अरे बाप रे! एसटीने प्रवास करणा-यांचा जीव टांगणीला!

एसटी अपघातात होताहेत दरवर्षी तब्बल ३ हजाराहून अधिक मृत्यू


माहिती अधिकारांतर्गत अपघातांचा तपशील आला समोर


मुंबई : राज्यातील महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या एसटी बसच्या अपघातामध्ये (ST Accident) मागील काही महिन्यांमध्ये मोठी वाढ झाली आहे. मागच्या तीन वर्षामध्ये प्रवाशांची संख्या देखील तीन पटीने वाढली आहे. मात्र वाढती अपघाताची संख्या देखील चिंताजनक आहे. माहिती अधिकारांतर्गत अपघातांचा तपशील समोर आला आहे. यात मागिल दोन वर्षापासून दरवर्षी तब्बल ३ हजाराहून अधिक मृत्यू झाल्याचे उघडकीस आल्याने एसटीने प्रवास करणा-या प्रवाशांच्या पोटात भीतीचा गोळा आला आहे.


माहिती अधिकारांतर्गत मिळालेल्या माहितीनुसार, १ जानेवारी २०२१ ते ३१ मार्च २०२१ दरम्यान ३३ कोटी २० लाख २२ हजार प्रवाशांनी प्रवास केल्याने एसटीला १ हजार ४६३ कोटी ७५ लाख ३१ हजार रुपयांचा महसूल मिळाला आहे. २०२१-२२ या आर्थिक वर्षात ४९ कोटी ५५ लाख ४३ हजार प्रवाशांमुळे २ हजार ५३५ कोटी ५४ लाख ३४ हजार, २०२२- २३ मध्ये १५९ कोटी ७९ लाख ९२ हजार प्रवाशांनी प्रवास केल्याने ७ हजार ४१० कोटी २८ लाख ७८ हजार तर २०२३-२४ (फेब्रुवारी २०२४ पर्यंत) १८६ कोटी १२ लाख ७ हजार प्रवाशांनी प्रवास केल्याने ९ हजार १५६ कोटी २१ लाख ८१ हजार रुपयांचा महसूल एसटीला मिळाला आहे.


जानेवारी २०२१ ते मार्च २०२१ दरम्यान ६२९ घडलेल्या बस अपघातांमध्ये ७१ मृत्यू झाले. २०२१-२२ मध्ये १ हजार २८१ अपघातांमध्ये १५९ मृत्यू, २०२२-२३ मध्ये ३ हजार १४ अपघातांमध्ये ३४३ मृत्यू झाले.


तर २०२३-२४ मध्ये (फेब्रुवारी २०२४ पर्यंत) ३ हजार १२१ अपघातांमध्ये ३८० मृत्यू नोंदवले गेल्याचेही सामाजिक कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी माहितीच्या अधिकारातून पुढे आले आहे.


यामध्ये मुंबई-गोवा महामार्ग आणि समृद्धी महामार्गावर मोठ्या प्रमाणात अपघातांची संख्या वाढली आहे.


मुंबई-गोवा महामार्गावर रविवार (७ एप्रिल) रोजी माणगाव येथे रिक्षा आणि शिवशाही भीषण बसचा अपघात झाला. या अपघातामध्ये तीन जणांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. ठाणे येथून दापोलीला जाणारी शिवशाही बस माणगाव येथील मानस हॉटेल समोर आली असताना हा भीषण अपघात झाला. अपघात इतका भीषण होता की अपघातग्रस्त रिक्षाचा चुराडा झाला. अपघातामध्ये रिक्षातील तीन प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला. सकाळी साडेआकरा वाजेच्या सुमारास हा भीषण अपघात झाला.


मुंबई गोवा महामार्गावर माणगाव परिसरात यापूर्वीही मोठे अपघात झाले आहेत. वर्षभरापूर्वी झालेल्या मोठ्या अपघातात हेदवी येथील एकाच घरातील नऊ जणांचा मृत्यू झाला होता.


अनेक ठिकाणी रस्त्याची कामे प्रलंबित असल्याने मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर माणगाव, इंदापूर, नागोठणे परिसरात अनेकदा ट्रॅफिक जाम होण्याचे प्रकार घडत आहेत.

Comments
Add Comment

मतदानानंतर सुबोध भावेंची स्पष्ट भूमिका अन् पुण्यात रंगली 'ती' एकच चर्चा

पुणे: पुणे महापालिका निवडणुकीसाठी शहरात मतदानाचा उत्साह पाहायला मिळत असताना, मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेता

Latur : महिन्याभरापूर्वी निवडणूक जिंकली आणि उपचारांअभावी गेली

लातूर : लातूर जिल्ह्यात मन हेलावणारी घटना घडली आहे. अहमदपूर शहरातून ही घटना समोर आली आहे. नुकत्याच झालेल्या

Kolhapur Crime : आईच्या आजारपणाचा गैरफायदा घेत मुख्याद्यापकानेच विद्यार्थिनीला फ्लॅटवर नेत...

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील एका आश्रमशाळेशी संबंधित प्रकरणामुळे खळबळ उडाली आहे.

दौंडमध्ये राजकीय कार्यकर्त्यावर भररस्त्यात हल्ला; पोलीस ठाण्याजवळच घडले 'हे' धक्कादायक दृश्य

पुणे : पुणे जिल्ह्यातील दौंड शहरात घडलेल्या एका घटनेमुळे स्थानिक कायदा-सुव्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह

पैशांच्या वादातून मित्रानेच केली मित्राची हत्या ...आरोपीला ट्रेनमध्ये पकडलं..!

पुणे/रायगड : रायगड जिल्ह्यातील ताम्हिणी घाट परिसरात पैशाच्या वादातून घडलेली मित्रामधील हत्येची घटना समाजात

संक्रांतीच्या उत्सवाला गालबोट; अहिल्यानगर जिल्ह्यात पतंग उडवताना चिमुकल्याचा....

अहिल्यानगर : मकर संक्रांतीच्या दिवशी आनंद आणि उत्साहाचं वातावरण असतानाच अहिल्यानगर जिल्ह्यात एक हृदयद्रावक