Vanchit Bahujan Aghadi : वंचितला मोठा धक्का! यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघातील उमेदवाराचा अर्ज बाद

  110

ऐनवेळी बदलला होता उमेदवार


यवतमाळ : अनेक समस्यांना सामोरं गेल्यानंतर वंचित बहुजन आघाडीसमोर (Vanchit Bahujan Aghadi) आणखी एक अडचण उभी ठाकली आहे. यवतमाळ-वाशिम लोकसभा (Yavatmal Washim Lok Sabha) मतदारसंघात वंचितला मोठा धक्का बसला आहे. वंचितचे उमेदवार अभिजित राठोड (Abhijeet Rathod) यांच्या उमेदवारी अर्जात त्रुटी असल्याचे कारण देत अर्ज रद्द करण्यात आला आहे. वंचितला निवडणुकांपूर्वीच हा मोठा धक्का बसला आहे.


आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विदर्भातील दुसऱ्या टप्प्यातील यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघासाठी आपलं नामनिर्देश पत्र सादर करण्याची काल दुपारी तीन वाजेपर्यंत शेवटची तारीख होती. तर आज या नामनिर्देश पत्राची छाननी केली जाणार होती. दरम्यान यवतमाळच्या नामनिर्देश स्विकृती कक्षात ही प्रक्रिया करत असताना अभिजित राठोड यांच्या अर्जात त्रुटी असल्याने त्यांचा उमेदवारी अर्ज रद्द करण्यात आला.



ऐनवेळी बदलला होता उमेदवार


वंचित बहुजन आघाडीने काल उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी आपला उमेदवार बदलला होता. सुभाष खेमसिंग पवार यांच्याऐवजी युवा उमेदवार असलेल्या अभिजित राठोड यांना संधी दिली होती. दरम्यान, अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी अभिजित राठोड यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता. या मतदारसंघासाठी नामांकन दाखल करायच्या शेवटच्या दिवसाअखेरीस एकून ३८ उमेदवारांची ४९ नामनिर्देशनपत्र निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. पंकज आशिया यांच्याकडे दाखल केली गेली. तर आज या उमेदवारांच्या अर्जाची छाननी प्रक्रिया सुरू आहे. आतापर्यंत ३८ उमेदवारांपैकी इतर किती उमेदवारांचे अर्ज ग्राह्य धरले जातात हेही पाहण महत्त्वाचे ठरणार आहे.

Comments
Add Comment

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! कल्याण-भिंवडी मेट्रो ५ चा विस्तार लवकरच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा...

मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून लोकल ट्रेनची गर्दी कमी करण्यासाठी राज्य सरकारने नवीन पाऊले उचलली आहेत.

शेतीच्या वादावरून पुतण्याने केला काकी आणि चुलत भावाचा खून : वर्ध्यातील धक्कादायक प्रकार

वर्धा : शेती वाटपावरून २ जणांची कुऱ्हाडीने वार करत हत्या करुन , नंतर आरोपीने देखील विष पिऊन आत्महत्या केल्याचा

महिलांना नेतृत्वाची संधी ! जिल्ह्यातील ७७५ सरपंच पदाचं आरक्षण जाहीर, महिलांची आकडेवारी किती ?

मुंबई : राज्यातील ग्रामीण भागात ७५५ ग्रामपंचायतींचे आरक्षण नुकतेच जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे २०११ च्या

Pune Metro : पुणेकरांची गर्दीतून सुटका! लवकरच मेट्रोच्या ताफ्यात १५ नव्या ट्रेन, ४५ डबे वाढणार अन्...

पुणे : पुणेकरांसाठी दिलासादायक बातमी आहे. मेट्रोच्या ताफ्यात आगामी काळात १५ नव्या ट्रेन म्हणजेच एकूण १५ डबे

मुंबई-गोवा महामार्ग: १८ वर्षांची प्रतीक्षा, खड्डेमय प्रवास अन् अपघातांचा धोका कायम!

मुंबई : मुंबई-गोवा महामार्गाचे काम गेली १८ वर्षांपासून रखडलेले असतानाच, या पावसाळ्यातही प्रवाशांचे हाल कायम

राज्यात ५१ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या

नाशिक : राज्यातील ५१ पोलीस अधीक्षक आणि अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या बदल्या करण्यात आल्या असून त्यामध्ये नाशिक