PM Narendra Modi: भाजपा सरकारने मुस्लिम कुटुंबांना संरक्षण दिले!

राजस्थानमध्ये पंतप्रधान मोदींचा एल्गार


जयपूर : लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election 2024) पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी आज राजस्थानमधील चुरु येथे निवडणूक रॅलीला संबोधित केले. 'काँग्रेसने जनतेसाठी नव्हे तर केवळ कुटुंबासाठी काम केले आहे आणि आम्ही सातत्याने लोकांसाठी काम करत आहोत', असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर हल्लाबोल केला. तसेच आमच्या सरकारने प्रत्येक मुस्लिम कुटुंबाला संरक्षण दिल्याचा दावाही त्यांनी केला.


तिहेरी तलाकमुळे मुस्लिम कुटुंबांना भेडसावणाऱ्या समस्यांचा उल्लेख करत करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, तिहेरी तलाकवरील कायदा आमच्या मुस्लिम भगिनींना मदत करत आहे. माझ्या मुस्लिम माता-भगिनींनो हे समजून घ्या की, तिहेरी तलाकचा केवळ तुमच्या जीवाला धोका नव्हता तर माझ्या मुस्लिम मुलींच्या डोक्यावर टांगती तलवार होती. मोदींनी तुमचे रक्षण केले नाही तर मोदींनी प्रत्येक मुस्लिम कुटुंबांचे रक्षण केले आहे, असे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले.


तसेच मुस्लिम कुटुंबांतील वडिलांना एक भीती असायची अन त्यांना एक प्रश्न पडायचा की, मुलीचे लग्न झाल्यानंतर तिला दोन तीन मुले होतील, अन् त्यानंतर तिचा पती तिहेरी तलाक करून तिला घरी पाठवेल, मग मी त्या मुलीचा सांभाळ कसा करू? आई, मुलगी, भाऊ सगळेच काळजीत पडले होते. संपूर्ण परिवार तिहेरी तलाकच्या नावाखाली टांगत्या तलवारीखाली जगत होते. मोदींनी केवळ मुस्लिम भगिनींचेच नव्हे तर मुस्लिम कुटुंबांचे प्राणही वाचवले आहेत, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.


पंतप्रधान मोदी म्हणाले की, आतापर्यंत जे काही केले ते केवळ ट्रेलर आहे. आपल्याला खूप काही करायचे आहे, बरीच स्वप्ने बाकी आहेत. देशाला खूप पुढे न्यायचे आहे. भाजपा सर्वकाही करते. आम्ही जाहीरनामा देत नाही तर संकल्प पत्र जारी करतो. दिलेली बहुतांश आश्वासने आम्ही पूर्ण केली आहेत, असे पंतप्रधान मोदी यांनी वक्तव्य केले.

Comments
Add Comment

राहुल गांधींचा 'मतदारचोरी'चा आरोप निवडणूक आयोगाने फेटाळला; 'ऑनलाइन' मतदान वगळणे शक्य नाही

नवी दिल्ली: कर्नाटकच्या आळंद मतदारसंघातून मोठ्या प्रमाणात मतदार वगळल्याचा काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा

काँग्रेस समर्थकांची नावं मतदारयादीतून गायब केली जातात, राहुल गांधींचा नवा आरोप

नवी दिल्ली : लोकसभेच्या तसेच महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीवेळी मतांची चोरी करण्यात आल्याचा आरोप राहुल

आता 'ईव्हीएम' मतपत्रिकेवर उमेदवारांचे रंगीत फोटो; बिहारमधून सुरुवात

नवी दिल्ली: निवडणुकीदरम्यान मतदारांना स्पष्टता मिळावी आणि गोंधळ कमी व्हावा या उद्देशाने 'भारतीय निवडणूक

'राहुल गांधींनी काढली घुसखोर वाचवा यात्रा'

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त राजधानी दिल्लीत झालेल्या कार्यक्रमात

लिओनेल मेस्सीने पंतप्रधान मोदींना पाठवली वाढदिवसाची 'ही' खास भेट

नवी दिल्ली: आज भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा देशभर ७५ वा वाढदिवस साजरा होत आहे. वेगवेगळ्या

केरळमध्ये 'ब्रेन-इटिंग अमीबा'चा हाहाकार; १८ जणांचा बळी, ही लक्षणे दिसल्यास तातडीने व्हा सावधान!

नवी दिल्ली : केरळमध्ये पुन्हा एकदा 'ब्रेन-इटिंग अमीबा' (Brain-Eating Amoeba) चा धोका वाढला असून, या वर्षी या जीवघेण्या संसर्गाचे