Girish Mahajan : अरे वेड्या आम्ही सात वेळा एकाच जागी निवडून येतो, तुम्ही सेफ जागेतून तरी जिंकून दाखवा!

लायकीविषयी बोलणार्‍या संजय राऊतांना गिरीश महाजनांचे चोख प्रत्युत्तर


नांदेड : लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Elections) निमित्ताने राज्यात प्रचाराची रणधुमाळी सुरु झाली आहे. यामध्ये राजकीय पक्ष (Political Parties) एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत. मात्र, ठाकरे गटाचे (Thackeray Group) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यात वाद ओढवून घेण्यात आघाडीवर आहेत. विरोधी पक्षच नव्हे तर मित्रपक्षांतील नेत्यांवरही ते टीका करत सुटले आहेत. त्यामुळे सर्व स्तरांतून त्यांच्यावर तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. त्यातच त्यांनी मंत्री गिरीश महाजनांवर (Girish Mahajan) केलेल्या टीकेला आता महाजनांनी चोख प्रत्युत्तर दिलं आहे.


गिरीश महाजन म्हणाले, 'संजय राऊत बोलत होते याची लायकी काय? म्हणून मी म्हटलं अरे वेड्या, आम्ही सात-सात वेळा एकाच मतदार संघातून निवडून येतो. तुम्ही आयते राज्यसभेवर जाता आणि आम्हाला लायकी शिकवता का? तुम्ही फक्त एकदा उभे राहा, महाराष्ट्रातला कुठलाही सेफ मतदारसंघ तुम्ही काढा. तेथे उभे राहा निवडून येऊन दाखवा. घरातून उठले की सकाळी कोंबड्या सारखी बांग देत बसतात', अशी बोचरी टीका गिरीश महाजन यांनी केली.


'एकदा निवडणूक लढव बाबा आमदारकी, खासदारकीची. निवडणूक लढवून दाखव मग आम्हाला सांग आमची लायकी काय आहे', असं खुलं आव्हान गिरीश महाजन यांनी दिलं. नांदेड येथील प्रचारसभेत बोलताना महाजनांनी राऊतांवर टीकास्त्र उपसलं.


Comments
Add Comment

बीएसएनएलची टॉवर उभारण्याची योजना का मंदावली? २,७५१ ऐवजी केवळ ९३० गावांमध्येच टॉवर उभारणार!

बीएसएनएल '४जी' साठी ९३० गावांमध्ये जमीन देण्यास महाराष्ट्र सरकारची मंजुरी मुंबई: ग्रामीण आणि दुर्गम भागांमध्ये

Satara Gazette: जरांगे पाटलांची ती मागणी सुद्धा होणार मान्य, मराठा समाजाला दिलासा!

सातारा गॅझेट लागू करण्यासंदर्भात सरकारी हालचालींना सुरुवात  मुंबई: मराठा समाजाला आणखीन एक दिलासा देणारी बातमी

'आदिवासींच्या जीवनात ३ वर्षांत आमुलाग्र परिवर्तन घडेल'

यवतमाळ : आदिवासी समाजाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी केंद्र शासनाने महत्वाच्या योजना हाती घेतल्या

साई मंदिरातील प्रसाद, दर्शन, सुरक्षा आता एआयच्या नियंत्रणात

स्मार्ट सुरक्षा प्रणालीमुळे अपप्रवृत्तीला बसणार आळा शिर्डी : श्री साईबाबा संस्थानात भाविकांच्या सुरक्षेसह

परतीचा पाऊस येत आहे रे.. सावधान!

महाराष्ट्रातील १७ जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा मुंबई: गणपती विसर्जनानंतर अनेक दिवस दडी मारून बसलेला

पुण्यातील दर्ग्याखाली बोगदा! हिंदू संघटनांनी केला मंदिर असल्याचा दावा

पुणे: पुण्यातील मंचर येथील दर्ग्याच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळली, त्याखाली मंदिरासारखी रचना आढळल्याने वाद