Girish Mahajan : अरे वेड्या आम्ही सात वेळा एकाच जागी निवडून येतो, तुम्ही सेफ जागेतून तरी जिंकून दाखवा!

लायकीविषयी बोलणार्‍या संजय राऊतांना गिरीश महाजनांचे चोख प्रत्युत्तर


नांदेड : लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Elections) निमित्ताने राज्यात प्रचाराची रणधुमाळी सुरु झाली आहे. यामध्ये राजकीय पक्ष (Political Parties) एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत. मात्र, ठाकरे गटाचे (Thackeray Group) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यात वाद ओढवून घेण्यात आघाडीवर आहेत. विरोधी पक्षच नव्हे तर मित्रपक्षांतील नेत्यांवरही ते टीका करत सुटले आहेत. त्यामुळे सर्व स्तरांतून त्यांच्यावर तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. त्यातच त्यांनी मंत्री गिरीश महाजनांवर (Girish Mahajan) केलेल्या टीकेला आता महाजनांनी चोख प्रत्युत्तर दिलं आहे.


गिरीश महाजन म्हणाले, 'संजय राऊत बोलत होते याची लायकी काय? म्हणून मी म्हटलं अरे वेड्या, आम्ही सात-सात वेळा एकाच मतदार संघातून निवडून येतो. तुम्ही आयते राज्यसभेवर जाता आणि आम्हाला लायकी शिकवता का? तुम्ही फक्त एकदा उभे राहा, महाराष्ट्रातला कुठलाही सेफ मतदारसंघ तुम्ही काढा. तेथे उभे राहा निवडून येऊन दाखवा. घरातून उठले की सकाळी कोंबड्या सारखी बांग देत बसतात', अशी बोचरी टीका गिरीश महाजन यांनी केली.


'एकदा निवडणूक लढव बाबा आमदारकी, खासदारकीची. निवडणूक लढवून दाखव मग आम्हाला सांग आमची लायकी काय आहे', असं खुलं आव्हान गिरीश महाजन यांनी दिलं. नांदेड येथील प्रचारसभेत बोलताना महाजनांनी राऊतांवर टीकास्त्र उपसलं.


Comments
Add Comment

सातारा येथे २२ मार्चला चतुर्थ ‘महाराष्ट्र मंदिर न्यास परिषद'

मंदिर-संस्कृतीच्या रक्षणार्थ एक हजारांहून अधिक मंदिर प्रतिनिधींची उपस्थिती सातारा : लाखो वर्षांपासून हिंदु

पाणी समजून प्यायलं थिनर; चार वर्षांच्या चिमुकल्याच्या तोंडापासून ते पोटापर्यंत...

ठाणे : ठाण्याच्या इंदिरानगरमध्ये एक अतिशय धक्कादायक घटना घडली आहे. चार वर्षाच्या चिमुकल्याने चुकून पाणी समजून

मराठमोळ्या मुलीशी लग्न करुन आता पत्नीला बुरख्यातच ठेवतो; म्हणाल्या, पुरुष स्त्रियांकडे...

मुंबई: प्रसिद्ध युट्यूबर आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर अदनान शेख सध्या त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत

नागपूर येथील भारतीय व्यवस्थापन संस्थेला इन्क्यूबेशन सेंटर म्हणून मान्यता

मुंबई: विदर्भातील नवउद्योग (स्टार्टअप) परिसंस्था अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पाऊल उचलत,

नमो शेतकरी महासन्मान निधीचा ८ वा हप्ता पुढील आठवड्यात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार; कृषीमंत्र्यांनी दिली माहिती

मुंबई: राज्यातील लाखो शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा देणारा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य शासनाने घेतला असून, नमो

‘महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य विधेयक’ विधानपरिषदेत मंजूर

मुंबई: महाराष्ट्रात गेल्या काही काळापासून चर्चेत असलेले आणि अत्यंत कडक तरतुदी असलेले ‘महाराष्ट्र