PM Narendra Modi: भाजपा सरकारने मुस्लिम कुटुंबांना संरक्षण दिले!

राजस्थानमध्ये पंतप्रधान मोदींचा एल्गार


जयपूर : लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election 2024) पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी आज राजस्थानमधील चुरु येथे निवडणूक रॅलीला संबोधित केले. 'काँग्रेसने जनतेसाठी नव्हे तर केवळ कुटुंबासाठी काम केले आहे आणि आम्ही सातत्याने लोकांसाठी काम करत आहोत', असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर हल्लाबोल केला. तसेच आमच्या सरकारने प्रत्येक मुस्लिम कुटुंबाला संरक्षण दिल्याचा दावाही त्यांनी केला.


तिहेरी तलाकमुळे मुस्लिम कुटुंबांना भेडसावणाऱ्या समस्यांचा उल्लेख करत करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, तिहेरी तलाकवरील कायदा आमच्या मुस्लिम भगिनींना मदत करत आहे. माझ्या मुस्लिम माता-भगिनींनो हे समजून घ्या की, तिहेरी तलाकचा केवळ तुमच्या जीवाला धोका नव्हता तर माझ्या मुस्लिम मुलींच्या डोक्यावर टांगती तलवार होती. मोदींनी तुमचे रक्षण केले नाही तर मोदींनी प्रत्येक मुस्लिम कुटुंबांचे रक्षण केले आहे, असे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले.


तसेच मुस्लिम कुटुंबांतील वडिलांना एक भीती असायची अन त्यांना एक प्रश्न पडायचा की, मुलीचे लग्न झाल्यानंतर तिला दोन तीन मुले होतील, अन् त्यानंतर तिचा पती तिहेरी तलाक करून तिला घरी पाठवेल, मग मी त्या मुलीचा सांभाळ कसा करू? आई, मुलगी, भाऊ सगळेच काळजीत पडले होते. संपूर्ण परिवार तिहेरी तलाकच्या नावाखाली टांगत्या तलवारीखाली जगत होते. मोदींनी केवळ मुस्लिम भगिनींचेच नव्हे तर मुस्लिम कुटुंबांचे प्राणही वाचवले आहेत, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.


पंतप्रधान मोदी म्हणाले की, आतापर्यंत जे काही केले ते केवळ ट्रेलर आहे. आपल्याला खूप काही करायचे आहे, बरीच स्वप्ने बाकी आहेत. देशाला खूप पुढे न्यायचे आहे. भाजपा सर्वकाही करते. आम्ही जाहीरनामा देत नाही तर संकल्प पत्र जारी करतो. दिलेली बहुतांश आश्वासने आम्ही पूर्ण केली आहेत, असे पंतप्रधान मोदी यांनी वक्तव्य केले.

Comments
Add Comment

तेल आयात सोडा, ट्रम्प यांच्या नाकावर टिच्चून भारताचा रशियाबरोबर विमान निर्मितीचा ऐतिहासिक करार

देशात तयार होणार सुखोई सुपरजेट नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून अमेरिका आणि भारतामधील व्यापारी संबंध ताणले

चक्रीवादळ 'मोंथा'मुळे देशभरातील हवामान बदलणार

पुढील पाच दिवसांत काही राज्यांना पावसाचा इशारा! मुंबई : बंगालच्या खाडीत उफाळलेलं मोंथा चक्रीवादळ, अरबी

फॉरेन्सिकचं ज्ञान वापरून खून लपवण्याचा प्रयत्न, पण हुशार पोलिसांनी बिंग फोडले!

नवी दिल्ली : यूपीएससीची तयारी करणाऱ्या ३२ वर्षीय तरुणाची त्याच्याच प्रेयसीनं हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार

पाकिस्तान-अफगाणिस्तानात तणाव असतानाच राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू घेणार राफेलमधून झेप!

नवी दिल्ली : भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उद्या, म्हणजेच २९ ऑक्टोबर २०२५ रोजी, हरियाणातील अंबाला हवाई दल

8th Pay Commission : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी 'बंपर' भेट!; ८वा वेतन आयोग अखेर मंजूर; 'या' तारखेपासून होणार लागू, किमान वेतनात होणार 'इतकी' वाढ!

नवी दिल्ली: केंद्र सरकारने अखेर आज ८ व्या वेतन आयोगाला मंजुरी दिली आहे. यामुळे ५० लाख केंद्रीय सरकारी कर्मचारी

दिल्ली विमानतळाच्या टर्मिनल ३ वर मोठा अपघात; एअर इंडियाच्या बसला आग

नवी दिल्ली : दिल्ली विमानतळाच्या टर्मिनल ३ वर मोठा अपघात झाला. टर्मिनल ३ वर एअर इंडियाच्या बसला आग लागली. सुदैवाने