Vanchit Bahujan Aghadi : वंचितला मोठा धक्का! यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघातील उमेदवाराचा अर्ज बाद

Share

ऐनवेळी बदलला होता उमेदवार

यवतमाळ : अनेक समस्यांना सामोरं गेल्यानंतर वंचित बहुजन आघाडीसमोर (Vanchit Bahujan Aghadi) आणखी एक अडचण उभी ठाकली आहे. यवतमाळ-वाशिम लोकसभा (Yavatmal Washim Lok Sabha) मतदारसंघात वंचितला मोठा धक्का बसला आहे. वंचितचे उमेदवार अभिजित राठोड (Abhijeet Rathod) यांच्या उमेदवारी अर्जात त्रुटी असल्याचे कारण देत अर्ज रद्द करण्यात आला आहे. वंचितला निवडणुकांपूर्वीच हा मोठा धक्का बसला आहे.

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विदर्भातील दुसऱ्या टप्प्यातील यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघासाठी आपलं नामनिर्देश पत्र सादर करण्याची काल दुपारी तीन वाजेपर्यंत शेवटची तारीख होती. तर आज या नामनिर्देश पत्राची छाननी केली जाणार होती. दरम्यान यवतमाळच्या नामनिर्देश स्विकृती कक्षात ही प्रक्रिया करत असताना अभिजित राठोड यांच्या अर्जात त्रुटी असल्याने त्यांचा उमेदवारी अर्ज रद्द करण्यात आला.

ऐनवेळी बदलला होता उमेदवार

वंचित बहुजन आघाडीने काल उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी आपला उमेदवार बदलला होता. सुभाष खेमसिंग पवार यांच्याऐवजी युवा उमेदवार असलेल्या अभिजित राठोड यांना संधी दिली होती. दरम्यान, अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी अभिजित राठोड यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता. या मतदारसंघासाठी नामांकन दाखल करायच्या शेवटच्या दिवसाअखेरीस एकून ३८ उमेदवारांची ४९ नामनिर्देशनपत्र निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. पंकज आशिया यांच्याकडे दाखल केली गेली. तर आज या उमेदवारांच्या अर्जाची छाननी प्रक्रिया सुरू आहे. आतापर्यंत ३८ उमेदवारांपैकी इतर किती उमेदवारांचे अर्ज ग्राह्य धरले जातात हेही पाहण महत्त्वाचे ठरणार आहे.

Recent Posts

Akshaya Tritiya: अक्षय्य तृतीयेला आपल्या राशीनुसार खरेदी करा या गोष्टी, मिळतील भरपूर लाभ

मुंबई: यंदाच्या वर्षी ३० एप्रिलला अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त आहे. या दिवशी कोणतेही शुभ कार्य केले…

8 minutes ago

LSG vs DC, IPL 2025: ऋषभ पंत घरच्या मैदानावर दिल्लीला रोखणार?

मुंबई(ज्ञानेश सावंत): दिल्लीचा संघ सध्या अव्वल तीन संघा मध्ये आहे व पहिल्या फेरीत दिल्लीने लखनऊ…

29 minutes ago

Heat wave: उष्णतेच्या लाटेपासून असा करा बचाव…जाणून घ्या या टिप्स

मुंबई: सध्या सगळीकडेच उष्णतेच्या लाटेने नागरिक त्रस्त आहेत. राज्यातही तापमानाचा पारा दिवसेंदिवस चांगलाच वाढत आहे.…

1 hour ago

कोकण रेल्वेने प्रवास करण्याआधी हे जरूर वाचा…

कोकणातून मुंबईकडे जाणाऱ्या रेल्वेगाड्या ठाण्यापर्यंत धावणार रत्नागिरी : मध्य रेल्वेवरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरील फलाटांच्या…

2 hours ago

‘चला वाचू या! सुट्टीतील वाचनालय’, मुंबई महानगरपालिकेकडून विद्यार्थ्यांसाठी अभिनव उपक्रम

येत्या २ मे ते १२ जून २०२५ या कालावधीत भरणार हे वाचनालय महानगरपालिकेच्या विद्यार्थ्यांसमवेत खासगी…

2 hours ago

चंद्रपूर: येत्या २४ एप्रिल पर्यंत उष्णतेचा ‘येलो अलर्ट’

चंद्रपूर : गेल्या आठवड्यापासून चंद्रपूर जिल्ह्याला तीव्र उन्हाचा तडाखा बसत असून दिनांक २१ ते २४…

3 hours ago