मुंबई : मोदी सरकारच्या पहिल्या कार्यकाळात ५०० व १००० च्या नोटा बंद करुन दोन हजार रुपयांची नोट चलनात आली होती. मात्र सात वर्षानंतर दोन हजार रुपयांची नोट बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. गेल्या वर्षी चलनातून बाहेर काढण्यात आलेल्या नोटा ११ महिने उलटले तरीही २००० रुपयांच्या हजारो कोटींच्या नोटा अजूनही चलनात असल्याचे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने सांगितले आहे.
आरबीआयने दिलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, चलनातून बाहेर काढण्यात आलेल्या २००० रुपयांच्या गुलाबी नोटांपैकी सुमारे ९७.६९ टक्के नोटा बँकिंग प्रणालीत परत आल्या आहेत. मात्र परत न केलेल्या २.३१ टक्के नोटा अजूनही लोकांकडे आहेत. तर या उर्वरित नोटांची किंमत तब्बल ८,२०२ कोटी रुपये आहे. इतक्या नोटा अद्यापही बँकेकडे प्राप्त झाल्या नसून त्या अजूनही बाजारात असल्याचा दावा केला आहे.
चलनातून बाहेर काढलेल्या गुलाबी नोटा स्थानिक बँकांमध्ये स्वीकारल्या जाणार नाहीत. पण अहमदाबाद, बेंगळुरू, बेलापूर, भोपाळ, भुवनेश्वर, चंदीगड, चेन्नई, गुवाहाटी, हैदराबाद, जयपूर, जम्मू, कानपूर, कोलकाता, लखनऊ या १९ आरबीआय कार्यालयांमध्ये जमा केल्या जातील. तर, मुंबई, नागपूर, नवी दिल्ली, पटणा व तिरुअनंतपुरम येथे जाण्याव्यतिरिक्त लोक या नोटा जवळपासच्या कोणत्याही पोस्ट ऑफिसमधून इंडिया पोस्टद्वारे जमा करु शकतील असे केंद्रीय बँकेने स्पष्ट केले आहे.
नवी दिल्ली : जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये अतिरेक्यांनी पर्यटकांवर हल्ला केला. या हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू…
मुंबईत महिलेसोबत नेमकं काय घडले? मुंबई : राज्यभरात दिवसेंदिवस अपघात, बलात्कार, आत्महत्या, मर्डर अशा अनेक…
जम्मू : जम्मू-काश्मीरमधील पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या पहलगाममध्ये मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर (Pahalgam Terror Attack) संपूर्ण…
मुंबई: पहलगाम येथे झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली आहे. याच पार्श्वभूमीवर, पाकिस्तानी…
नवी दिल्ली: बुधवारी एअर इंडिया (Air India) आणि इंडिगोसह भारतीय विमान कंपन्या श्रीनगर ते दिल्ली…
श्रीनगर : जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे सात अतिरेक्यांनी केलेल्या हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला. ही…