सोलापूर : सोलापूर येथील अक्कलकोट रोडवरील एमआयडीसीतील अन्नपूर्णा टॉवेल कारखान्याला आज सकाळी भीषण आग लागली असून आगीचे अद्यापही कारण समजले नाही. सध्या घटनास्थळी अग्निशमन दलाच्या १५ गाड्या दाखल झाल्या असूनही आगीवर नियंत्रण मिळालेले नाही.
सोलापूर अग्निशामक विभाग घटनास्थळी दाखल झाला असून आग विझविण्याचे त्यांचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. कारखान्यात टॉवेल व कच्चा माल असल्याने आगीचा भडका कायम असून परिसरात धुराचे लोट पसरले आहेत. त्याठिकाणी बघ्यांची मोठी गर्दी त्याठिकाणी जमली आहे. ही आग पसरणार नाही, याची खबरदारी अग्निशामक विभागाकडून घेतली जात आहे.
आतापर्यंत लाखोंचा माल आगीत भस्मसात झाला आहे. पूर्णपणे आग विझायला आणखी काही तास लागणार असल्याचे अग्निशामक विभागप्रमुख केदार आवटे यांनी सांगितले
मुंबई: आचार्य चाणक्य यांनी अशा घरांचे वर्णन निती शास्त्रात केले आहे जिथे लक्ष्मी मातेला जायला…
मुंबई : आयसीसी टी २० विश्वचषक स्पर्धेत टीम इंडियाने दैदीप्यमान कामगिरी करत विश्वचषक जिंकला. भारतीय…
मुंबई: Motorola Razr 50 Ultra गुरूवारी भारतात लाँच करण्यात आला. हा कंपनीचा नवा क्लॅमशेल-स्टाईलचा फोल्डेबल…
मुंबई: टी-२० वर्ल्डकप २०२४ जिंकून आलेल्या टीम इंडियाचे गुरूवारी मुंबईत अतिशय भव्य दिव्य स्वागत झाले.…
थिरुवनंतपुरम : केरळमध्ये दुषित पाण्यात आंघोळ केल्यामुळे १४ वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला आहे. अमिबामुळे मेंदूला…
मुंबई: भारतीय खेळाडू टी-२० वर्ल्डकप जिंकल्यानंतर मायदेशात परतले आहेत. यानंतर रोहित शर्माच्या नेतृत्वातील टीम इंडियाच्या…