Vanchit Bahujan Aghadi : वंचितला मोठा धक्का! यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघातील उमेदवाराचा अर्ज बाद

ऐनवेळी बदलला होता उमेदवार


यवतमाळ : अनेक समस्यांना सामोरं गेल्यानंतर वंचित बहुजन आघाडीसमोर (Vanchit Bahujan Aghadi) आणखी एक अडचण उभी ठाकली आहे. यवतमाळ-वाशिम लोकसभा (Yavatmal Washim Lok Sabha) मतदारसंघात वंचितला मोठा धक्का बसला आहे. वंचितचे उमेदवार अभिजित राठोड (Abhijeet Rathod) यांच्या उमेदवारी अर्जात त्रुटी असल्याचे कारण देत अर्ज रद्द करण्यात आला आहे. वंचितला निवडणुकांपूर्वीच हा मोठा धक्का बसला आहे.


आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विदर्भातील दुसऱ्या टप्प्यातील यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघासाठी आपलं नामनिर्देश पत्र सादर करण्याची काल दुपारी तीन वाजेपर्यंत शेवटची तारीख होती. तर आज या नामनिर्देश पत्राची छाननी केली जाणार होती. दरम्यान यवतमाळच्या नामनिर्देश स्विकृती कक्षात ही प्रक्रिया करत असताना अभिजित राठोड यांच्या अर्जात त्रुटी असल्याने त्यांचा उमेदवारी अर्ज रद्द करण्यात आला.



ऐनवेळी बदलला होता उमेदवार


वंचित बहुजन आघाडीने काल उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी आपला उमेदवार बदलला होता. सुभाष खेमसिंग पवार यांच्याऐवजी युवा उमेदवार असलेल्या अभिजित राठोड यांना संधी दिली होती. दरम्यान, अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी अभिजित राठोड यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता. या मतदारसंघासाठी नामांकन दाखल करायच्या शेवटच्या दिवसाअखेरीस एकून ३८ उमेदवारांची ४९ नामनिर्देशनपत्र निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. पंकज आशिया यांच्याकडे दाखल केली गेली. तर आज या उमेदवारांच्या अर्जाची छाननी प्रक्रिया सुरू आहे. आतापर्यंत ३८ उमेदवारांपैकी इतर किती उमेदवारांचे अर्ज ग्राह्य धरले जातात हेही पाहण महत्त्वाचे ठरणार आहे.

Comments
Add Comment

अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी कृषी मंत्री शेतक - यांच्या बांधावर

राज्यात अवकाळी पावसामुळे १ लाख २२ हजारहून अधिक हेक्टर शेती पिकांचे नुकसान पुणे : राज्यात वादळी वारा व गारांच्या

उद्योगांना एलपीजीचा सुरळीत पुरवठा व्हावा यासाठी शासन प्रयत्नशील - राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल

मुंबई : महाराष्ट्रात कार्यरत असलेली प्रत्येक विदेशी कंपनी ही राज्याचीच आहे, या भूमिकेतून राज्य शासन सर्वतोपरी

मंत्रालय प्रवेशासाठी लागणारी १० हजार ओळखपत्रे गायब

मुंबई : मंत्रालयातील प्रवेश प्रक्रियेत सुसूत्रता आणण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या ‘डिजी प्रवेश’ प्रणालीतील १०

Ladaki Bahin Yojna E Kyc : ई-केवायसी न केल्याने लाडकी बहीण योजनेतील ६८ लाख खाती बंद

मुंबई : महाराष्ट्र सरकारच्या ‘लाडकी बहिण योजना’ संदर्भात एक मोठी बातमी समोर आली आहे. या योजनेअंतर्गत अनिवार्य

ऑपरेशन टायगर? : शिवसेनेच्या मेजवानीला ‘उबाठा’च्या खासदारांची हजेरी

मुंबई: महाराष्ट्राच्या राजकारणात ‘ऑपरेशन टायगर’च्या चर्चांनी जोर धरलेला असतानाच, बुधवारी रात्री राजधानी

SSC Exam 2026 Major Reform : कागदपत्रांचा गोंधळ संपणार! आता 'मार्कशीट' आणि 'पासिंग सर्टिफिकेट' मिळणार...बोर्डाचा नवीन निर्णय काय ?

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने (MSBSHSE) १० वीच्या विद्यार्थ्यांसाठी एक