अरूणाचल प्रदेश भारताचा भाग होता, आहे आणि नेहमी राहणार, पंतप्रधान मोदीचे चीनला उत्तर

नवी दिल्ली: लोकसभा निवडणुकीआधी पंतप्रधान मोदींनी चीनला चोख उत्तर दिले आहे. पंतप्रधान मोदींनी अरूणाचल प्रदेशवर चीन करत असलेला दावा फेटाळून लावला आहे. तसेच पुन्हा एकदा स्पष्ट करताना म्हटले की अरूणाचल प्रदेश भारताचा अविभाज्य भाग होता, आहे आणि नेहमीच राहील.


तसेच केंद्र सरकारने वेळीच केलेला हस्तक्षेप आणि मणिपूर सरकारच्या प्रयत्नांमुळे या राज्यातील स्थितीमध्ये उल्लेखनीय सुधारणा होत आहे.


एका मुलाखतीत पंतप्रधान मोदी म्हणाले, अरूणाचल प्रदेश भारताचा अविभाज्य भाग होता, आहे आणि नेहमीच राहील, पंतप्रधान मोदींचे हे विधान अरूणाचल प्रदेशवर दावा ठोकणाऱ्या चीनच्या प्रयत्नांनंतर आले आहे. यात बीजिंगने या भारतीय राज्यांमधील विविध स्थानांच्या ३० नव्या नावांची यादी जाहीर केली आहे.



परराष्ट्र मंत्रालयानेही दिले सडेतोड उत्तर


याआधी भारताच्या परराष्ट्र मंत्रालयानेही अरूणाचल प्रदेशमधील ठिकाणांची नावे बदलण्याच्या चीनच्या प्रयत्नांना फेटाळून लावले. परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले की घराचे नाव बदलल्याने ते घर काही आपले होत नाही.



२८ मार्चलाही दिले होते उत्तर


भारताने २८ मार्चलाही म्हटले होती की चीनने कितीही दावे ठोकले तरी यामुळे भारताची भूमिका बदलणार नाही. अरूणाचल प्रदेश भारताचा भाग होता, आहे आणि नेहमीच राहील. ही भारताची भूमिका कायम राहील.

Comments
Add Comment

हिवाळी अधिवेशनाआधी केंद्र सरकारची सर्वपक्षीय बैठक

मुंबई : हिवाळी अधिवेशन सुरू होण्यापूर्वी संसदेचे कामकाज सुरळीत पार पाडण्यासाठी केंद्र सरकारने सर्वपक्षीय

स्मृती मानधना-पलाश मुच्छल लग्नाची 'ही' तारीख पंतप्रधानानीचं केली उघड

मुंबई : स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्या लग्नाबाबतची चर्चा अनेक दिवसापासून रंगत होती. मात्र आता त्यांच्या

स्मार्ट सिटीच्या धर्तीवर अयोध्येचा विकास

लखनऊ / अयोध्या : मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या दूरदर्शी नेतृत्वाचा परिणाम म्हणून अयोध्येचा स्मार्ट सिटी

विधेयक मंजुरीसाठी राष्ट्रपती, राज्यपालांवर वेळेचं बंधन नाही; सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय

नवी दिल्ली (वृत्तसंस्था): सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी राष्ट्रपती आणि राज्यपाल यांना राज्य किंवा केंद्र

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतरच जिल्हा परिषदांचा कार्यक्रम

आरक्षणासाठी निवडणूक आयोग पुन्हा लॉटरी काढण्याची शक्यता नवी दिल्ली : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या

CM Nitish Kumar Bihar : CM नितीश कुमारांकडे फक्त २१ हजारांची रोख रक्कम! पाटण्यात नावावर घर नाही, तरीही नितीश कुमार यांची एकूण संपत्ती किती?

पाटणा : बिहारच्या राजकारणाला गेल्या दोन दशकांपासून एकच चेहरा व्यापून राहिला आहे, तो म्हणजे नितीश कुमार यांचा. ते