Nitesh Rane : ...तर उबाठाने काँग्रेससोबत सांगलीमध्ये फ्रेंडली फाईट करावी!

भाजपा आमदार नितेश राणे यांचं खुलं आव्हान


मुंबई : 'काल काँग्रेस पक्षाने (Congress) उबाठाला एक प्रस्ताव दिला की सांगली (Sangli Loksabha) किंवा भिंवडीची (Bhiwandi Loksabha) जागा देणं जमत नसेल तर आपण फ्रेंडली फाईट का करत नाही? आणि ते ऐकल्यानंतर संजय राऊत (Sanjay Raut) आणि त्याच्या मालकाची हातभर फाटली. अन्य वेळी उगाच छाती फुगवून दाखवायची, सुक्या धमक्या द्यायच्या आणि महाराष्ट्रामध्ये कशी उद्धव ठाकरेंची (Uddhav Thackeray) हवा आहे, असं दाखवायचं. पण जर खरंच हिंमत असेल तर त्यांनी काँग्रेसशी फ्रेंडली फाईट करुन दाखवावी', असं आव्हान भाजपा आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी दिलं. सांगलीच्या जागेवरुन मविआमध्ये बिघाडी झाली आहे, यावर भाष्य करताना नितेश राणे यांनी ठाकरेंवर टीकास्त्र उपसलं.


नितेश राणे म्हणाले, बाळासाहेब ठाकरेंचा बाणा जर खरंच उद्धव ठाकरेंमध्ये असेल, ते रक्त जर त्यांच्यात असेल तर त्यांनी काँग्रेससोबत सांगली आणि भिवंडीमध्ये फ्रेंडली फाईट करावी. घाबरतात कशाला? भीती कशाला वाटते? सांगलीमध्ये हा संजय राऊतला काँग्रेसला शिव्या देत फिरतोय, तिथे जर यांची काँग्रेससोबत फ्रेंडली फाईट झाली तर मी हा दावा करतो की उबाठाच्या उमेदवारांचं डिपॉझिट जप्त होईल. आणि ते यांना चांगलंच माहित असल्यामुळे फ्रेंडली फाईटला ते घाबरतात, अशी टीका त्यांनी केली.


पुढे ते म्हणाले, संजय राऊतने कधी साधी सरपंचाची निवडणूक लढवली नाही, संजय राऊत ज्या भांडुप वॉर्डमध्ये राहतो तिथे उबाठाचा नाही तर वर्षानुवर्षे भाजपाचा नगरसेवक निवडून येत आहे. जो स्वतःच्या घराजवळ स्वतःचा नगरसेवक निवडून आणू शकत नाही, तो प्रचाराच्या निमित्ताने मोठमोठ्या वल्गना करत सगळीकडे फिरतोय. काल त्याने सांगलीमध्ये वक्तव्य केलं, की 'जर सांगलीमध्ये काँग्रेसने आमची कोंडी केली तर आम्ही त्यांची राज्यभरात कोंडी करु'. पण त्यांच्यात काँग्रेसची कोंडी करण्याची हिंमत आहे का? असेल तर दाखवावा तो बाणा. त्यामुळे उगाच सुक्या धमक्या देण्यापेक्षा मराठी चित्रपटाच्या डायलॉगप्रमाणे चड्डीत राहा आणि आपली लायकी ओळखा एवढंच सांगेन, असं नितेश राणे म्हणाले.



आमच्याबद्दल बोलण्याचा नैतिक अधिकार नाही


एकनाथ खडसे पुन्हा भाजपात प्रवेश करणार आहेत. ते येतील पण भाजपाने त्यांच्यावर आरोप केले होते तर भाजपा आता काय करणार? असं संजय राऊत म्हणाले. यावर नितेश यांनी चोख प्रत्युत्तर दिलं. ते म्हणाले, काँग्रेसचे राहुल गांधी, सोनिया गांधी आणि अनेक मोठ्या नेत्यांवर उद्धव ठाकरेंनी प्रचाराच्या निमित्ताने मोठमोठे आरोप केले. त्यांना चपला मारण्याची भाषा केली. मग तरी जर ते तुम्हाला चालतात, त्यांच्या मांडीला मांडी लावून बसता, तर तुम्हाला आमच्याबद्दल बोलण्याचा नैतिक अधिकार नाही, असं नितेश राणे म्हणाले.


Comments
Add Comment

Dhule Crime News : कंपनीवर 'हा' मोठा आरोप करत तरुणाची तापी नदीत उडी, आत्महत्या करण्यापूर्वी व्हिडीओ बनवत म्हणाला...

Dhule Crime News : धुळे जिल्ह्यातील शिरपूर जवळील गिधाडे तापी नदीच्या पुलावरून उडी घेतलेल्या तरुणाचा मृतदेह अखेर सापडला

Tribal Reservation : धर्मांतर केलेल्या आदिवासींच्या सवलती बंद होणार?

- राज्य सरकार ऍक्शन मोडवर; सर्वसमावेशक धोरणासाठी २७ जणांची समिती मुंबई : धर्मांतरानंतरही अनुसूचित जमातीचे

Nanded Suicide : स्टेटस ठेवलं अन् शिक्षकाची दोन मुलांसह आत्महत्या; पोलीस तपास सुरु

नांदेडमध्ये शिक्षकाची दोन चिमुकल्यांसह आत्महत्या; व्हॉट्सअॅप स्टेटसमुळे खळबळ नांदेड : नांदेड (Nanded) जिल्ह्यातून

Jalgaon : छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील उमाळा घाटात भीषण अपघात, दोन ठार, चार गंभीर

Jalgaon : जळगाव जिल्ह्यातील छत्रपती संभाजीनगर–जळगाव महामार्गावर (Chhatrapati Sambhajinagar–Jalgaon Highway) भीषण अपघात घडल्याची माहिती समोर

Ahilyanagar : जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीला उच्च न्यायालयात आव्हान ; निवडणूक प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह, राजकीय वातावरण तापले

अहिल्यानगर (राहुरी प्रतिनिधी) : अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (Ahilyanagar District Central Cooperative Bank) होवू घातलेल्या

Ahilyanagar : श्रीरामपूरमध्ये स्थानिक गुन्हे शाखेची सलग दुसऱ्या दिवशी मोठी कारवाई; एमडी तस्कर जेरबंद, अडीच लाखांचा मुद्देमाल जप्त

अहिल्यानगर (श्रीरामपूर) : श्रीरामपूर शहरात अंमली पदार्थांविरोधात स्थानिक गुन्हे शाखेने सलग दुसऱ्या दिवशी मोठी