PM Narendra Modi: भाजपा सरकारने मुस्लिम कुटुंबांना संरक्षण दिले!

राजस्थानमध्ये पंतप्रधान मोदींचा एल्गार


जयपूर : लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election 2024) पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी आज राजस्थानमधील चुरु येथे निवडणूक रॅलीला संबोधित केले. 'काँग्रेसने जनतेसाठी नव्हे तर केवळ कुटुंबासाठी काम केले आहे आणि आम्ही सातत्याने लोकांसाठी काम करत आहोत', असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर हल्लाबोल केला. तसेच आमच्या सरकारने प्रत्येक मुस्लिम कुटुंबाला संरक्षण दिल्याचा दावाही त्यांनी केला.


तिहेरी तलाकमुळे मुस्लिम कुटुंबांना भेडसावणाऱ्या समस्यांचा उल्लेख करत करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, तिहेरी तलाकवरील कायदा आमच्या मुस्लिम भगिनींना मदत करत आहे. माझ्या मुस्लिम माता-भगिनींनो हे समजून घ्या की, तिहेरी तलाकचा केवळ तुमच्या जीवाला धोका नव्हता तर माझ्या मुस्लिम मुलींच्या डोक्यावर टांगती तलवार होती. मोदींनी तुमचे रक्षण केले नाही तर मोदींनी प्रत्येक मुस्लिम कुटुंबांचे रक्षण केले आहे, असे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले.


तसेच मुस्लिम कुटुंबांतील वडिलांना एक भीती असायची अन त्यांना एक प्रश्न पडायचा की, मुलीचे लग्न झाल्यानंतर तिला दोन तीन मुले होतील, अन् त्यानंतर तिचा पती तिहेरी तलाक करून तिला घरी पाठवेल, मग मी त्या मुलीचा सांभाळ कसा करू? आई, मुलगी, भाऊ सगळेच काळजीत पडले होते. संपूर्ण परिवार तिहेरी तलाकच्या नावाखाली टांगत्या तलवारीखाली जगत होते. मोदींनी केवळ मुस्लिम भगिनींचेच नव्हे तर मुस्लिम कुटुंबांचे प्राणही वाचवले आहेत, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.


पंतप्रधान मोदी म्हणाले की, आतापर्यंत जे काही केले ते केवळ ट्रेलर आहे. आपल्याला खूप काही करायचे आहे, बरीच स्वप्ने बाकी आहेत. देशाला खूप पुढे न्यायचे आहे. भाजपा सर्वकाही करते. आम्ही जाहीरनामा देत नाही तर संकल्प पत्र जारी करतो. दिलेली बहुतांश आश्वासने आम्ही पूर्ण केली आहेत, असे पंतप्रधान मोदी यांनी वक्तव्य केले.

Comments
Add Comment

पश्चिम आशियातील संघर्षावर भारताने दिली अधिकृत प्रतिक्रिया

नवी दिल्ली : इराण आणि आखाती प्रदेशात २८ फेब्रुवारी २०२६ पासून संघर्ष सुरू आहे. हा संघर्ष सुरू झाल्याचे समजताच

मध्य पूर्वेतल्या बदलत्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर भारत ऊर्जेसंदर्भात पूर्णपणे सज्ज

विविध स्रोतांकडून कच्चे तेल आणि पेट्रोलियम खरेदी, पुरवठ्याच्या स्थितीवर देखरेखीसाठी 24×7 नियंत्रण कक्ष नवी

पुँछमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारणार

नवी दिल्ली : भारतीय शौर्याचे प्रतीक आणि कोट्यवधी भारतीयांचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा भव्य

खामेनींच्या मृत्यूनंतर भारतात हाय अलर्ट, जम्मू काश्मीरमध्ये बंदोबस्तात वाढ

नवी दिल्ली : इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांचा मृत्यू झाला आणि भारतात हाय अलर्ट जाहीर झाला आहे.

धर्मांतराविरुद्ध सर्व देशवासियांनी एकत्र येणं गरजेचं - अमित शाह

शीख पंथाच्या दहा गुरूंनी अशी परंपरा निर्माण केली आहे, जी केवळ भारतासाठीच नव्हे तर संपूर्ण जगासाठी अनुकरणीय आहे.

Mumbai Airport: परदेशी प्रवास ठप्प; मुंबई विमानतळावरील १२५ विमानांची उड्डाणं रद्द

मुंबई: मध्यपूर्वेतील इस्राईल, अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्धजन्य संघर्षाचा मोठा फटका मुंबईतील