'कडू कारले तुपात तळले, साखरेत घोळले तरी कडू ते कडूच', पंतप्रधान मोदींची मराठीतून काँग्रेसवर टीका

चंद्रपूर: देशभरात सर्वत्र लोकसभा निवडणुकीची(loksabha election 2024) रणधुमाळी सुरू आहे. प्रत्येक पक्षाच्या देशभरात जोरदार सभा होत आहे. भाजपही जोरदार प्रचार करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींही(Pm narendra modi) विविध ठिकाणी सभा घेत आहे. चंद्रपुरात पंतप्रधान नरेंद्र मोदींची सभा झाली. यावेळी सभेतील भाषणादरम्यान पंतप्रधान मोदींनी काँग्रेसवर मराठीतून जोरदार टीका केली.


यावेळी काँग्रेसवर टीका करताना मोदींनी त्यांची तुलना कडू कारल्याशी केली आणि मराठीतीही म्हणही ऐकवली. पंतप्रधान मोदी म्हणाले, कडू कारले तुपात तळले, साखरेत घोळले तरी कडू ते कडूच राहणार. त्याचप्रमाणे काँग्रेस पक्ष आहे. काँग्रेस कधीच बदलणार नाही. त्यांनीच केलेल्या कामांमुळे काँग्रेसला देशातील लोकांचे समर्थन मिळत नाही आहे.


 


काँग्रेसच्या घोषणापत्रावरही पंतप्रधान मोदींनी यावेळी टीका केली. त्यांनी आपल्या घोषणापत्रात मुस्लिम लीगच्या भाषेचा वापर केला आहे. तुम्हाला हे स्वीकारार्य आहे का? देशाला हे मंजूर आहे का?असा सवाल त्यांनी यावेळी जनतेला केला. यांचे खासदार भारताच्या आणखी एका विभाजनाची गोष्ट करत आहे. दक्षिण भारताला वेगळे करण्याचा प्रयत्न केला जात आहे. यावेळी त्यांनी इंडिया अलायन्सवर जोरदार टीका केली.


यावेळी त्यांनी नाव न घेता उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेवरही टीका केली. त्यांनी नकली शिवसेना असे आपल्या भाषणादरम्यान म्हटले. काँग्रेसच्या विभाजनकारी विचारधारेवरही त्यांनी कडाकडून टीका केली. यावेळी पंतप्रधान मोदींनी आपल्या भाषणादरम्यान छत्रपती शिवाजी महाराज, लोकमान्य टिळकांचाही यावेळी उल्लेख केला. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी काश्मीर मुद्द्यावर काँग्रेसला केलेल्या विरोधाचाही त्यांनी यावेळी उल्लेख केला.

Comments
Add Comment

Akanksha Chaturvedi Sucide : पेपरफुटीचा मानसिक धक्का; नागपुरातील NEET विद्यार्थिनीने संपवले आयुष्य

नागपूर : NEET परीक्षा पेपरफुटी (Paper Leak) प्रकरणामुळे नागपुरातील १८ वर्षीय विद्यार्थिनी आकांक्षा ऊर्फ स्नेहा

Kolhapur Accident : मुंबई जाण्यासाठी निघाले पण त्याआधीच घडला भयंकर अपघात; एका क्षणात संपलं चौघांचं कुटुंब!

कोल्हापूर : कोल्हापूर (Kolhapur Accident) जिल्ह्यातील आजरा तालुक्यात एक भीषण रस्ता अपघात (Road Accident) झाला. या अपघातात एकाच

Wipro Office Religious Harassment : TCS नंतर आता विप्रोही वादाच्या भोवऱ्यात? धर्म बदलण्यास नकार दिल्याने नोकरी गमवावी लागली; पुण्यातील माजी कर्मचारीचा गंभीर आरोप

पुणे : नाशिकमधील TCS कार्यालयात कथित धार्मिक छळ आणि धर्मांतराच्या दबावाच्या आरोपांनंतर आता पुण्यातील आयटी कंपनी

Shrirampur ATS Raid : पाकिस्तानी गँगस्टरच्या सोशल मीडिया नेटवर्कचा महाराष्ट्रात शिरकाव? श्रीरामपूरमध्ये ATS ची मोठी कारवाई, चार जण ताब्यात

महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने (ATS) अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर शहरात मोठी कारवाई करत चार संशयितांना

Minister Makarand Jadhav-Patil : राज्यात नवे पुनर्वसन धोरण येणार

मंत्री मकरंद जाधव-पाटील; कालानुरूप सर्व बदल समाविष्ट करणार मुंबई : राज्यातील दरडप्रवण गावांचे कायमस्वरूपी

HSRP Number Plates : वाहनधारकांसाठी महत्त्वाची सूचना! ३० जूनपूर्वी HSRP नंबर प्लेट बसवणे अनिवार्य; अन्यथा कारवाईची शक्यता

राज्यातील लाखो वाहनधारकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. केंद्रीय मोटार वाहन नियम, १९८९ अंतर्गत सर्व शासकीय आणि