Prakash Ambedkar : उद्धव ठाकरे आणि शरद पवारांना स्वतःमध्ये बदल करण्याची गरज!

बोचरी टीका करत प्रकाश आंबेडकरांनी मविआसोबत युतीच्या चर्चांना दिला पूर्णविराम


अकोला : लोकसभा निवडणुकीसाठी (Loksabha Election) गेल्या अनेक दिवसांपासून वंचित बहुजन आघाडी (Vanchit Bahujan Aghadi) महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) साथीने निवडणूक लढवणार अशा चर्चा होत्या. मात्र, मविआकडून समाधानकारक वागणूक न मिळाल्याने वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी वेगळ्या वाटा शोधल्या. मात्र, तरीही मविआकडून काही प्रस्ताव देत वंचितला सोबत घेण्याचे प्रयत्न सुरु होते. त्यामुळे वंचितच्या भूमिकेबाबत स्पष्टता नसताना आता स्वतः प्रकाश आंबेडकर यांनी मविआवर आरोप करत युतीच्या चर्चांना दिला पूर्णविराम दिला आहे.


उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि शरद पवार (Sharad Pawar) यांच्या पक्षाने स्वत:मध्ये बदल करण्याची गरज आहे, असं म्हणत प्रकाश आंबेडकर यांनी जोरदार टीकास्त्र डागलं आहे. महाविकास आघाडीचा विषय आता संपला, प्रचाराला सुरुवात झाली आहे, असं म्हणत प्रकाश आंबेडरकांनी महाविकास आघाडीसोबत निवडणूक लढवण्याच्या चर्चांना पूर्णविराम दिला आहे.


प्रकाश आंबेडकर म्हणाले की, उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने स्वतःमध्ये बदल केले नाही तर, त्यांची इतर राजकीय संघटना आणि पक्षांसारखीच वाताहत होणार आहे. लोकशाही आणि उमेदवारीचं सामाजिकीकरण होणं आवश्यक असल्यामुळेच वेगवेगळ्या समाज घटकातल्या लोकांना लोकसभेचे तिकीट दिलं आहे. यामुळे जातीवादी राजकारणाला चाप बसू शकेल. या निवडणुकीनंतर राज्यातील राजकारणातल्या बऱ्याच गोष्टींमध्ये बदल होतील, अशी शक्यताही आंबेडकरांनी व्यक्त केली आहे.


वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीसोबत निवडणूक लढणार असल्याची चर्चा गेल्या अनेक महिन्यांपासून होती. वंचित आणि मविआच्या अनेक बैठका, चर्चासत्रे निष्फळ ठरली. महाविकास आघाडीच्या जागावाटपाच्या फॉर्म्युल्यावर एकमत न झाल्याने वंचितने प्रस्ताव फेटाळला. वंचित आणि महाविकास आघाडीचा मार्ग पूर्णपणे वेगळा झाल्याचं प्रकाश आंबेडकरांनी आता जाहीर केलं आहे. आता प्रचाराला सुरुवात झाल्याने महाविकास आघाडीचा विषय संपला, असंही प्रकाश आंबेडकरांनी यावेळी स्पष्ट केलं आहे.



प्रकाश आंबेडकरांना प्रेशर कुकर चिन्ह


अकोला लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढणारे वंचित बहुजन आघाडीने अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांना प्रेशर कुकर हे चिन्ह मिळालं आहे. अकोल्यात वंचित, भाजप आणि काँग्रेस अशी तिहेरी लढत पाहायला मिळणार आहे. अकोल्यात प्रकाश आंबेडकर यांची लढत ही भाजपचे अनुप धोत्रे आणि काँग्रेसचे अभय पाटील यांच्याशी होणार आहे.

Comments
Add Comment

राज्यातील निवडणूक वादावर आज 'सर्वोच्च' सुनावणी! नागपूर खंडपीठाच्या निर्णयाला स्थगिती मिळणार?

नवी दिल्ली: राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांच्या पहिल्या टप्प्यातील मतदान पूर्ण झाले. ज्यामध्ये

चंद्रपूर-यवतमाळ एसटीला अपघात

करंजी : करंजीजवळ महाराष्ट्र परिवहन महामंडळाच्या एसटी बसला झालेल्या अपघातात दोघांचा मृत्यू झाला आणि दहा जण गंभीर

हॉलतिकीट नाही म्हणून परीक्षा नाही, विद्यार्थी गेले थेट पोलीस ठाण्यात ; धक्कादायक परीक्षा व्यवस्थापन

छत्रपती संभाजीनगर : मास्टर ऑफ कॉम्प्युटर अ‍ॅप्लिकेशनच्या (एमसीए) विद्यार्थ्यांना हॉलिकीट मिळाले नाही. यामुळे हे

उद्या मुंबईतील शाळांना सुट्टी; शाळा बंद आंदोलनाला मुंबई मुख्याध्यापक संघटनेचा जाहीर पाठिंबा

मुंबई: राज्यातील शिक्षक बांधवांच्या हक्कासाठी महाराष्ट्र राज्य शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी समन्वय

Vasantdada Sugar Institute : वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या चौकशीला वेग; १७ वर्षांचा आर्थिक लेखाजोखा मागवला

मुंबई : शरद पवार अध्यक्ष असलेल्या वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या आर्थिक व्यवहारांची उच्चस्तरीय चौकशी सुरू

महापालिकेच्या निवडणुकीची तयारी सुरू?

राज्य निवडणूक आयोगाची आज आयुक्तांसोबत बैठक २७ महानगरांचे सोपे गणित, ५०% आरक्षणात जिल्हा परिषदा