Shrikant Shinde : कल्याण लोकसभा लढू म्हणणारे गेले कुठे?

उमेदवारी जाहीर झाल्यानंतर श्रीकांत शिंदेंची ठाकरे गटावर बोचरी टीका


कल्याण : गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या कल्याणच्या (Kalyan) जागेवर अखेर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी उमेदवारीची घोषणा केली. कल्याणच्या जागेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र आणि विद्यमान खासदार श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) हेच महायुतीचे उमेदवार असतील, असं फडणवीस म्हणाले. यानंतर आज श्रीकांत शिंदे यांनी अंबरनाथमध्ये हेरंबा मंदिर परिसरात प्रचाराचा फोडला. यावेळेस त्यांनी ठाकरे गटावर सडकून टीका केली.


श्रीकांत शिंदे म्हणाले, कल्याण लोकसभेला मोठमोठ्या वल्गना करून आदित्य ठाकरे (Aditya Thackeray), वरुण सरदेसाई (Varun Sardesai) आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) लढणार असे सांगितलं जात होतं. ते कुठे आहेत? या मतदारसंघात झालेला विकास पाहून त्यांची लढण्याची हिंमत झाली नाही, असा टोला श्रीकांत शिंदे यांनी लगावला. कार्यकर्त्याला पुढे करून "तुम लढो हम कपडा सांभालते है" अशा प्रकारची भूमिका घेतल्याची टीका श्रीकांत शिंदे यांनी ठाकरेंवर केली.


विद्यमान खासदार श्रीकांत शिंदे यांची कल्याण मतदारसंघातून शिवसेना ठाकरे गटाच्या दोनवेळा नगरसेविका राहिलेल्या वैशाली दरेकर यांच्याशी लढत होणार आहे.

Comments
Add Comment

TET exam : टीईटी परीक्षेत सीसीटीव्हीमध्ये चेहरा दिसणे बंधनकारक

टीईटी परीक्षेत सीसीटीव्हीमध्ये चेहरा दिसणे बंधनकारक बुरखा, दुपट्टा किंवा ओढणीला बंदी नाही- राज्य परीक्षा

Vilas Ghule : विलास घुले हत्या प्रकरणावरून धनंजय मुंडेंचा सवाल; निष्पक्ष तपासाची मागणी

बीड : बीड (Beed) जिल्ह्यातील केज तालुक्यातील विलास घुले (Vilas Ghule) हत्या प्रकरणावरून (Murder) माजी मंत्री आणि आमदार धनंजय मुंडे

Monsoon Update : जून महिन्यात पाऊस पडणार नाही ; या तारखेपासून कोसळणार मुसळधार पाऊस

महाराष्ट्र : महाराष्ट्रामध्ये काही भागात पावसाने जोरदार हजेरी लावली. २३ आणि २५ जूनला मुंबईसह इतर शहरात मुसळधार

Ketan Agarwal Murder Case: "म्हणून मी त्याला लोहगडावरून खाली ढकललं..." सियाने पोलिसांसमोर सर्वचं सांगितलं

केतनच्या हत्येमागचं सर्वात भयंकर कारण आलं समोर Ketan Agarwal Murder Case : पुणे : पुण्यातील उद्योगपती केतन अग्रवाल (Ketan Agarwal Murder)

आषाढी वारीसाठी रेल्वेची खास भेट; पंढरपूरसाठी धावणार विशेष गाड्या, जाणून घ्या वेळापत्रक

आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी मध्य रेल्वेने विशेष गाड्यांची घोषणा केली

Maharashtra Infrastructure : मुंबई आणि नागपूरसाठी मोठा निर्णय; दोन महत्त्वाच्या वाहतूक प्रकल्पांना राज्य सरकारची मंजुरी

राज्यातील वाहतूक व्यवस्था अधिक वेगवान आणि सुलभ करण्यासाठी राज्य सरकारने दोन महत्त्वाच्या पायाभूत सुविधा