Kangana Ranaut: राहुल गांधी हे आईच्या महत्त्वाकांक्षेचे बळी आहेत!

कंगना रणौतची बोचरी टीका


मुंबई : काँग्रेस नेते राहुल गांधी हे आईच्या महत्त्वाकांक्षेचे बळी आहेत. राहुल गांधी आणि त्यांची बहिण प्रियंका यांना त्यांच्या आई सोनिया गांधी यांनी दबाव टाकून जबरदस्तीने राजकारणात आणले आहे, अशी बोचरी टीका अभिनेत्री तसेच हिमाचल प्रदेशाच्या मंडीतील भाजपा उमेदवार कंगना रणौतने राहुल गांधींवर केली आहे.


एका वृत्तवाहिनीला मुलाखतीत कंगना रणौतने असे सांगितले की, थ्री इडियट्स चित्रपटातील मुलं ज्याप्रमाणे घराणेशाहीचे बळी पडले तसेच राहुल गांधी हे त्यांच्या आईच्या महत्त्वाकांक्षेचे बळी पडले आहेत. राहुल गांधी आणि प्रियंका गांधी या दोघांनी राजकारणातच राहण्यासाठी त्यांच्या आईकडून दबाव टाकण्यात आला होता. त्यांच्यावर जबरदस्ती न लादता त्यांना मनमोकळे जीवन जगण्यासाठी परवानगी द्यायला हवी होती, असे कंगना रणौतने म्हटले.


राहुल गांधी यांनी अभिनायात कारकीर्द केली असती तर ते एक चांगले अभिनेते बनू शकले असते. काँग्रेस वंशजाना इतर व्यवसायात काम करण्याची परवानगी द्यायला हवी होती. त्यांच्या आईकडे संपत्तीची कमी नाही, राहुल गांधींची आई या जगातील सर्वात श्रीमंत महिलांपैकी एक आहेत असेदेखील कंगना रणौतने सांगितले.



५० पेक्षा अधिक वय असूनही युवा नेते कसे?


राहुल गांधी यांचे वय ५०हून अधिक आहे. मात्र तरीही त्यांना युवा नेते म्हटले जाते. ते खूप एकाकी आहेत, त्यांच्यावर राजकरणात राहण्याचा दबाव टाकला जात आहे असा दावा कंगना रणौत यांनी केला.

Comments
Add Comment

Devendra Fadnavis : नवी मुंबई विमानतळावर शिवरायांचा कांस्य पुतळा

नवी मुंबई विमानतळ : महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय

Vladimir Putin : भारतावर निर्बंधांचा परिणाम होणार नाही, पुतिन यांचा मोदींवर विश्वास

मॉस्को : ‘भारत आणि रशिया यांच्यातील सहकार्य आणि व्यापारी भागीदारी अत्यंत मजबूत आहे. कोणत्याही देशाने दिलेल्या

Gautami Patil's new song : गौतमी पाटीलचं नवं गाणं होतंय तुफान व्हायरल, भाऊ कदम म्हणतोय 'हिल हिल पोरी हिला’

Gautami Patil's new song : गौतमी पाटीलला महाराष्ट्रात कोणी ओळखत नाही असं फार क्वचित वेळेत दिसून येईल. सबसे कातील गौतमी पाटील अशी

Chalisgaon : चाळीसगाव महावितरणाचा अजब कारभार: अधिकारी 'मस्तवाल', जनता 'बेहाल'!

Chalisgaon :  चाळीसगाव शहरासह परिसरात महावितरण विभागाचा मनमानी कारभार शिगेला पोहोचला असून, सध्या 'त्रस्त नागरिक आणि

BCCI SELECTION : BCCI कडून दोन मोठ्या स्पर्धांसाठी भारतीय संघांची घोषणा; श्रेयस अय्यरकडे नेतृत्व, तिलक वर्मा उपकर्णधार

MUMBAI : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) आगामी इंग्लंड दौरा 2026 आणि आशियाई क्रीडा स्पर्धा 2026 (जपान) यासाठी भारतीय पुरुष

BCCI SQUAD SELECTION : भारतीय क्रिकेट संघाच्या निवडीसाठी बीसीसीआयची बैठक सुरू; श्रेयस अय्यरकडे सोपवली जाणार धुरा?

BCCI : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाची (BCCI) वरिष्ठ निवड समिती आज मुंबईतील मुख्यालयात महत्त्वाची बैठक घेत आहे. या बैठकीत