मुंबई : शिर्डीतून लोकसभा लढवण्याची माझी इच्छा होती. त्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रयत्न केले, पण यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची अडचण झाली, असे केंद्रीय मंत्री आणि आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवलेंनी सांगितली.
राज्यसभेचा माझा कार्यकाळ २०२६ मध्ये संपेल. त्यानंतर मला पुन्हा संधी देण्यात येईल, असे फडणवीसांनी सांगितले आहे. सध्या रिपाइंकडे केंद्रात राज्यमंत्रीपद आहे. तुम्हाला कॅबिनेट मंत्रीपद मिळावे, यासाठी प्रयत्न करेन, असे आश्वासन फडणवीसांनी दिले आहे. राज्यात विधानसभेची निवडणूक झाल्यानंतर एक मंत्रीपद, विधान परिषदेची आमदारकी दिली जाईल. दोन महामंडळांचे चेअरमनपद, सदस्यपद, जिल्हा तालुक्याच्या कमिट्या, एसईओमध्ये आरपीआयला प्राधान्य देण्यात येईल, असे आठवले म्हणाले.
‘सरकार आपल्या दारी’सारख्या कार्यक्रमांमध्ये तिन्ही पक्षांचे झेंडे असतात. पण रिपाईंचा झेंडा नसतो. याबद्दल आपण फडणवीसांकडे नाराजी बोलून दाखवल्याचेही त्यांनी सांगितले. लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीकडे एक जागा मागितली होती. शिर्डीतून लोकसभा लढवण्यास मी उत्सुक होतो. शिर्डीमधून मी २००९ मध्ये लढलो होतो. मला शिर्डीतून उमेदवारी मिळावी यासाठी फडणवीस यांनी प्रयत्न केले. पण या मतदारसंघात शिवसेनेचा खासदार असल्याने शिंदेंची अडचण झाली. लोकसभेला तुम्हालाच तिकीट देण्यात येईल, असे आश्वासन शिंदेंनी त्यांच्या सोबत आलेल्या खासदारांना आधीच दिले होते. त्यामुळे मला शिर्डी लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळू शकली नाही, असे आठवले म्हणाले.
रामदास आठवले यांना राज्यसभेवर पुन्हा पाठविण्याविषयी फडणवीसांनी आश्वासन दिल्याचे आठवले सांगत असले तरी आठवलेंच्या रिपाइंला लोकसभेकरिता एकही मतदारसंघ सोडण्यात आलेला नाही. दुसरीकडे प्रकाश आंबेडकरांच्या वंचितने उमेदवार उभे कल्याने रिपाइं मतदार वंचितकडे वळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
प्रकाश आंबेडकरांच्या वंचितने महाविकास आघाडीसोबत न जाता स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आहे. त्यावरही आठवलेंनी भाष्य केले. वंचितचा निर्णय योग्यच आहे. मविआमध्ये सहभागी होण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना पत्र लिहिले. पण त्यांच्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. त्यामुळे त्यांनी स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला. महाविकास आघाडीला सत्ता असताना विकास करता आला नाही, ते महाविकास काय करणार, असा टोलाही त्यांनी लगावला.
मुंबई: भारतीय खेळाडू टी-२० वर्ल्डकप जिंकल्यानंतर मायदेशात परतले आहेत. यानंतर रोहित शर्माच्या नेतृत्वातील टीम इंडियाच्या…
दिवसभरातील (Prahaar Bulletin) महत्वाच्या बातम्या… टीम इंडियाच्या विजयी मिरवणुकीत काही चाहते आजारी तर काही झाले…
राज्य मंत्रिमंडळाने घेतला मोठा निर्णय मुंबई : सरकारने माझी लाडकी बहीण योजना जाहीर केल्यानंतर आता…
प्रश्नपत्रिका तयार करतानाच घेणार 'ही' खास काळजी मुंबई : NEET PG परीक्षा रद्द झाल्यानंतर जवळपास…
यांचा वारीतला सहभाग केवळ राजकीय फायद्यासाठी भाजपाच्या माजी खासदारांची विरोधकांवर बोचरी टीका सोलापूर : आषाढी…
आमदार नितेश राणे यांचा रोहित पवारांना अप्रत्यक्ष टोला कोणाची बुद्धी लहान याबाबत राहुल गांधी आणि…