‘शिवसेना कधीच आधी स्वतःच्या ताटात वाढून घेत नाही’

मुंबई : आधी स्वतःच्या ताटात वाढून घ्यायचे, ही शिवसेनेची काम करण्याची पद्धत नाही. श्रीकांत शिंदे यांची उमेदवारी ही आधी देखील जाहीर करता आली असती. या आधी देखील आपण पाहिले की एकाच कुटुंबातील व्यक्ती सरकारचे प्रतिनिधित्व करत होते. तर युवराज हे मंत्रिमंडळाच्या पहिल्या यादीत होते. ही शिवसेनेच्या कामाची पद्धत नाही. आधी पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्यासाठी काम करायचे आणि मग स्वतःकडे बघायचे अशी शिवसेनेची पद्धत आहे. शिवसेना कधीच आधी स्वतःच्या ताटात वाढून घेत नाही. अशा शब्दात मंत्री शंभूराज देसाई यांनी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावर टीका केली आहे.


कल्याण लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार म्हणून डॉ. श्रीकांत शिंदे यांचे नाव आज जाहीर करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर शंभूराज देसाई यांनी माध्यमांशी संवाद साधला.


श्रीकांत शिंदे यांचे मोठ्या प्रमाणात काम आहे. त्यामुळे त्यांना उमेदवारी देणे हे अपेक्षितच होते. श्रीकांत शिंदे हे कल्याण मध्ये मोठ्या मताधिक्याने निवडून येतील, असा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे प्रमुख नेते आणि मंत्री शंभूराज देसाई यांनी केला आहे.

Comments
Add Comment

Rain Update : वेळेआधीच मान्सून अंदमानात, महाराष्ट्रात २ ते ५ जून दरम्यान पावसाच्या आगमनाचा अंदाज

मुंबई : देशाच्या अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे. यंदा 'अल निनो'चे

Weather Alert : मुंबई, ठाणे, पालघर, रायगडमध्ये उष्णतेची लाट

मुंबई : राज्यात सध्या एकीकडे अवकाळी पाऊस तर दुसरीकडे कडाक्याचे ऊन अशी दुहेरी हवामान स्थिती पाहायला मिळत आहे. याच

मुलुंड कालिदास नाट्य गृह परिसरातील टर्फसह अनधिकृतरित्या बांधकामांवर कारवाई

महापौरांचे आदेश आणि दुसऱ्याच दिवशी कारवाईला सुरुवात मुंबई :मुलुंड येथील प्रियदर्शिनी इंदिरा गांधी क्रीडा

विभागातील नागरी कामांसोबतच सहायक आयुक्तांच्या खांद्यावर आरोग्य इमारतींची जबाबदारी

रुग्णालय, दवाखाना परिसर अतिक्रमण मुक्त ठेवून स्वच्छ आणि सुंदर राखण्याचे निर्देश रुग्णालयांमधील कामांवर सहायक

पीपीपी धोरणांतर्गत वाटप केलेल्या ५ शाळांच्या भूखंडांचे वाटप तात्काळ रद्द करा

मुंबई भाजप अध्यक्ष आमदार अमीत साटम यांचे महापौर आणि महापालिका आयुक्तांना पत्र मुंबई : शाळांसाठी राखीव असलेले

बारव संवर्धनाला प्राधान्य देऊन अतिक्रमण हटविण्याची मोहीम राबवा; मंत्री ॲड. आशिष शेलार

मुंबई : राज्यातील ऐतिहासिक बारवांचे जतन व संवर्धन करण्यास पुरातत्व विभागाने प्राधान्य द्यावे, यासाठी कृती