वाशी रेल्वे स्टेशन जवळील फँटासिया बिझिनेस पार्क मध्ये भूमिपुत्र माथाडी कामगार आणि जनरल कामगार यूनियन व मैत्री परिवार (फँटासिया पार्क) यांच्या विद्यमाने येत्या २० मे रोजी होऊ घातलेल्या देशाच्या लोकशाहीच्या महोत्सवात म्हणजेच सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीत सुजाण नवी मुंबईकर नागरिकांनी मतदानाचा हक्क आवर्जून बाजावावा यासाठी मोठ्या आकाराची संदेशात्मक रांगोळी रेखाटण्यात आली होती.
सुप्रसिद्ध रांगोळीकार श्रीहरी पवळे यांच्या कल्पकतेतून हि रांगोळी साकारण्यात आली. नागरिकांनी आपल्याला घटनेने दिलेला मतदानाचा हक्क आवर्जून बजावावा असे आवाहन माजी विरोधी पक्षनेते दशरथ भगत यांनी केले आहे.
नवी दिल्ली : भारताच्या पुरुष क्रिकेट संघाचा मुख्य प्रशिक्षक (हेड कोच) गौतम गंभीर याला आयसिस…
मुंबई: उन्हाळा आला की तो आपल्यासोबत अनेक आव्हाने घेऊन येतो. घामामुळे आणि तीव्र सूर्यप्रकाशामुळे त्वचेला…
दिवसभर तुमची त्वचा ताजी राहील मुंबई: उन्हाळ्यात आपण आपल्या त्वचेची काळजी घेतली पाहिजे. कारण आता…
नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान यांच्या दरम्यान सागरी तसेच भू सीमा मोठी आहे. भू…
मुंबई : महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असलेल्या आणि जम्मू कश्मीर मध्ये दहशतवाद्यांच्या भ्याड हल्ल्यानंतर तिथे अडकलेल्या…
मुंबई(ज्ञानेश सावंत): राजस्थानने सलग चार सामने गमावले आहेत त्यापैकी तीन सामने अगदी थोड्या अंतराने गमावले…