Kangana Ranaut: राहुल गांधी हे आईच्या महत्त्वाकांक्षेचे बळी आहेत!

कंगना रणौतची बोचरी टीका


मुंबई : काँग्रेस नेते राहुल गांधी हे आईच्या महत्त्वाकांक्षेचे बळी आहेत. राहुल गांधी आणि त्यांची बहिण प्रियंका यांना त्यांच्या आई सोनिया गांधी यांनी दबाव टाकून जबरदस्तीने राजकारणात आणले आहे, अशी बोचरी टीका अभिनेत्री तसेच हिमाचल प्रदेशाच्या मंडीतील भाजपा उमेदवार कंगना रणौतने राहुल गांधींवर केली आहे.


एका वृत्तवाहिनीला मुलाखतीत कंगना रणौतने असे सांगितले की, थ्री इडियट्स चित्रपटातील मुलं ज्याप्रमाणे घराणेशाहीचे बळी पडले तसेच राहुल गांधी हे त्यांच्या आईच्या महत्त्वाकांक्षेचे बळी पडले आहेत. राहुल गांधी आणि प्रियंका गांधी या दोघांनी राजकारणातच राहण्यासाठी त्यांच्या आईकडून दबाव टाकण्यात आला होता. त्यांच्यावर जबरदस्ती न लादता त्यांना मनमोकळे जीवन जगण्यासाठी परवानगी द्यायला हवी होती, असे कंगना रणौतने म्हटले.


राहुल गांधी यांनी अभिनायात कारकीर्द केली असती तर ते एक चांगले अभिनेते बनू शकले असते. काँग्रेस वंशजाना इतर व्यवसायात काम करण्याची परवानगी द्यायला हवी होती. त्यांच्या आईकडे संपत्तीची कमी नाही, राहुल गांधींची आई या जगातील सर्वात श्रीमंत महिलांपैकी एक आहेत असेदेखील कंगना रणौतने सांगितले.



५० पेक्षा अधिक वय असूनही युवा नेते कसे?


राहुल गांधी यांचे वय ५०हून अधिक आहे. मात्र तरीही त्यांना युवा नेते म्हटले जाते. ते खूप एकाकी आहेत, त्यांच्यावर राजकरणात राहण्याचा दबाव टाकला जात आहे असा दावा कंगना रणौत यांनी केला.

Comments
Add Comment

Ravi Pandit Passes Away : पुण्यातील नामांकित उद्योजक रवी पंडित यांचे निधन; आयटी क्षेत्रातील दूरदर्शी नेतृत्व हरपले...

पुण्यातील प्रसिद्ध उद्योजक आणि KPIT Technologies चे संस्थापक व अध्यक्ष रवी पंडित यांचे आज (८ मे) पुण्यात निधन झाले. कंपनीने

Chief Minister Devendra Fadnavis: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची केपीआयटीचे अध्यक्ष, ज्येष्ठ उद्योजक रवी पंडित यांना श्रद्धांजली

देशातील माहिती तंत्रज्ञान उद्योगाच्या पहिल्या फळीतील मार्गदर्शक उद्योजक हरपला मुंबई : माहिती तंत्रज्ञानाच्या

Yuzi Chahal : युजवेंद्र चहलने वापरली ई - सिगरेट ; विमानातला 'तो' व्हिडिओ होतोयं व्हायरल...

आयपीएल २०२६ आता अखेरच्या टप्पयात आहे. हंगाम संपायला आता काही सामने बाकी आहेत. अशातच गेल्या काही दिवसांपासून रोज

कौतुकास्पद ! पेपर विक्रेत्याच्या मुलीने मिळविले शंभर टक्के, शिकवणी न लावता श्रावणीने गाठले यशाचे शिखर

नाशिक :  मनात जिद्द असेल तर आयुष्यातील कठोर प्रसंगांवरही मात करता येते. याचाच प्रत्यय नाशिकमध्ये आला आहे. आर्थिक

नाशिकच्या ‘कॉर्पोरेट जिहाद’नंतर राज्य सरकार अलर्ट मोडवर

‘पॉश’ कायद्याची अंमलबजावणी अनिवार्य; कामाच्या ठिकाणी महिलांच्या सुरक्षिततेसाठी कठोर पावले मुंबई : नाशिक येथील

मिरा भाईंदरमधील २५४ एकर जमिनीसाठी; राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयात जाणार

मुंबई : मिरा भाईंदर येथील मिठागराची तब्बल २५४ एकर मोक्याची शासकीय जमीन एका खासगी कंपनीच्या घशात जाण्याची