Balbharti: वह्यांच्या कोऱ्या पानांवर बालभारतीचा तब्बल 'इतक्या' कोटींचा खर्च!

या निर्णयाचा फायदा किती?


पुणे : यंदाच्या वर्षी राज्य सरकारने शालेय विद्यार्थ्यांच्या पाठीवरचं वाढणार ओझं कमी करण्यासाठी पाठ्यपुस्तकांमध्येच कोरी पाने जोडण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाचे सुरुवातीला स्वागत करण्यात आले. मात्र तरीही विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या विषयासाठी स्वखर्चाच्या विविध वह्या बनवायला सांगितले गेल्यामुळे या निर्णयाचा खरंच फायदा होतं आहे की त्यामुळे विद्यार्थ्यांच्या पाठीवरचं ओझं आणखी वाढलं आहे, असा प्रश्न उद्भवत आहे. शिवाय त्यासाठी तब्बल कोटींच्या घरात खर्च झाल्याचं समोर आले आहे.


यंदाच्या शैक्षणिक वर्षात वह्यांची कोरी पाने जोडलेली एकात्मिक पाठ्यपुस्तकांच्या निर्मितीसाठी राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळाने (बालभारती) ७१ कोटी ४० लाख २६ हजार रुपये खर्च केले आहेत. राज्यातील दुसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना वह्यांची पाने जोडलेली चार भागांतील एकात्मिक पाठ्यपुस्तके शैक्षणिक वर्ष २०२३-२४ पासून पथदर्शी स्वरूपात उपलब्ध करून देण्यात आली. यासाठी बालभारतीने तब्बल ७१ कोटी ४० लाख २६ हजार रुपयांचा खर्च केला.


खर्चाच्या प्रतिपूर्तीसाठी महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेकडील अखर्चित १५ कोटी ४५ लाख सात हजार २३० रुपयांचा निधी वापरण्यास मंजुरी दिली आहे. याशिवाय शिक्षण विभागाकडील निधी बालभारतीला खर्चाची प्रतिपूर्ती म्हणून देण्यास सरकारने मान्यता दिली.

Comments
Add Comment

Weather Alert: महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांना हवामान खात्याचा अलर्ट

मुंबई: राज्यातील हवामानात बदल जाणवायला सुरुवात झाली आहे. फेब्रुवारी महिन्याच्या मध्यावर पोहोचताच हवामानात

कुंभमेळ्यात महिला भाविकांच्या सुरक्षेसाठी उपाययोजना कराव्या

नाशिक : नाशिक त्र्यंबकेश्वर येथे पुढील वर्षी होणऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यात देश – विदेशातून महिला भाविक येतील. या

महाशिवरात्रीनिमित्त भाविकांसाठी प्रशासनाकडून जादा बसेसची सोय? बस कुठून कुठे धावणार जाणून घ्या..

पुणे : महाशिवरात्रीनिमित्त पुणे महानगर परिवहन मंडळाकडून भाविकांसाठी विशेष जादा बसेसची सोय ही कऱण्यात आली आहे.

Ambulance Network: महाराष्ट्रात ‘अॅम्बुलन्स’चे जाळे मजबूत होणार; १०० कोटींचा अतिरिक्त निधी

अत्याधुनिक उपकरणांसह रुग्णसेवेचा वेग वाढणार मुंबई : आपत्कालीन वैद्यकीय सेवेचा प्रतिसाद अधिक जलद, अचूक आणि

Pandharpur Crime News : पंढरपूर दुहेरी हत्याकांड : अवघ्या १० मिनिटांत मायलेकावर सपासप वार, तपास अधिकारी बदलले अन् असं उकललं पंढरपूरचं हत्याकांड

पंढरपूर : आषाढी वारीच्या पवित्र काळानंतर पंढरपूरला हादरवून सोडणाऱ्या मायलेकाच्या निर्घृण हत्याकांडाचा तपास

Free School Bag: राज्यसरकारच्या मोठा निर्णय! १ ते ८ विच्या विद्यार्थ्यांना मिळणार मोफत दप्तर

मुंबई: राज्यसरकारकडून एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयानुसार आता पहिले ते आठवीच्या विद्यार्थ्यांना