Loksabha Election 2024: नाव एकाचं तर फोटो दुसऱ्याचा! मतदारयादीत मोठा घोळ

मतदारांचा तीव्र संताप!


नागपूर : लोकसभा निवडणूक (Loksabha Election 2024) तोंडावर आली असताना मतदारयाद्यांमध्ये (Voter List) प्रचंड घोळ झाल्याच्या घटना घडत आहेत. फोटो एकाचा तर त्यासमोर भलत्याचेच नाव दिसून येत आहे. असा प्रकार मतदारयादीत आपले नाव बघायला गेलेल्या मतदात्यांना दिसून आला. २६ एप्रिल रोजी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठिकठिकाणी लावण्यात आलेल्या वॉर्डातील मतदारयाद्यांमध्ये मोठा घोळ झाल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे मतदारांनी त्याच्या दुरुस्तीची मागणी करत तीव्र संताप व्यक्त केला आहे.


निवडणुकीत मतदारयादी निवडणूक ओळखपत्रासह इतर काही आवश्यक शासकीय ओळख देणारा पुरावा मतदान करताना वापरता येतो. तशी मुभा निवडणूक आयोगाने दिली आहे. मात्र मतदारयादीतच चुकीचा फोटो व दुसऱ्याचे नाव आले असल्याने तारांबळ उडाली आहे.



शहरातील समाजसेवक हाजी मोहम्मद अशरफ, त्यांचे बंधू मोहम्मद सलीम व परिवारातील सदस्यांच्या फोटोखाली इतर दुसऱ्यांचे नाव आल्याचा प्रकार मतदारयादीतून पुढे आला आहे. दुसरीकडे त्यांचा फोटो आणि त्यांचे योग्य नावसुद्धा आहे. अर्थात दोन वेळा मतदारयादीत त्यांचा फोटो वापरला गेला. त्यामुळे इतरही मतदार आता आपले नाव मतदारयादीत फोटोसह तपासत असल्याचे चित्र आहे.

Comments
Add Comment

Akanksha Chaturvedi Sucide : पेपरफुटीचा मानसिक धक्का; नागपुरातील NEET विद्यार्थिनीने संपवले आयुष्य

नागपूर : NEET परीक्षा पेपरफुटी (Paper Leak) प्रकरणामुळे नागपुरातील १८ वर्षीय विद्यार्थिनी आकांक्षा ऊर्फ स्नेहा

Kolhapur Accident : मुंबई जाण्यासाठी निघाले पण त्याआधीच घडला भयंकर अपघात; एका क्षणात संपलं चौघांचं कुटुंब!

कोल्हापूर : कोल्हापूर (Kolhapur Accident) जिल्ह्यातील आजरा तालुक्यात एक भीषण रस्ता अपघात (Road Accident) झाला. या अपघातात एकाच

Wipro Office Religious Harassment : TCS नंतर आता विप्रोही वादाच्या भोवऱ्यात? धर्म बदलण्यास नकार दिल्याने नोकरी गमवावी लागली; पुण्यातील माजी कर्मचारीचा गंभीर आरोप

पुणे : नाशिकमधील TCS कार्यालयात कथित धार्मिक छळ आणि धर्मांतराच्या दबावाच्या आरोपांनंतर आता पुण्यातील आयटी कंपनी

Shrirampur ATS Raid : पाकिस्तानी गँगस्टरच्या सोशल मीडिया नेटवर्कचा महाराष्ट्रात शिरकाव? श्रीरामपूरमध्ये ATS ची मोठी कारवाई, चार जण ताब्यात

महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने (ATS) अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर शहरात मोठी कारवाई करत चार संशयितांना

Minister Makarand Jadhav-Patil : राज्यात नवे पुनर्वसन धोरण येणार

मंत्री मकरंद जाधव-पाटील; कालानुरूप सर्व बदल समाविष्ट करणार मुंबई : राज्यातील दरडप्रवण गावांचे कायमस्वरूपी

HSRP Number Plates : वाहनधारकांसाठी महत्त्वाची सूचना! ३० जूनपूर्वी HSRP नंबर प्लेट बसवणे अनिवार्य; अन्यथा कारवाईची शक्यता

राज्यातील लाखो वाहनधारकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. केंद्रीय मोटार वाहन नियम, १९८९ अंतर्गत सर्व शासकीय आणि