अरूणाचल प्रदेश भारताचा भाग होता, आहे आणि नेहमी राहणार, पंतप्रधान मोदीचे चीनला उत्तर

नवी दिल्ली: लोकसभा निवडणुकीआधी पंतप्रधान मोदींनी चीनला चोख उत्तर दिले आहे. पंतप्रधान मोदींनी अरूणाचल प्रदेशवर चीन करत असलेला दावा फेटाळून लावला आहे. तसेच पुन्हा एकदा स्पष्ट करताना म्हटले की अरूणाचल प्रदेश भारताचा अविभाज्य भाग होता, आहे आणि नेहमीच राहील.


तसेच केंद्र सरकारने वेळीच केलेला हस्तक्षेप आणि मणिपूर सरकारच्या प्रयत्नांमुळे या राज्यातील स्थितीमध्ये उल्लेखनीय सुधारणा होत आहे.


एका मुलाखतीत पंतप्रधान मोदी म्हणाले, अरूणाचल प्रदेश भारताचा अविभाज्य भाग होता, आहे आणि नेहमीच राहील, पंतप्रधान मोदींचे हे विधान अरूणाचल प्रदेशवर दावा ठोकणाऱ्या चीनच्या प्रयत्नांनंतर आले आहे. यात बीजिंगने या भारतीय राज्यांमधील विविध स्थानांच्या ३० नव्या नावांची यादी जाहीर केली आहे.



परराष्ट्र मंत्रालयानेही दिले सडेतोड उत्तर


याआधी भारताच्या परराष्ट्र मंत्रालयानेही अरूणाचल प्रदेशमधील ठिकाणांची नावे बदलण्याच्या चीनच्या प्रयत्नांना फेटाळून लावले. परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले की घराचे नाव बदलल्याने ते घर काही आपले होत नाही.



२८ मार्चलाही दिले होते उत्तर


भारताने २८ मार्चलाही म्हटले होती की चीनने कितीही दावे ठोकले तरी यामुळे भारताची भूमिका बदलणार नाही. अरूणाचल प्रदेश भारताचा भाग होता, आहे आणि नेहमीच राहील. ही भारताची भूमिका कायम राहील.

Comments
Add Comment

R. Nallakannu : तामिळनाडूतील सीपीआय नेते स्वातंत्र्यसैनिक नल्लाकन्नू यांचे १०१ व्या वर्षी निधन

स्वातंत्र्यसैनिक आणि तामिळनाडूमधील भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे (सीपीआय) ज्येष्ठ नेते आर. नल्लाकन्नू यांचे

PM Modi Israel Visit : इस्रायलच्या संसदेकडून पंतप्रधान मोदींचा सर्वोच्च बहुमान

- हा बहुमान मिळणारे ठरले पहिले भारतीय पंतप्रधान तेल अवीव : पंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवार २५ फेब्रुवारी रोजी

Odisha News : भ्रष्टाचाराविरोधी मोठी कारवाई! खाण अधिकाऱ्याच्या घरातून तब्बल ४ कोटींची रोकड जप्त

ओडिशा : भ्रष्टाचाराविरोधातील कारवायांमध्ये ओडिशा राज्यात मोठी धडक कारवाई समोर आली आहे. ओडिशा दक्षता विभागाने

केंद्र सरकारचा मोठा निर्णय; घरमालक-भाडेकरूंसाठी 'हे' नवे नियम लागू

नवी दिल्ली : कर वजावटीत पारदर्शकता वाढवण्यासाठी आणि बनावट दावे रोखण्यासाठी केंद्र सरकारने प्राप्तिकर

EPFO 3.0: PF क्लेम आता 3 दिवसांत पूर्ण होणार, कसं ते जाणून घेऊया...

नवी दिल्ली: देशातील लाखो नोकरदारांसाठी श्रम मंत्रालयाने 'EPFO 3.0' ही अत्यंत महत्त्वाची आणि फायदेशीर योजना सुरू केली

IDFC FIRST Bank: बँकिंग क्षेत्रात ५९० कोटींचा घोटाळा; माजी मॅनेजरने बायकोच्या जोडीने मारला बँकेच्या तिजोरीवर डल्ला

मुंबई: बँकिंग क्षेत्रात सध्या एका मोठ्या घोटाळ्याची जोरदार चर्चा सुरू आहे. आयडीएफसी फर्स्ट बँकेच्या चंदीगड