Ramdas Athawale: रामदास आठवलेंना पुन्हा मिळणार राज्यसभेवर संधी

Share

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आश्वासन दिल्याची माहिती

मुंबई : शिर्डीतून लोकसभा लढवण्याची माझी इच्छा होती. त्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रयत्न केले, पण यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची अडचण झाली, असे केंद्रीय मंत्री आणि आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवलेंनी सांगितली.

राज्यसभेचा माझा कार्यकाळ २०२६ मध्ये संपेल. त्यानंतर मला पुन्हा संधी देण्यात येईल, असे फडणवीसांनी सांगितले आहे. सध्या रिपाइंकडे केंद्रात राज्यमंत्रीपद आहे. तुम्हाला कॅबिनेट मंत्रीपद मिळावे, यासाठी प्रयत्न करेन, असे आश्वासन फडणवीसांनी दिले आहे. राज्यात विधानसभेची निवडणूक झाल्यानंतर एक मंत्रीपद, विधान परिषदेची आमदारकी दिली जाईल. दोन महामंडळांचे चेअरमनपद, सदस्यपद, जिल्हा तालुक्याच्या कमिट्या, एसईओमध्ये आरपीआयला प्राधान्य देण्यात येईल, असे आठवले म्हणाले.

‘सरकार आपल्या दारी’सारख्या कार्यक्रमांमध्ये तिन्ही पक्षांचे झेंडे असतात. पण रिपाईंचा झेंडा नसतो. याबद्दल आपण फडणवीसांकडे नाराजी बोलून दाखवल्याचेही त्यांनी सांगितले. लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीकडे एक जागा मागितली होती. शिर्डीतून लोकसभा लढवण्यास मी उत्सुक होतो. शिर्डीमधून मी २००९ मध्ये लढलो होतो. मला शिर्डीतून उमेदवारी मिळावी यासाठी फडणवीस यांनी प्रयत्न केले. पण या मतदारसंघात शिवसेनेचा खासदार असल्याने शिंदेंची अडचण झाली. लोकसभेला तुम्हालाच तिकीट देण्यात येईल, असे आश्वासन शिंदेंनी त्यांच्या सोबत आलेल्या खासदारांना आधीच दिले होते. त्यामुळे मला शिर्डी लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळू शकली नाही, असे आठवले म्हणाले.

रामदास आठवले यांना राज्यसभेवर पुन्हा पाठविण्याविषयी फडणवीसांनी आश्वासन दिल्याचे आठवले सांगत असले तरी आठवलेंच्या रिपाइंला लोकसभेकरिता एकही मतदारसंघ सोडण्यात आलेला नाही. दुसरीकडे प्रकाश आंबेडकरांच्या वंचितने उमेदवार उभे कल्याने रिपाइं मतदार वंचितकडे वळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

सत्तेवर असताना विकास न केल्याचा मविआला टोला

प्रकाश आंबेडकरांच्या वंचितने महाविकास आघाडीसोबत न जाता स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आहे. त्यावरही आठवलेंनी भाष्य केले. वंचितचा निर्णय योग्यच आहे. मविआमध्ये सहभागी होण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना पत्र लिहिले. पण त्यांच्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. त्यामुळे त्यांनी स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला. महाविकास आघाडीला सत्ता असताना विकास करता आला नाही, ते महाविकास काय करणार, असा टोलाही त्यांनी लगावला.

Recent Posts

अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष भारत दौऱ्यावर; व्यापार करार, आयात शुल्क आणि चीनच्या आव्हानाबाबात होणार चर्चा

नवी दिल्ली : अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी व्हान्स सोमवार २१ एप्रिल रोजी भारताच्या चार दिवसांच्या दौऱ्यावर…

53 minutes ago

KKR vs GT, IPL 2025: इडन गार्डनवर कोलकत्ता गुजरातला रोखणार!

मुंबई(ज्ञानेश सावंत): सध्या गुजरात टायटन्स आयपीएलच्या गुण तक्त्यात अव्वल स्थानावर आहे. गुजरातने या अगोदरच्या सामन्यात…

1 hour ago

साहित्यभूषण पुरस्कारासाठी आता दहा लाख रुपये देणार : उदय सामंत

रत्नागिरी : विश्व मराठी साहित्य संमेलनात दिल्या जाणाऱ्या साहित्यभूषण पुरस्काराची रक्कम या वर्षीपासून १० लाख…

2 hours ago

मुख्यमंत्री सचिवालयात लवकरच पीजीआरएस प्रणाली

नागपूर:  विविध कार्यक्रमांमध्ये तसेच येथील सव्हिल लाईन्स परिसरातील मुख्यमंत्री सचिवालय-हैदराबाद हाऊसमध्ये प्राप्त होणारे जनतेचे अर्ज…

3 hours ago

नॅशनल पार्कमधील मिनी ट्रेन सुरू होणार

बंद पडलेली टॉय ट्रेन पुन्हा सुरु; मंत्री पीयूष गोयल यांची घोषणा मुंबई (प्रतिनिधी) : संजय…

3 hours ago

मुख्यमंत्र्यांच्या जनता दरबारात ६२६ अर्ज

नागपूर: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुख्यमंत्री सचिवालयात आयोजित जनता दरबारात जनतेच्या समस्या जाणून घेतल्या…

4 hours ago