Vanchit Bahujan Aghadi : वंचितला मोठा धक्का! यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघातील उमेदवाराचा अर्ज बाद

  132

ऐनवेळी बदलला होता उमेदवार


यवतमाळ : अनेक समस्यांना सामोरं गेल्यानंतर वंचित बहुजन आघाडीसमोर (Vanchit Bahujan Aghadi) आणखी एक अडचण उभी ठाकली आहे. यवतमाळ-वाशिम लोकसभा (Yavatmal Washim Lok Sabha) मतदारसंघात वंचितला मोठा धक्का बसला आहे. वंचितचे उमेदवार अभिजित राठोड (Abhijeet Rathod) यांच्या उमेदवारी अर्जात त्रुटी असल्याचे कारण देत अर्ज रद्द करण्यात आला आहे. वंचितला निवडणुकांपूर्वीच हा मोठा धक्का बसला आहे.


आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विदर्भातील दुसऱ्या टप्प्यातील यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघासाठी आपलं नामनिर्देश पत्र सादर करण्याची काल दुपारी तीन वाजेपर्यंत शेवटची तारीख होती. तर आज या नामनिर्देश पत्राची छाननी केली जाणार होती. दरम्यान यवतमाळच्या नामनिर्देश स्विकृती कक्षात ही प्रक्रिया करत असताना अभिजित राठोड यांच्या अर्जात त्रुटी असल्याने त्यांचा उमेदवारी अर्ज रद्द करण्यात आला.



ऐनवेळी बदलला होता उमेदवार


वंचित बहुजन आघाडीने काल उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी आपला उमेदवार बदलला होता. सुभाष खेमसिंग पवार यांच्याऐवजी युवा उमेदवार असलेल्या अभिजित राठोड यांना संधी दिली होती. दरम्यान, अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी अभिजित राठोड यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता. या मतदारसंघासाठी नामांकन दाखल करायच्या शेवटच्या दिवसाअखेरीस एकून ३८ उमेदवारांची ४९ नामनिर्देशनपत्र निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. पंकज आशिया यांच्याकडे दाखल केली गेली. तर आज या उमेदवारांच्या अर्जाची छाननी प्रक्रिया सुरू आहे. आतापर्यंत ३८ उमेदवारांपैकी इतर किती उमेदवारांचे अर्ज ग्राह्य धरले जातात हेही पाहण महत्त्वाचे ठरणार आहे.

Comments
Add Comment

मुंबई : एकनाथ शिंदेंच्या खात्यावर मुख्यमंत्र्यांची नाराजी, बैठकीला शिंदे उपस्थित नसल्याची माहिती

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नाराजीच्या बातम्या समोर येत असताना

मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक नियंत्रणासाठी 'एआय'चा वापर

रायगड (प्रतिनिधी): गणेशोत्सव काळात मुंबई-गोवा महामार्गावर लाखो कोकणवासीय आपल्या गावांकडे धाव घेतात. त्यामुळे

सिंधुदुर्ग : कार ऑन रेल सेवेने पाचपैकी चार वाहने नांदगावला उतरली

सिंधुदुर्ग : कोकण रेल्वेची पहिली कार ऑन ट्रेन कोलाड (जि. रायगड) स्थानकावरून निघाली आणि रात्री नांदगाव (जि.

आता २९ ऑगस्टला फाईट, चलो मुंबई; जरांगेंचा इशारा

मुंबई : मराठा आरक्षणासाठी २९ ऑगस्ट रोजी मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या घराबाहेर येतोय, असा इशारा मनोज जरांगे यांनी

अवघे 2 दिवस बाकी कोकणच्या बाप्पाची ओढ, 'मोदी एक्सप्रेस' निघाली गावाला

गणेशोत्सव आणि कोकण या नात्याची, आपुलकीची, श्रद्धेची माहिती सांगण्याची आवश्यकता नाही, गणपती म्हटलं की कोणत्याही

गणपतीआधी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाची तातडीची बैठक, भाजपचं मिशन बीएमसी सुरू

येणाऱ्या पालिका निवडणुकीसाठी भाजपने आतापासून कंबर कसली आहे. मुंबई महापालिका निवडणूक ही राज्याच्या