Eknath Khadse : भाजपा माझं घर; पक्षाच्या पायाधरणीपासून मी भाजपामध्ये!

  98

भाजपात घरवापसी करण्याच्या निर्णयावर एकनाथ खडसे यांचं स्पष्टीकरण


कधी करणार पक्षप्रवेश? स्वतः सांगितला मुहूर्त...


जळगाव : पूर्वी भाजपमध्ये (BJP) असलेले मात्र काही कारणास्तव राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात (NCP) प्रवेश केलेले एकनाथ खडसे (Eknath Khadse) राज्याच्या राजकारणातील मोठे नेते आहेत. जळगाव (Jalgaon) मतदारसंघात त्यांची मोठी ताकद आहे. राष्ट्रवादीचा नेता म्हणून त्यांनी शरद पवार (Sharad Pawar) यांची बाजू लावून धरली होती. राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतरही त्यांनी अजित पवारांसोबत (Ajit Pawar) न जाता शरद पवारांसोबत राहणं पसंत केलं होतं. मात्र, गेल्या काही दिवसांपासून ते पुन्हा एकदा घरवापसी करणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला होता. शिवाय भाजपाच्या नेत्यांचीही एकनाथ खडसेंबाबत स्वागतार्ह भूमिका होती. या चर्चेवर आता खुद्द एकनाथ खडसे यांनी शिक्कामोर्तब केले असून लकवरच ते भाजपात प्रवेश करणार आहेत.


एकनाथ खडसे दिल्ली येथे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा (J P Nadda) यांच्याशी चर्चा करून आज त्यांच्या मतदारसंघात परतले आहेत. यावेळी एकनाथ खडसे म्हणाले की, आपण लवकरच येत्या पंधरा दिवसात भाजप मध्ये प्रवेश करणार आहे. कोणत्याही अटीशर्ती शिवाय मी प्रवेश करणार असल्याचे एकनाथ खडसेंनी स्पष्ट केले आहे.


'भाजपा हे माझे घर आहे. पक्षाच्या पायाधरणीपासून मी भाजपामध्ये राहिलो आहे. भाजपमध्ये माझं योगदान राहिलं आहे. चाळीस वर्षे मी भाजपामध्ये होतो. काही नाराजीमुळे मी भाजपामधून बाहेर पडलो होतो. मात्र आता माझी नाराजी कमी झाल्याने मी पक्षात पुन्हा प्रवेश करत आहे', असे एकनाथ खडसे यांनी सांगितले.



शरद पवारांचा मी ऋणी


शरद पवार (Sharad Pawar) यांनी संकटकाळात साथ दिली याबद्दल मी त्यांचा ऋणी आहे. आता जी परिस्थिती आहे ती मी जयंत पाटील (Jayant Patil) यांना सांगितली. त्यांची अनुकूलता पाहून मी भाजपामधे जाण्याचा हा निर्णय घेतला असल्याची माहिती एकनाथ खडसे यांनी दिली. दरम्यान, एकनाथ खडसे यांच्या घरवापसीमुळे जळगावात भाजपाची ताकद आणखी वाढणार आहे. त्यामुळे आता जळगाव लोकसभेची निवडणूक आणखी निकराची होईल.

Comments
Add Comment

मुंबई-गोवा महामार्ग: १८ वर्षांची प्रतीक्षा, खड्डेमय प्रवास अन् अपघातांचा धोका कायम!

मुंबई : मुंबई-गोवा महामार्गाचे काम गेली १८ वर्षांपासून रखडलेले असतानाच, या पावसाळ्यातही प्रवाशांचे हाल कायम

राज्यात ५१ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या

नाशिक : राज्यातील ५१ पोलीस अधीक्षक आणि अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या बदल्या करण्यात आल्या असून त्यामध्ये नाशिक

Chandrashekhar Bawankule: मर्सिडीजमधून फिरणाऱ्या, आणि फार्म हाऊसवाल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी नाही; महसूलमंत्री बावनकुळे स्पष्टच बोलले

अमरावती: राज्यात शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची मागणी जोर धरत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या

ST : विना तिकिट प्रवास करणाऱ्यांवर कारवाई, एसटीने वसूल केला ३ लाखांचा दंड...

पुणे : विना तिकिट प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर एसटी महामंडळाने कारवाई करण्यासाठी सुरवात केली आहे. २०२४-२०२५ या

Samruddhi Mahamarg Accident : समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, आलिशान मर्सिडीजने ३ वेळा पलटी घेतली अन्...;

नाशिकच्या प्रसिद्ध उद्योजकाचा मृत्यू नागपूर : समृद्धी महामार्गावर (Samruddhi Mahamarg) भीषण अपघाताची (Accident News) आणखी एक घटना

Pandharpur Vitthal Mandir: आषाढी वारीनिमित्त विठुरायाचं आजपासून २४ तास दर्शन सुरू

पंढरपूर: पंढरपूरची वारी हा महाराष्ट्रातील एक महत्त्वपूर्ण धार्मिक आणि सांस्कृतिक उत्सव असतो. या वारीत