Pawna Lake: पवना धरणातील पाणीसाठ्यात घट; पाणीटंचाई भासणार?

  55

पिंपरी : उन्हाचा कडाका वाढल्याने होणाऱ्या बाष्पीभवनामुळे पुण्याच्या मावळ तालुक्यातील पवना धरणातील पाणीसाठ्यात घट होऊ लागली आहे. आज या धरणात ४४.७२ टक्के इतका उपलब्ध पाणीसाठा जून अखेरपर्यंत पुरेल असा पाटबंधारे विभागाचा अंदाज आहे. मात्र, पावसाळा लांबल्यास मागील साडेचार वर्षांपासून दिवसाआड पाणीपुरवठ्याला सामोरे जात असलेल्या नागरिकांना आणखी पाणीटंचाईस सामोरे जावे लागेल, असे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.


एप्रिल महिना सुरू झाला असून, उन्हाळा तीव्र होत चालला आहे. उन्हाचा पारा चाळिशीपार होऊ लागला आहे. उन्हाच्या झळा आणखी वाढण्याची शक्यता आहे. बाष्पीभवनामुळे पवना धरणातील पाणीसाठा कमी होत आहे. धरणात आजमितीला ४४.७२ टक्के पाणीसाठा आहे. वाढत्या उन्हाबरोबरच पाण्याची मागणी वाढली आहे. पाण्याची वाढती मागणी, बाष्पीभवन यामुळे धरणातील पाणीसाठा कमी होत आहे. त्यामुळे नागरिकांनी पाण्याचा जपून वापर करावा, असे आवाहन पाटबंधारे विभागाने केले आहे.


शहराला मुख्यतः मावळातील पवना धरणातून पाणीपुरवठा केला जातो. पवना धरणात आजमितीला ४४.७२ टक्के पाणीसाठा आहे. हा साठा जूनअखेरपर्यंत पुरेल एवढा आहे. गतवर्षी ४६.३७ टक्के साठा होता. गतवर्षीपेक्षा १.६५ टक्क्याने कमी असून, पाण्याची मागणी वाढली आहे. त्याकारणाने पिंपरी-चिंचवड येथील नागरिकांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागेल का असा प्रश्न उद्भवत आहे.

Comments
Add Comment

शेतीचा दर्जा दिल्याने मत्स्यव्यवसाय प्राधान्याचे क्षेत्र : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

अमरावती : मत्स्य व्यवसायाला चालना देण्यासाठी राज्य शासन विविध प्रयत्न करीत आहेत. यातील सर्वात महत्त्वाचा भाग

नितीन गडकरी यांच्या घराला बॉम्बने उडवण्याची धमकी; आरोपी ताब्यात

नागपूर:  केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या महाल येथील निर्मानाधीन निवासस्थान बॉम्बने उडवण्याची

मनोज जरांगे असलेल्या लिफ्टचा अपघात, लिफ्ट जमिनीवर कोसळली

बीड : मराठा नेते मनोज जरांगे पाटील ज्या लिफ्टमध्य होते त्या लिफ्टचा अपघात झाला. लिफ्ट जमिनीवर धाडकन कोसळली. मनोज

‘सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय?’

अकोला : काही दिवसांपूर्वी वादग्रस्त वक्तव्य आणि हाती सिगारेट घेतलेला व्हिडीओ व्हायरल झाल्याने चर्चेत असलेल्या

MSBTE च्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! निकाल रोखून ठेवलेल्या, अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षा देण्याची संधी - लोढा

मुंबई: महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाच्या जुलै २०२५ या सत्रातील एक वर्ष कालावधी अभ्यासक्रमाच्या निकाल

श्री तुळजाभवानी मंदिरातील तलवार चोरीच्या बातम्या खोट्या, अफवांवर विश्वास ठेवू नका!

धाराशिव : श्री तुळजाभवानी मंदिरात सध्या जतन,संवर्धन व विविध विकासकामे मोठ्या प्रमाणावर सुरू असून,या अनुषंगाने