नवी दिल्ली: लोकसभा निवडणुकीआधी पंतप्रधान मोदींनी चीनला चोख उत्तर दिले आहे. पंतप्रधान मोदींनी अरूणाचल प्रदेशवर चीन करत असलेला दावा फेटाळून लावला आहे. तसेच पुन्हा एकदा स्पष्ट करताना म्हटले की अरूणाचल प्रदेश भारताचा अविभाज्य भाग होता, आहे आणि नेहमीच राहील.
तसेच केंद्र सरकारने वेळीच केलेला हस्तक्षेप आणि मणिपूर सरकारच्या प्रयत्नांमुळे या राज्यातील स्थितीमध्ये उल्लेखनीय सुधारणा होत आहे.
एका मुलाखतीत पंतप्रधान मोदी म्हणाले, अरूणाचल प्रदेश भारताचा अविभाज्य भाग होता, आहे आणि नेहमीच राहील, पंतप्रधान मोदींचे हे विधान अरूणाचल प्रदेशवर दावा ठोकणाऱ्या चीनच्या प्रयत्नांनंतर आले आहे. यात बीजिंगने या भारतीय राज्यांमधील विविध स्थानांच्या ३० नव्या नावांची यादी जाहीर केली आहे.
याआधी भारताच्या परराष्ट्र मंत्रालयानेही अरूणाचल प्रदेशमधील ठिकाणांची नावे बदलण्याच्या चीनच्या प्रयत्नांना फेटाळून लावले. परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले की घराचे नाव बदलल्याने ते घर काही आपले होत नाही.
भारताने २८ मार्चलाही म्हटले होती की चीनने कितीही दावे ठोकले तरी यामुळे भारताची भूमिका बदलणार नाही. अरूणाचल प्रदेश भारताचा भाग होता, आहे आणि नेहमीच राहील. ही भारताची भूमिका कायम राहील.
प्रश्नपत्रिका तयार करतानाच घेणार 'ही' खास काळजी मुंबई : NEET PG परीक्षा रद्द झाल्यानंतर जवळपास…
यांचा वारीतला सहभाग केवळ राजकीय फायद्यासाठी भाजपाच्या माजी खासदारांची विरोधकांवर बोचरी टीका सोलापूर : आषाढी…
आमदार नितेश राणे यांचा रोहित पवारांना अप्रत्यक्ष टोला कोणाची बुद्धी लहान याबाबत राहुल गांधी आणि…
भोलेबाबा करायचा दुधाची अंघोळ; खीर बनवून वाटला जायचा प्रसाद लखनऊ : काही दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशच्या…
गुंडांच्या साथीने पुण्यात डॉक्टरचे भयानक कृत्य पुणे : पुण्यात सातत्याने चित्रविचित्र गुन्हेगारीच्या घटना (Pune Crime)…
बालहक्क मंडळाकडे वकिलांमार्फत केला सादर पुणे : पुण्यातील कल्याणीनगर भागात एका अल्पवयीन मुलाने मद्यधुंद अवस्थेत…