अकोला : लोकसभा निवडणुकीसाठी (Loksabha Election) गेल्या अनेक दिवसांपासून वंचित बहुजन आघाडी (Vanchit Bahujan Aghadi) महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) साथीने निवडणूक लढवणार अशा चर्चा होत्या. मात्र, मविआकडून समाधानकारक वागणूक न मिळाल्याने वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी वेगळ्या वाटा शोधल्या. मात्र, तरीही मविआकडून काही प्रस्ताव देत वंचितला सोबत घेण्याचे प्रयत्न सुरु होते. त्यामुळे वंचितच्या भूमिकेबाबत स्पष्टता नसताना आता स्वतः प्रकाश आंबेडकर यांनी मविआवर आरोप करत युतीच्या चर्चांना दिला पूर्णविराम दिला आहे.
उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि शरद पवार (Sharad Pawar) यांच्या पक्षाने स्वत:मध्ये बदल करण्याची गरज आहे, असं म्हणत प्रकाश आंबेडकर यांनी जोरदार टीकास्त्र डागलं आहे. महाविकास आघाडीचा विषय आता संपला, प्रचाराला सुरुवात झाली आहे, असं म्हणत प्रकाश आंबेडरकांनी महाविकास आघाडीसोबत निवडणूक लढवण्याच्या चर्चांना पूर्णविराम दिला आहे.
प्रकाश आंबेडकर म्हणाले की, उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने स्वतःमध्ये बदल केले नाही तर, त्यांची इतर राजकीय संघटना आणि पक्षांसारखीच वाताहत होणार आहे. लोकशाही आणि उमेदवारीचं सामाजिकीकरण होणं आवश्यक असल्यामुळेच वेगवेगळ्या समाज घटकातल्या लोकांना लोकसभेचे तिकीट दिलं आहे. यामुळे जातीवादी राजकारणाला चाप बसू शकेल. या निवडणुकीनंतर राज्यातील राजकारणातल्या बऱ्याच गोष्टींमध्ये बदल होतील, अशी शक्यताही आंबेडकरांनी व्यक्त केली आहे.
वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीसोबत निवडणूक लढणार असल्याची चर्चा गेल्या अनेक महिन्यांपासून होती. वंचित आणि मविआच्या अनेक बैठका, चर्चासत्रे निष्फळ ठरली. महाविकास आघाडीच्या जागावाटपाच्या फॉर्म्युल्यावर एकमत न झाल्याने वंचितने प्रस्ताव फेटाळला. वंचित आणि महाविकास आघाडीचा मार्ग पूर्णपणे वेगळा झाल्याचं प्रकाश आंबेडकरांनी आता जाहीर केलं आहे. आता प्रचाराला सुरुवात झाल्याने महाविकास आघाडीचा विषय संपला, असंही प्रकाश आंबेडकरांनी यावेळी स्पष्ट केलं आहे.
अकोला लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढणारे वंचित बहुजन आघाडीने अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांना प्रेशर कुकर हे चिन्ह मिळालं आहे. अकोल्यात वंचित, भाजप आणि काँग्रेस अशी तिहेरी लढत पाहायला मिळणार आहे. अकोल्यात प्रकाश आंबेडकर यांची लढत ही भाजपचे अनुप धोत्रे आणि काँग्रेसचे अभय पाटील यांच्याशी होणार आहे.
मुंबई: आचार्य चाणक्य यांनी अशा घरांचे वर्णन निती शास्त्रात केले आहे जिथे लक्ष्मी मातेला जायला…
मुंबई : आयसीसी टी २० विश्वचषक स्पर्धेत टीम इंडियाने दैदीप्यमान कामगिरी करत विश्वचषक जिंकला. भारतीय…
मुंबई: Motorola Razr 50 Ultra गुरूवारी भारतात लाँच करण्यात आला. हा कंपनीचा नवा क्लॅमशेल-स्टाईलचा फोल्डेबल…
मुंबई: टी-२० वर्ल्डकप २०२४ जिंकून आलेल्या टीम इंडियाचे गुरूवारी मुंबईत अतिशय भव्य दिव्य स्वागत झाले.…
थिरुवनंतपुरम : केरळमध्ये दुषित पाण्यात आंघोळ केल्यामुळे १४ वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला आहे. अमिबामुळे मेंदूला…
मुंबई: भारतीय खेळाडू टी-२० वर्ल्डकप जिंकल्यानंतर मायदेशात परतले आहेत. यानंतर रोहित शर्माच्या नेतृत्वातील टीम इंडियाच्या…